शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

“सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना घरी बोलावले असेल तर चूकच”; वकिलांनी थेट कायदाच सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 20:36 IST

PM Narendra Modi Offer Ganpati Aarti At CJI DY Chadrachud Home: घटनांच्या अनेक तत्त्वांना तिलांजली दिली जात आहे. लोकशाही सुदृढ करण्याची जबाबदारी पंतप्रधान आणि सरन्यायाधीशांवर असते, असे सांगत ज्येष्ठ वकिलांनी कायदा काय सांगतो, याची माहिती दिली.

PM Narendra Modi Offer Ganpati Aarti At CJI DY Chadrachud Home: एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या घरी गणपती दर्शनाला जाणे यात काही चूक नाही. परंतु, इथे एक पंतप्रधान आहेत आणि दुसरे सरन्यायाधीश आहेत. ही दोन्ही घटनात्मक पदे आहेत. त्यामुळे काही विशिष्ट त्यांच्या जबाबदाऱ्या असतात. घटनांच्या अनेक तत्त्वांना तिलांजली दिली जात आहे, अशी प्रतिक्रिया देत ज्येष्ठ वकील उल्हास बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले आणि आरती करण्यावर टीका केली आहे. 

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या घरच्या गणपतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दर्शन घेतले आणि आरती केली, याबाबत देशभरात चर्चा रंगली आहे. सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधानांनी गणेशाची आरती केल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबत मोठी चर्चा आहे. पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणे प्रोटोकॉलला धरून आहे का, अशी विचारणा करत विरोधकांनी टीका सुरू केली आहे. यासंदर्भात ज्येष्ठ वकील उल्हास बापट यांनी थेट कायदा काय सांगतो, याबाबत माहिती दिली.

लोकशाहीत न्यायव्यवस्था स्वतंत्र असणे अपेक्षित आहे

लोकशाहीत न्यायव्यवस्था स्वतंत्र असणे अपेक्षित आहे. राज्यपाल असो, विधानसभा किंवा लोकसभेचे अध्यक्ष असो, केंद्रीय निवडणूक आयोग किंवा सर्वोच्च न्यायालय यांनी अंपायरसारखे काम करावे, अशी अपेक्षा आहे. परंतु, प्रत्यक्षात तसे घडत नाही. घटनेत सर्व गोष्टी लिहिलेल्या नसतात. प्रथा, परंपरा आणि नैतिकता यांनी घटना उत्क्रांत होत गेलेली असते. सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना बोलावले असेल तर ही चूक आहे. परंतु, दुसऱ्या बाजूला पंतप्रधान आपणहून त्यांच्याकडे गेले असतील, तर सरन्यायाधीशांनी अशी भेट चुकीची आहे हे सांगायला हवे. लोकशाही सुदृढ करण्याची जबाबदारी पंतप्रधान आणि सरन्यायाधीशांवर असते, असे उल्हास बापट म्हणाले.

दरम्यान, प्रसिद्धीपासून न्यायाधीशांनी दूर राहावे असे म्हणले गेले आहे. याकडे दुर्लक्ष झाले आहे. राज्यपाल, विधानसभेचे अध्यक्ष ही राजकीय पदे आहेत. महाराष्ट्राचे स्पीकर मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात. पत्रकार परिषद घेतात, हे अजिबात अपेक्षित नाही. सर्वोच्च न्यायालयाची बाब वेगळी आहे. सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना घरी बोलावले असेल तर चूकच आहे, असे उल्हास बापट यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :ganpatiगणपती 2024Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूड