शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"चिरंजीवाचे प्रताप वडिलांनी एकदा समजून घ्यावेत"; वर्षा बंगल्याचा उल्लेख करत राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 11:09 IST

वर्षा बंगल्यावर लुटीचा माल जमा होतो आणि ते मोजण्याचे काम श्रीकांत शिंदे करतात असा आरोप संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut On Shrikant Shinde : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये इनकमिंग सुरु झालं आहे. अनेक दिग्गज नेते पक्षांना सोडून विरोधी किंवा सत्ताधारी पक्षात जाताना दिसत आहेत. अशातच कल्याण डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला आहे. शिंदेच्या गटाचे युवासेना प्रदेश सचिव व केडीएमसीचे माजी सभापती दीपेश म्हात्रे यांनी रविवारी ठाकरे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांच मुख्यमंत्र्यांचे कारटे असा उल्लेख केला होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट बापाशी भिडा असं आव्हान उद्धव ठाकरेंना दिलं होतं. यावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला. शिंदेच्या गटाचे युवासेना नेते दीपेश म्हात्रेंनी मातोश्रीवर जात ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू आणि माजी नगरसेवक जयेश म्हात्रे, माजी नगरसेविका रत्ना म्हात्रे आणि जवळपास पाच माजी नगरसेवकांनी मशाल हाती घेतली. दीपेश म्हात्रे हे खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जायचे. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला मोठा धक्का बसला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्र्यांचं कारटं असा उल्लेख केला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलाशी काय भिडता? बापाशी भिडा असं आव्हान उद्धव ठाकरेंना दिलं होतं. मुख्यंमत्री शिंदेंनी केलेल्या टीकेवर खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

"आम्ही बापाशी, मुलाशी, तुमच्या गुंडांशी आणि पोलिसांशी भिडू. चिंता करु नका आताही भिडतो आहोत. तुमच्याकडे मोदी आणि शाहांची कवच कुंडले आहेत. ही कवच कुंडले आहेत म्हणून तुमचा आवाज आणि मस्ती सुरु आहे. ज्या दिवशी कवच कुंडले काढली जाईल तेव्हा तुम्ही भिडण्याची भाषा करणार नाही," असं संजय राऊत म्हणाले.

"उद्धव ठाकरेंनी त्यांच्या चिरंजीवाविषयी वक्तव्य केलं आहे. पण त्यांच्या चिरंजीवाचे प्रताप काय आहेत हे आपल्या वडिलांनी एकदा समजून घ्यावेत. मंत्रालयातल्या प्रशासनावर, ठेकेदारांवर ज्या पद्धतीची अरेरावी हे चिरंजीव करत आहेत. राज्याच्या इतिहासात वर्षा बंगल्यातून अशा प्रकारची अरेरावी कधी झाली नव्हती. मुख्यमंत्री हे ४० टक्के असतील तर त्यांचे चिरंजीव हे २० टक्के आहेत. वर्षा बंगल्यावर लुटीचा माल जमा होतो आणि ते मोजण्याचे काम चिरंजीव आणि त्यांची टोळी करते हे सगळ्यांना माहिती आहे. पोलिसांना, अधिकाऱ्यांना धमकावण्याचे काम वर्षा बंगल्यातून त्यांचे चिरंजीव करत आहेत", असेही संजय राऊतांनी म्हटलं. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sanjay Rautसंजय राऊतShrikant Shindeश्रीकांत शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे