शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

Shaktipeeth Highway: रेखांकन झाल्यापासून आईच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत, बाधितांनी उलगडले मनामनाचे आक्रंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 15:49 IST

कोल्हापूर : पाणी मागूनही सरकार पाणी देत नाही, त्यामुळे कोरडवाहू जमिनीवरच कसाबसा उदरनिर्वाह करतो. मात्र, एकेदिवशी मोजणी करणाऱ्यांनी आमच्या ...

कोल्हापूर : पाणी मागूनही सरकार पाणी देत नाही, त्यामुळे कोरडवाहू जमिनीवरच कसाबसा उदरनिर्वाह करतो. मात्र, एकेदिवशी मोजणी करणाऱ्यांनी आमच्या जमिनीत येऊन लाल रंगाच्या खाणाखुणा केल्या अन् अंगाचा थरकाप उडाला. जगण्याचे एकमेव साधन असलेली जमीन जाणार, या भीतीने आईच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत, वडील भावनाशून्य नजरेने पाहत असतात. त्यांचे अश्रू थांबवण्यासाठीच ३०० कि.मी. दूरहून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे, या शब्दांत धाराशिव जिल्ह्यातील संभाजी फडतारे या युवकाने शक्तीपीठ महामार्गबाधितांच्या पडद्यामागील करुण कहाणीला वाचा फोडली.शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापुरात आयोजित बैठकीत परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव, लातूर या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी महामार्गात जमीन गेली तर काय हाेईल, हे सांगताना मनामनाचे आक्रंदन उलगडले. आम्ही पाणी द्या म्हणतो, मात्र सरकार आमच्यावर प्रकल्प लादत आहे. महामार्गात सगळीच जमीन गेली तर या प्रकल्पाचे काय करू, असे सांगताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.वैराग (बार्शी, जि. सोलापूर) येथील विजयकुमार पाटील या शेतकऱ्यानेही आम्हाला न विचारता आमच्या जमिनी खरेदी करणारे, रेडिरेकनर ठरवणारे तुम्ही कोण, असा खडा सवाल केला. सख्ख्या भावाला इंचभरही जमीन आपण सोडत नाही, मग सरकारला का सोडायची, असे म्हणत त्यांनी शक्तीपीठाला इंचभरही जमीन देणार नसल्याचे ठणकावून सांगितले.

एकवेळ बलिदान देऊ; पण जमीन देणार नाहीपरभणीतील शांतीभूषण कच्छवे या युवा शेतकऱ्यानेही आई-वडिलांनी जोपासलेली जमीन डोळ्यांदेखत शक्तीपीठ महामार्गाला जात असल्याचे पाहवत नाही म्हणून या आंदोलनात उतरल्याचे सांगितले. सांगलीतील द्राक्षपट्ट्यातूनच हा महामार्ग जात असल्याने सांगत घनश्याम नलवडे यांनी सुपीक जमिनीवरचा हा नांगर बघवणारा नसल्याची खंत व्यक्त केली. अर्धापूर (जि. नांदेड) हा केळी उत्पादन करणारा जिल्हा. मात्र, या केळीच्या पट्ट्यातीलच जमीन महामार्गासाठी घेतली जात आहे. मात्र, भले बलिदान करावे लागले तरी चालेल; पण जमीन देणार नसल्याचा निर्धार येथील कचरू मुधाळे या शेतकऱ्याने केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गFarmerशेतकरी