शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

शांतिनिकेतनचे उपक्रम राज्यभर राबवणार - शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:11 IST

नावीन्यपूर्ण उपक्रम, शिक्षण परिवर्तनासाठी मार्गदर्शक

सांगली : थोर विचारवंत, शांतिनिकेतनचे संस्थापक संचालक, प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्या विचारधारेतून सुरू असलेले शांतिनिकेतनमधील विविध उपक्रम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्शवत आहेत. राज्यभरात अशा उपक्रमांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. शालेय शिक्षणाला नवीन दिशा देणारे प्रयोगशील उपक्रम राज्यभर राबवणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले.शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ‘गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती’ या विषयावर मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री भुसे बोलत होते. शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, उपसचिव तुषार महाजन, संचालक संपत गायकवाड, उपसंचालक महेश चोथे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आदी प्रमुख उपस्थित होते.राज्यभरातील संस्था प्रतिनिधी व मंत्री महोदय यांची पहिल्यांदाच चर्चासत्राच्या निमित्ताने अनेक मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात झाली. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक व भावनिक विकासासाठी शिक्षक भरती व कला, क्रीडा शिक्षकांची भरती तातडीनेे होणे आवश्यक असल्याचे संस्था प्रतिनिधींनी मंत्री भुसे यांच्या निदर्शनास आणले. यावेळी मंत्री भुसे यांनी सकारात्मकता व्यक्त करत भरतीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.या चर्चासत्रात नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतनचे प्रतिनिधी डी. एस. माने यांनी अप्रगत विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या प्रगत संकल्पना, वक्तृत्व शैलीसाठीचा ‘बोलका’ उपक्रम, समृद्ध खेळ, सांस्कृतिक कार्यशाळा, गायन-वादन आणि मातीकाम यासारख्या संस्थेकडून वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती सादर केली.यावेळी मंत्री भुसे यांनी विविध उपक्रमांची दखल घेत कौतुक केले. विविध क्षेत्रातील उपक्रम हे शांतिनिकेतनमध्ये गेल्या वीस वर्षांपासून सुरू आहेत. याची प्रत्यक्ष दखल विभागीय शिक्षण उपसंचालक, क्रीडा संचालकांनी घेत तसा अहवाल शासनास सादर केला आहे.

अभिमानाची बाब- गौतम पाटीलशांतिनिकेतनच्या उपक्रमांना राज्यभर मान्यता मिळणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आमचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरत आहेत, याचा आनंद आहे. राज्य सरकारच्या सहकार्याने या उपक्रमांचा व्यापक प्रसार होईल, याची खात्री आहे. शैक्षणिक प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, असे संचालक गौतम पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा