शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

Savitribai Phule Birth Anniversary: क्रांतिसूर्य ज्योतिबाची सौभाग्यवती, तिने पेटविल्या ज्ञानज्योती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 13:38 IST

आज भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाज सेविका, कवियित्री असलेल्या सावित्रीबाई ज्‍योतिराव फुले यांची जयंती. 3 जानेवारी 1831 ला साताऱ्यातील नायगाव येथे खंडोजी नेवासे आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी सावित्रीबाईंचा जन्म झाला. 

आज भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाज सेविका, कवियित्री असलेल्या सावित्रीबाई ज्‍योतिराव फुले यांची जयंती. 3 जानेवारी 1831 ला साताऱ्यातील नायगाव येथे खंडोजी नेवासे आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी सावित्रीबाईंचा जन्म झाला. सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला.

ज्योतिबा फुले म्हणजे एक थोर व्यक्तिमत्तव. महात्मा फुलेंना माहीत होते की, शिक्षणामुळेच माणूस गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो. त्यातून जर आजच्या स्त्रीला तिचे हक्क मिळवून द्यायचे असतील तर त्यासाठी तिमे शिक्षण घेणं गरजेचं आहे. शिक्षणामुळेच त्या अन्यायाशी प्रतिकार करण्यासाठी सक्षम होऊ शकतील, असा त्यांना विश्वास होता. पण त्यावेळी महिला आणि मुलींना शिकवण्यासाठी एका महिला शिक्षिकेची गरज होती. अशावेळी महात्मा फुलेंनी स्वतः सावित्रिबाईंना शिकविण्याची जबाबदारी घेतली. 

लग्नापूर्वी काहीही न शिकलेल्या सावित्रीबाईंनी लग्नानंतर एका वर्षातच ज्योतिबांच्या प्रेरणेने शिक्षण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुलींसाठी शिक्षणाची सोय नव्हती. आधी पती महात्मा फुलेंकडून शिकवण्या घेतल्यानंतर सावित्रीबाईंनी नॉर्मल स्कूल, छबिलदासवाडा, पुणे येथे अंकगणित, बाराखडीसोबतच इतर विषयांच्या परिक्षा दिल्या. सर्व शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1848मध्ये त्यांनी भिडेवाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यानंतर याच शाळेत सावित्रीबाईंनी प्रथम शिक्षिका व नंतर मुख्याध्यापिका म्हणून काम केले. पुढे पती महात्मा फुलेंच्या साथीने सावित्रीबाईंनी शिक्षणाचा वसा असाच सुरू ठेवला. पुढे महात्मा फुलेंनी जे समाजसुधारणेचे कार्य केले त्यामध्ये सावित्रीबाईंनी त्यांना मोलाची साथ दिली. मग बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना असो किंवा शेतकरी व शेतमजुरांसाठी सुरू करण्यात आलेली रात्रशाळा. काही सामजकंटकांनी त्यांना घरातून हाकलूनही लावले पण तरिदेखील न डगमगता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी समाजकार्य थांबवले नाही. सावित्रीबाईंनी महात्मा फुलेंच्या साथीने आपलं कार्य सुरूचं ठेवलं. त्या जे शिकल्या, अनुभवलं ते त्यांनी वेळोवेळी कवितेतून मांडूनदेखील ठेवलं. 

एवढचं नव्हे तर या दाम्पत्याने जातिवादाविरोधातही बंड पुकारला होता. त्यांनी आपल्या घरातील स्वतःची विहिर सर्वांसाठी खुली करून दिली. महिला अधिकारासाठी संघर्ष करणाऱ्या सावित्रीबाईंनी विधवांसाठी एका केंद्राची स्थापना करून त्यांना पुनर्विवाहासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते. 1897मध्ये प्लेगच्या साथीने थैमान घातलेलं असताना त्यांनी पुण्यामध्ये आपल्या मुलाला सोबतीला घेऊन एका हॉस्पिटलची स्थापना केली. तिथे त्यांनी समाजात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांवर उपचार केले. लोकांवर उपचार करत असतानाच स्वतः या रोगाच्या कचाट्याट सापडून सावित्रीबाईंचं निधन झालं. 

खरं तर सावित्रीबाईंनी प्रसंगी शेणगोळे देखील खाल्ले. त्यामुळेच आजच्या मुली आणि महिला स्वतंत्रपणे वावरू शकत आहेत आणि शिक्षण घेऊ शकत आहेत, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. म्हणून प्रत्येक महिला ही त्या सावित्रीचीच लेक आहे जिने स्वतः खचता खाऊन शिक्षणाचे दरवाजे त्यांचा उद्धार होण्यासाठी खुले करून दिले. 

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेsocial workerसमाजसेवकTeacherशिक्षकMaharashtraमहाराष्ट्र