शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Savitribai Phule Birth Anniversary: क्रांतिसूर्य ज्योतिबाची सौभाग्यवती, तिने पेटविल्या ज्ञानज्योती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 13:38 IST

आज भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाज सेविका, कवियित्री असलेल्या सावित्रीबाई ज्‍योतिराव फुले यांची जयंती. 3 जानेवारी 1831 ला साताऱ्यातील नायगाव येथे खंडोजी नेवासे आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी सावित्रीबाईंचा जन्म झाला. 

आज भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाज सेविका, कवियित्री असलेल्या सावित्रीबाई ज्‍योतिराव फुले यांची जयंती. 3 जानेवारी 1831 ला साताऱ्यातील नायगाव येथे खंडोजी नेवासे आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी सावित्रीबाईंचा जन्म झाला. सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला.

ज्योतिबा फुले म्हणजे एक थोर व्यक्तिमत्तव. महात्मा फुलेंना माहीत होते की, शिक्षणामुळेच माणूस गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो. त्यातून जर आजच्या स्त्रीला तिचे हक्क मिळवून द्यायचे असतील तर त्यासाठी तिमे शिक्षण घेणं गरजेचं आहे. शिक्षणामुळेच त्या अन्यायाशी प्रतिकार करण्यासाठी सक्षम होऊ शकतील, असा त्यांना विश्वास होता. पण त्यावेळी महिला आणि मुलींना शिकवण्यासाठी एका महिला शिक्षिकेची गरज होती. अशावेळी महात्मा फुलेंनी स्वतः सावित्रिबाईंना शिकविण्याची जबाबदारी घेतली. 

लग्नापूर्वी काहीही न शिकलेल्या सावित्रीबाईंनी लग्नानंतर एका वर्षातच ज्योतिबांच्या प्रेरणेने शिक्षण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुलींसाठी शिक्षणाची सोय नव्हती. आधी पती महात्मा फुलेंकडून शिकवण्या घेतल्यानंतर सावित्रीबाईंनी नॉर्मल स्कूल, छबिलदासवाडा, पुणे येथे अंकगणित, बाराखडीसोबतच इतर विषयांच्या परिक्षा दिल्या. सर्व शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1848मध्ये त्यांनी भिडेवाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यानंतर याच शाळेत सावित्रीबाईंनी प्रथम शिक्षिका व नंतर मुख्याध्यापिका म्हणून काम केले. पुढे पती महात्मा फुलेंच्या साथीने सावित्रीबाईंनी शिक्षणाचा वसा असाच सुरू ठेवला. पुढे महात्मा फुलेंनी जे समाजसुधारणेचे कार्य केले त्यामध्ये सावित्रीबाईंनी त्यांना मोलाची साथ दिली. मग बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना असो किंवा शेतकरी व शेतमजुरांसाठी सुरू करण्यात आलेली रात्रशाळा. काही सामजकंटकांनी त्यांना घरातून हाकलूनही लावले पण तरिदेखील न डगमगता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी समाजकार्य थांबवले नाही. सावित्रीबाईंनी महात्मा फुलेंच्या साथीने आपलं कार्य सुरूचं ठेवलं. त्या जे शिकल्या, अनुभवलं ते त्यांनी वेळोवेळी कवितेतून मांडूनदेखील ठेवलं. 

एवढचं नव्हे तर या दाम्पत्याने जातिवादाविरोधातही बंड पुकारला होता. त्यांनी आपल्या घरातील स्वतःची विहिर सर्वांसाठी खुली करून दिली. महिला अधिकारासाठी संघर्ष करणाऱ्या सावित्रीबाईंनी विधवांसाठी एका केंद्राची स्थापना करून त्यांना पुनर्विवाहासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते. 1897मध्ये प्लेगच्या साथीने थैमान घातलेलं असताना त्यांनी पुण्यामध्ये आपल्या मुलाला सोबतीला घेऊन एका हॉस्पिटलची स्थापना केली. तिथे त्यांनी समाजात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांवर उपचार केले. लोकांवर उपचार करत असतानाच स्वतः या रोगाच्या कचाट्याट सापडून सावित्रीबाईंचं निधन झालं. 

खरं तर सावित्रीबाईंनी प्रसंगी शेणगोळे देखील खाल्ले. त्यामुळेच आजच्या मुली आणि महिला स्वतंत्रपणे वावरू शकत आहेत आणि शिक्षण घेऊ शकत आहेत, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. म्हणून प्रत्येक महिला ही त्या सावित्रीचीच लेक आहे जिने स्वतः खचता खाऊन शिक्षणाचे दरवाजे त्यांचा उद्धार होण्यासाठी खुले करून दिले. 

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेsocial workerसमाजसेवकTeacherशिक्षकMaharashtraमहाराष्ट्र