शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

शिवसेनेने फक्त 'लिव्ह-इन जोडीदार' बदलले; मनसेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 17:22 IST

शिवसेनेने भाजपाला सोडले आहे. हिंदुत्व सोडलं नाही. शिवसेनेच्या जन्मापासून कधीही झेंडा, रंग, विचार आणि नेता बदलला नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

मुंबई – कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या प्रचारावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी शिवसेना, राष्ट्रवादी कार्यकर्ते उतरले आहेत. मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपाने प्रचारात शिवसेनेविरोधात आक्रमक प्रचार केला आहे. कारण युती काळात ही जागा शिवसेना लढवत होती. मात्र आता महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेस लढवत आहे.

शिवसेनेच्या भगव्याचा रंग बदलला आहे असा आरोप भाजपा नेते सातत्याने करत आहेत. मात्र त्यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) शिवसेनेने भाजपाला सोडले आहे. हिंदुत्व सोडलं नाही. शिवसेनेच्या जन्मापासून कधीही झेंडा, रंग, विचार आणि नेता बदलला नाही. त्याचसोबत देशात बनावट हिंदुह्दयसम्राट बनवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे असं सांगत मुख्यमंत्री ठाकरेंनी एकाच दगडात भाजपा-मनसेला टोला लगावला होता. मात्र त्यावर मनसेने मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे म्हणाले की, अगदी खरंय, मुख्यमंत्री महोदय. शिवसेनेने कधीच काही बदललं नाही. फक्त सुरुवातीला आपलं राजकीय अस्तित्व जपण्यासाठी आणि नंतर राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी शिवसेनेने फक्त आपले 'लिव्ह-इन जोडीदार' बदलले! मुस्लिम लीग, काँग्रेसचे विविध गट, प्रजा समाजवादी पक्ष, आरपीआय गट, भाजपा यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर आता पुन्हा नवीन लग्न- राष्ट्रवादी, काँग्रेससोबत असा प्रतिटोला लगावला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघात भाजपने काँग्रेसला छुपी मदत केली. तशी छुपी युती आम्ही करीत नाही. शिवसेना समोरून वार करते, पाठीत वार करणारी आमची औलाद नाही. हिंदुत्वाचे पेटंट भाजपनेच घेतले आहे का? अशी रोखठोक विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. भाजपने नकली भगव्याचा बुरखा पांघरला असून, तो या निवडणुकीत फाटल्याशिवाय राहणार नाही. आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणजे हिंदुत्व सोडलेले नाही. तुम्ही काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तींसोबत सरकारमध्ये गेला. तेव्हा हिंदुत्व कोठे गेले होते? भाजपने बनावट हिंदुहृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला; मात्र जनतेने तो झिडकारला असं विधान मुख्यमंत्र्यांनी केले होते.  

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाMNSमनसे