शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

महाराष्ट्राच्या राजकारणातील दुसरे मोठे बंड, शदर पवार यांनी केले होते पहिले बंड

By वसंत भोसले | Updated: November 24, 2019 07:12 IST

सत्तांतर किंवा बंडखोरी दोनवेळाच महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यत घडली आहे. ही दोन्ही बंडे पवार यांनीच केली आहेत.

- वसंत भोसलेकोल्हापूर : सत्तांतर किंवा बंडखोरी दोनवेळाच महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यत घडली आहे. ही दोन्ही बंडे पवार यांनीच केली आहेत. फरक एवढाच की, पहिले बंड शरद पवार यांनी १९७८ केले. वसंतदादांचे सरकार पाडून पुलोद सरकार स्थापन केले. तर दुसरे बंड त्यांचे पुतणे अजित पवार यांनी शनिवारी केले आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपने सरकार स्थापन केले. आता पुतण्याचे हे बंड त्यांच्यावरच बुमरॅँगप्रमाणे उलटविण्याचे आव्हान चुलते पवार यांच्यासमोर आहे.पहिल्या बंडखोरीत शरद पवार यांनी वयाच्या अडतिसाव्या वर्षी जुलै १९७९ मध्ये वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकारच्या विरोधात बंड केले होते. या मंत्रिमंडळात शरद पवार  उद्योग व कामगार खात्याचे मंत्री होते. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत रेड्डी काँग्रेसमधून बाहेर पडून जनता पक्षाच्या सहकार्याने पुरोगामी लोकशाही दल स्थापन करून मुख्यमंत्रीपद हस्तगत केले होते.महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेत फूट पडल्याच्या दोन घटनांनी राजकीय भूकंप झाले होते. १९९१ मध्ये शिवसेना नेते छगन भुजबळ यांनी पक्षप्रमुखांविरुद्ध नेतृत्वाची संधी न मिळाल्याने बंड केले होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी भुजबळ यांच्यावर ‘लखोबा लोखंडे’ म्हणून टीकास्त्र सोडले होते. शिवसैनिकांनी अनेक हल्ले केले. मात्र, भुजबळ डगमगले नाहीत. बंडखोरांच्या भूमिकेत त्यांनी बहुजन समाजाचे राजकारण केले. त्यांच्याबरोबर सोळा आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.शिवसेनेविरुद्ध दुसरी बंडखोरी २००५ मध्ये नारायण राणे यांनी केली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सेनेचे नेतृत्व देण्याच्या वादातून हे बंड झाले. राणे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन सेनेला आव्हान दिले. पोटनिवडणुकीत दणकेबाज विजय मिळविला. यावेळी ठाकरे यांनी राणे यांच्यावर ‘दीडफुट्या’ म्हणून जोरदार हल्ला चढविला होता. मात्र, त्यांचे बंड मोडता आले नाही. शरद पवार यांना काँग्रेस पक्षात अखिल भारतीय पातळीवर नेतृत्वाची संधी मिळत नाही, या मुद्द्यावर सोनिया गांधी यांच्या परकीय नागरिकत्वाचा मुद्दा उकरून काढून बंड केले. पक्षातून हकालपट्टी होताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची १० जून १९९९ रोजी स्थापना केली. पक्ष यशस्वीपणे चालवित पंधरा वर्षे महाराष्ट्रात आघाडीच्या सरकारमध्ये काम केले. त्यांनी स्वत: दहा वर्षे केंद्रात कृषिमंत्री म्हणून काम केले.बंडाचे पडसादजनता पक्ष, फुटीर काँग्रेस गट, शेकाप आणि अपक्षांच्या सहकार्याने शरद पवार यांनी १८ जुलै १९७९ रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यशवंतराव चव्हाण यांच्या पाठिंब्यामुळेच शरद पवार यांनी बंड केल्याने वसंतदादांविरुद्ध यशवंतराव चव्हाण यांचा पुढे पाच वर्षे संघर्ष होत राहिला. त्याचे पडसाद अनेक वर्ष उमटत राहिले.बंडाची पुनरावृत्तीमहाराष्ट्रात एकेचाळीस वर्षांपूर्वी पहिले राजकीय बंड करणारे शरद पवार यांना पुतणे अजितदादा यांच्या बंडाला सामोरे जावे लागले आहे. विशेष म्हणजे पवार यांच्या बंडाने वसंतदादा पाटील यांचे सरकार पडले होते आणि त्यांचे स्वत:चे सरकार स्थापन झाले होते. अजित पवार यांच्या बंडाने भाजपचे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रAjit Pawarअजित पवार