शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
6
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
7
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
8
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
9
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
10
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
11
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
12
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
13
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
14
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
15
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
16
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
17
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
18
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
19
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
20
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता

Shaktipeeth Highway: रेखांकन झाल्यापासून आईच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत, बाधितांनी उलगडले मनामनाचे आक्रंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 15:49 IST

कोल्हापूर : पाणी मागूनही सरकार पाणी देत नाही, त्यामुळे कोरडवाहू जमिनीवरच कसाबसा उदरनिर्वाह करतो. मात्र, एकेदिवशी मोजणी करणाऱ्यांनी आमच्या ...

कोल्हापूर : पाणी मागूनही सरकार पाणी देत नाही, त्यामुळे कोरडवाहू जमिनीवरच कसाबसा उदरनिर्वाह करतो. मात्र, एकेदिवशी मोजणी करणाऱ्यांनी आमच्या जमिनीत येऊन लाल रंगाच्या खाणाखुणा केल्या अन् अंगाचा थरकाप उडाला. जगण्याचे एकमेव साधन असलेली जमीन जाणार, या भीतीने आईच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत, वडील भावनाशून्य नजरेने पाहत असतात. त्यांचे अश्रू थांबवण्यासाठीच ३०० कि.मी. दूरहून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे, या शब्दांत धाराशिव जिल्ह्यातील संभाजी फडतारे या युवकाने शक्तीपीठ महामार्गबाधितांच्या पडद्यामागील करुण कहाणीला वाचा फोडली.शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने कोल्हापुरात आयोजित बैठकीत परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव, लातूर या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी महामार्गात जमीन गेली तर काय हाेईल, हे सांगताना मनामनाचे आक्रंदन उलगडले. आम्ही पाणी द्या म्हणतो, मात्र सरकार आमच्यावर प्रकल्प लादत आहे. महामार्गात सगळीच जमीन गेली तर या प्रकल्पाचे काय करू, असे सांगताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.वैराग (बार्शी, जि. सोलापूर) येथील विजयकुमार पाटील या शेतकऱ्यानेही आम्हाला न विचारता आमच्या जमिनी खरेदी करणारे, रेडिरेकनर ठरवणारे तुम्ही कोण, असा खडा सवाल केला. सख्ख्या भावाला इंचभरही जमीन आपण सोडत नाही, मग सरकारला का सोडायची, असे म्हणत त्यांनी शक्तीपीठाला इंचभरही जमीन देणार नसल्याचे ठणकावून सांगितले.

एकवेळ बलिदान देऊ; पण जमीन देणार नाहीपरभणीतील शांतीभूषण कच्छवे या युवा शेतकऱ्यानेही आई-वडिलांनी जोपासलेली जमीन डोळ्यांदेखत शक्तीपीठ महामार्गाला जात असल्याचे पाहवत नाही म्हणून या आंदोलनात उतरल्याचे सांगितले. सांगलीतील द्राक्षपट्ट्यातूनच हा महामार्ग जात असल्याने सांगत घनश्याम नलवडे यांनी सुपीक जमिनीवरचा हा नांगर बघवणारा नसल्याची खंत व्यक्त केली. अर्धापूर (जि. नांदेड) हा केळी उत्पादन करणारा जिल्हा. मात्र, या केळीच्या पट्ट्यातीलच जमीन महामार्गासाठी घेतली जात आहे. मात्र, भले बलिदान करावे लागले तरी चालेल; पण जमीन देणार नसल्याचा निर्धार येथील कचरू मुधाळे या शेतकऱ्याने केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गFarmerशेतकरी