शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
2
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
3
“इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १०० दिवसांत इलेक्टोरल बॉण्डचा तपास करणार”: अरविंद केजरीवाल
4
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
5
IPL 2024: दोन वर्ष, दोन जिव्हारी लागणारे पराभव... एकाच मैदानाने दोन वेळा तोडलं Virat Kohli चं स्वप्न
6
Smriti Irani : "CM हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन, केजरीवाल गप्प का?"; स्मृती इराणींचं टीकास्त्र
7
Rajkummar Rao : "आता तो माझ्या आयुष्याचा..."; राजकुमार राव आईच्या आठवणीत आजही करतो दर शुक्रवारी व्रत
8
"न्याय झाल्यासारखा दिसला पण पाहिजे"; मतांच्या आकडेवारीवरुन सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाला विनंती
9
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
10
Gold Silver Price 23 May: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात सोनं ₹१२८९, चांदी ₹३४७६ स्वस्त 
11
...म्हणून मला भारतीय संघाचा कोच व्हायचं नाही; Ricky Ponting नं सांगितलं कारण
12
"... तो रिपोर्ट खोटा आणि निराधार," कोळसा पुरवठा घोटाळ्याच्या आरोपावर Adani Groupचं स्पष्टीकरण
13
"पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..."
14
Aadhar Card : १४ जूननंतर जुने आधार कार्ड खरोखरच निरुपयोगी होईल का? जाणून घ्या संपूर्ण सत्य
15
Tata Safari Review: टाटाची सफारी, चिखलात घातली, डोंगरात पळविली, १००० किमी चालवली; मायलेज, फिचर्स कशी वाटली...
16
राजकुमार रावचा 'गजगामिनी वॉक' पाहून पोट धरुन हसाल, 'हीरामंडी'च्या बिब्बोजानची केली कॉपी
17
१७ हंगाम अन् ६ संघ! Dinesh Karthik च्या IPL कारकिर्दीला पूर्णविराम
18
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
19
भारत सरकारने सत्या नडेलांना ठोठावला लाखोंचा दंड! दोन महिन्यांत पैसे भरण्याचे आदेश
20
Fact Check: प्रशांत किशोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला? व्हायरल होत असलेले पत्र आहे खोटे!

लया जाई क्षीण भार..पावले चालती पांडुरंग होऊनिया..! संत ज्ञानेश्वरांची पालखी वाल्हे मुक्कामी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 8:34 PM

माऊलींच्या पालखीचा जेजुरी ते वाल्हे हा मार्ग सगळ्यात जवळचा म्हणजेच एकूण बारा किलोमीटरचा असल्याने पालखी दुपारीच पालखी स्थळावर पोचवली.. 

ठळक मुद्देवैष्णवांच्या शिस्तीचे दर्शन: दुपारीच पालखी पोहचली मुक्कामीसमाज आरती होऊन माऊलींच्या पादुकांचे दर्शन सुरूशासनाने वाटप केलेले रेनकोट घातलेले वारकरी

अमोल अवचिते 

वाल्हे:  कारणे पंढरपूर हो वारी !            आनंदी सोहळा  संसारी !            गजर नाम कृष्णहरी !            परब्रम्ह भेट !!  येळकोट येळकोट, जय मल्हार, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम , पंढरीनाथ भगवान की जय अशा जय घोषात जेजुरीचा मुक्काम उरकून वाल्हेकडे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सकाळी निघाली. वाल्हे येथे दुपारी एक वाजून तीस मिनिटाच्या सुमारास मुक्कामाला विसावली. दुपारी होणाऱ्या समाज आरतीसाठी मोठ्या संख्येने वैष्णवजन पालखी स्थळावर आले होते.   माऊलींच्या पालखीचा जेजुरी ते वाल्हे हा मार्ग सगळ्यात जवळचा म्हणजेच एकूण बारा किलोमीटरचा असल्याने पालखी दुपारीच पालखी स्थळावर पोचवली.    दुपारीच माऊलींची पालखी स्थळावर पोहचल्याने समाज आरतीसाठी स्थानिक  भक्तांनी आणि वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. पालखीच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढल्या होत्या. टाळकरी, मृदुंगवादक, वारकरी पालखी स्थळावर गोलाकार बसले होते. आरती होण्यापूर्वी माऊलींच्या चोपदाराने दंडक वर केल्यानंतर सर्वत्र शांतता पसरली. यावरून शिस्तीचे उत्तम उदाहरण दिसून आले. शांतता पसरल्यानंतर पुढील नियोजनाच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर समाज आरती होऊन माऊलींच्या पादुकांचे दर्शन सुरू झाले.   डोंगरातील हिरळवलीने नटलेल्या दौंडज खिंडीत न्याहारीसाठी पालखी थांबली होती. त्याचवेळी पावसाच्या हलक्यासरी कोसळत होत्या. वारकरी ठिकठिकाणी बसले असता खिंड मोहक दिसत होती.    पाऊस पडत असला तरी हरिनामाच्या गजरात खिंडीत पालखीची वाटचाल अभंगात लीन होऊन शिस्तीत चालली होती.    वाहतुक नियमाचे उत्तम उदाहरण यावेळी या मार्गावर दिसून आले. पोलिसांनी सर्वांना समान नियम लावल्यामुळेच वाहतुक सुरळीत सुरू होती. असे एका वारकऱ्यांने सांगितले. पाऊस पडत असताना शासनाने वाटप केलेले रेनकोट वारकऱ्यांनी घातलेले दिसून आले. पालखी वाल्हे मुक्कामी असल्यामुळे राहुट्या उभारल्या जात  होत्या. सेवेकरी जेवणाची व्यवस्था पाहत होते. अनेक ठिकणी दुपारी जेवणासाठी पिठलं भाकरी करण्यात आली होती. शासनाकडून शिस्तबध नियोजन करण्यात आले होते. 

वाटमारी करणारा ते महाकाव्य लिहिणारा महाकवीपुरातन काळी वाल्ह्या कोळी वाल्हे याठिकाणी राहून वाटसरूंना मारत असे. त्याच्या नावावरून या भागाला वाल्हे हे नाव पडले. या गावाच्या उत्तरेस सात डोंगर दिसतात.ते वाल्ह्या कोळयाचे रांजण असल्याचे सांगितले जाते. वाटमारी करत असताना वाल्ह्याला नारदमुनींचा अनुग्रह झाला आणि त्याचा वाल्मिकी झाला. त्यानेच पुढे रामायण हे महाकाव्य लिहीले. मंगळवारी (आज) वाल्हेतुन सकाळी पालखी लोणंदला निघणार आहे. या मार्गात नीरा नदीवर ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात येणार आहे. 

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी