शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

स्कील्ड महाराष्ट्र हवा की स्कॅम महाराष्ट्र?

By admin | Updated: October 8, 2014 00:45 IST

राज्यात १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला सत्तेतून दूर करा, तुम्हाला ‘स्कील्ड’ महाराष्ट्र हवा की ‘स्कॅम’ महाराष्ट्र हवा, हे तुम्ही ठरवा,

मोदींचा नागपुरात सवाल : सत्ता आल्यास विकासनागपूर : राज्यात १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला सत्तेतून दूर करा, तुम्हाला ‘स्कील्ड’ महाराष्ट्र हवा की ‘स्कॅम’ महाराष्ट्र हवा, हे तुम्ही ठरवा, काँग्रेसने घोटाळे दिले, भाजपचे सरकार आले तर कुशल महाराष्ट्र (स्कील्ड महाराष्ट्र)घडवू , असा विकासाचा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरात दिला. नागपूर जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी यांची येथील कस्तूरचंद पार्कवर जाहीर सभा झाली. त्यावेळी मोदी बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रुडी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, खासदार अजय संचेती उपस्थित होते.भाषणाची सुरुवात मराठीतून करीत मोदी यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रचार काळातील सभांना मिळणाऱ्या लोकांच्या प्रतिसादाचा उल्लेख केला. लोकसभेच्या तुलनेत आता लोकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेतला तर हवेची दिशा कोणत्या बाजूने आहे, हे कळून चुकेल. राजकीय पंडितांनी याचा अंदाज घ्यावा, अन्यथा लोकसभेप्रमाणे त्यांचे अंदाज चुकतील आणि लोकसभेप्रमाणेच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला संपूर्ण बहुमत मिळेल, असे मोदी म्हणाले.मोदी यांनी राज्यातील आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. १५ वर्षांपासून आघाडी सरकारकडून लूट सुरू आहे. सरकार शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाही. त्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. या काळात दोन पिढ्या बरबाद झाल्या. महाराष्ट्र समृद्ध असेल तर देश समृद्ध होईल. काँग्रेस-राष्ट्रवादीने आतापर्यंत घोटाळ्याचे (स्कॅम) सरकार दिले, भाजपला सत्ता दिली तर आम्ही ‘स्कील्ड’ सरकार देऊ. १५ वर्षांच्या पापी सरकारला १५ तारखेला मतदान करून दूर करा, असे आवाहन मोदी यांनी केले.केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर स्कील्ड डेव्हलपमेंटसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू केले. नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यात यासंदर्भात एक सामंजस्य करारही करण्यात आला. त्यानुसार भारताने हजार तज्ज्ञांची मागणी अमेरिकेला केली आहे. त्यामुळे तरुणांना रोजगार मिळेल व त्यातून एका कुशल महाराष्ट्राची जडणघडण होईल. केंद्राची विकासाच्या क्षेत्रात गतीने वाटचाल सुरू आहे. हे करताना आम्हाला महाराष्ट्राला सोबत घ्यायचे आहे. दिल्लीच्या मदतीने महाराष्ट्राचे चित्र पालटून देऊ, असे मोदी म्हणाले.मुख्यमंत्र्यांवर टीकाजो मुख्यमंत्री माझ्या बाजूला बसायला घाबरतो तो सोबत काम कसे करेल, असा टोला मोदी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता लगावला. नागपुरातील मेट्रो रेल्वेच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री का आले नाही? केंद्र आणि राज्याने ‘टीम इंडिया’ म्हणून काम करावे. पक्ष वेगवेगळे असू शकतात, पण देश एक आहे. एकसंघपणे काम करण्याची संस्कृती रुजविण्याचे आमचे प्रयत्न आहे. भाजपने कधीही राजकीय भेदभाव केला नाही. देशाचे पंतप्रधान दिवंगत पंडित नेहरू यांच्या जयंतीपासून म्हणजे १४ नोव्हेंबरपासून तर माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंती दिनापर्यंत म्हणजे १९ नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण भारतात शाळाशाळांमध्ये मुलांना स्वच्छतेची शिकवण देणारी मोहीम राबविली जाईल व २०२२ पर्यंत प्रत्येक कुटुंबाला घर मिळेल अशी योजना राबविली जाईल, असे मोदी म्हणाले.देशात ६० वर्षे काँग्रेसचे सरकार होते. पण ते कधीही त्यांच्या कामाचा हिशेब देत नाही. पण आम्हाला ते ६० दिवसांच्या कामाचा हिशेब मागतात. ६० दिवसांत केंद्र सरकारने अनेक कामे केली. कैलास मानसरोवर यात्रेसाठी रस्ता सुरू करण्यास चीनने मान्यता दिली; त्यामुळे वृद्धांनासुद्धा आता मोटारीने तेथे जाता येईल. पूर्वी हे शक्य नव्हते. भारताचे अमेरिकेत नाव झाले. लोकांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले. महाराष्ट्राची सत्ता भाजपला मिळाली तर देशातही या राज्याचा लौकिक वाढविला जाईल, असे मोदी म्हणाले.मोदी यांनी जाहीर सभेत चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. अहिर यांनी कोळसा घोटाळा संसदेत उघड केला तर फडणवीस यांनी राज्याच्या विधानसभेत अनेक घोटाळे उघड केले. फडणवीस यांना त्यांच्या उत्कृष्ट संसदीय कामगिरीबद्दल पुरस्कारही मिळाला. अशा तरुण नेत्याला निवडून देणाऱ्या मतदारांचा मी आभारी आहे, असे मोदी म्हणाले.सुरुवातीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, देवेंद्र फडणवीस, सुलेखा कुंभारे यांची भाषणे झाली. व्यासपीठावर महापौर प्रवीण दटके, आमदार व भाजपचे शहर अध्यक्ष कृष्णा खोपडे यांच्यासह पक्षाचे उमेदवार अनुक्रमे विकास कुंभारे, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, चंद्रशेखर बावनकुळे, समीर मेघे, सुधीर पारवे, आशिष देशमुख, मल्लिकार्जुन रेड्डी, डॉ. मिलिंद माने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गिरीश व्यास यांनी तर आभार आमदार अनिल सोले यांनी मानले. (प्रतिनिधी)