शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सेवा केंद्रांचा भार प्रवाशांवर नको

By admin | Updated: December 24, 2014 02:45 IST

राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मुलभूत अधिकार दिला आहे़ त्यामुळे अपघातग्रस्त प्रवाशांना तात्काळ उपचार मिळावेत

मुंबई: राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मुलभूत अधिकार दिला आहे़ त्यामुळे अपघातग्रस्त प्रवाशांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या आपत्कालीन सेवा केंद्रांचा अधिभार प्रवाशांवर टाकू नका, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी रेल्वेला बजावले़फूड प्लाझासाठी रेल्वेकडे जागा आहे़ मग सेवा केंद्रे सुरू करण्यासठी जागा का मिळत नाही़ तेव्हा प्रवाशांच्या जीवाशी न खेळता ही सेवा केंदे्र तात्काळ सुरू करावीत, असे आदेशही न्यायालयाने रेल्वेला दिले आहेत़ रेल्वे अपघातातील जखमींना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी रेल्वे स्थानकांजवळ रूग्णवाहिका व सेवा केंद्र सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने रेल्वेला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका समीर झवेरी यांनी केली आहे़ त्याची दखल घेत न्यायालयाने फटकारल्यानंतर रेल्वे व शासनाने काही रेल्वे स्थानकांजवळ रूग्णवाहिका उभ्या केल्या़या रूग्णवाहिकांचा आढावा घेण्यासाठी न्यायालयाने एका अधिकाऱ्याची नेमणूक केली़ या अधिकाऱ्याने यातील सर्वच रूग्णवाहिका अत्याधुनिक नसल्याचा अहवाल न्यायालयाला दिला़ त्यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली़त्याचवेळी झवेरी यांनी एका प्रवाशाला वेळेवर उपचार मिळाले नसल्याचे निदर्शनास आणले़ रेल्वेने सेवा केंद्राचा खर्च प्रवाशांकडून वसूल करणार असल्याचे सांगितले़ त्यास नकार देत न्यायालयाने वरील आदेश दिले व सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली़ (प्रतिनिधी)