शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
2
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
3
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
4
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
5
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
6
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
7
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
8
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
9
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
10
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
11
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
12
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
13
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
14
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
15
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
16
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
17
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
18
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
19
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
20
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचा पिकांवर घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 23:41 IST

खरीप हंगामात समाधानकारक पाऊस येईल, असे भाकित हवामान खात्याने वर्तविले होते; पण खंड पाडत पावसाने तुरळकच हजेरी लावली.

ठळक मुद्देकपाशीची बोंडे गळाली : सोयाबीनच्या सवंगणीवरही संकट, उत्पादनात घट

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खरीप हंगामात समाधानकारक पाऊस येईल, असे भाकित हवामान खात्याने वर्तविले होते; पण खंड पाडत पावसाने तुरळकच हजेरी लावली. आता सोयाबीन सवंगणीवर आले असताना मात्र पावसाला जोर आला आहे. मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाचे आगमन होत आहे. परिणामी, कपाशीचे बोंड गळत असून सोयाबीनची सवंगणी रखडली आहे. यात शेतकºयांचे प्रचंड नुकसान होत आहे.
खरीप हंगामात शेतकºयांना पावसाची प्रतीक्षा करावी लागली. गरज असताना पावसाचे आगमन झाले नाही; पण आता सोयाबीनची कापणी, सवंगणी सुरू असताना पावसाने जोर धरला आहे. यामुळे अनेक शेतकºयांचे सोयाबीन ओले झाले. शिवाय झाडावरील कपाशीची बोंडे, फुटलेला कापूस गळत आहे. यामुळे शेतकºयांचे नुकसान होत असून भरपाईची मागणी होत आहे.

परतीच्या पावसाने कापलेले सोयाबीन पाण्यात
विजयगोपाल - ऐन सोयाबीन काढण्याच्या वेळी धो-धो पाऊस बरसत असल्याने शेतकºयांचे प्रचंड नुकसान होत आहे. कापलेच्या सोयाबीनच्या कवट्याला जमिनीवरील पाणी मिळत असल्याने सोयाबीनच्या शेंगाच्या दान्याला कोंब फुटत आहे. कापलेले सोयाबीन सडण्यास सुरूवात झाली आहे. यातही दोन ते तीन दिवसांत पाऊस बंद न झाल्यास एक लाख हेक्टरवरील सोयाबीन सडण्याचा धोका आहे.
परतीच्या पावसामुळे शेतकरी धास्तावला आहे. संकटाचा सामना करीत शेतातील सोयाबीन काढणीला सुरूवात केली आहे. येथील शेतकरी करणसिंह ताटू, दिलीप श्रीराव, संतोष पेटकर यांनी कापलेले सोयाबीन थ्रेशरने शनिवारी काढले; पण सायंकाळी पाऊस आला. यामुळे सुमारे १५ ते २० पोते सोयाबीन शेतातच ओले झाले. शेतात बैलबंडी व ट्रॅक्टर जात नसल्याने सोयाबीन आणण्यास शेतकºयांना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
सततच्या पावसाने सोयाबीनच्या शेंगा सडण्यास सुरूवात झाली आहे. अनेक शेतातील सोयाबीनच्या शेंगाच्या दान्यातील कोंब फुटत आहे. अशा स्थितीत प्रशासनाने धीर देणे गरजेचे असताना सर्व आॅलवेल असल्याचा अहवाल दिला आहे. सध्या शेतात कापलेले सोयाबीनचे ढिग लागले आहे. काहींचे सोयाबीन काढणीच्या प्रतीक्षेत आहे; पण पावसामुळे डोळ्यादेखत पीक उद्ध्वस्त होत आहे. सोयाबीन झाकण्यासाठी पूरेशी व्यवस्था नसल्याने शेतकरी हतबल आहे. कापसाचे बोंड सडत असून फुटलेला कापूस ओला झाला आहे.
महसूल प्रशासन पैसेवारी जाहीर करते. तत्पूर्वी, गावांतून तज्ज्ञ कमिटीचा अहवाल घेतला जातो; पण यंदा कागदावरच पैसेवारी काढल्याचे दिसते. याबाबत तलाठ्यांना विचारले असता वरून आदेश असल्याचे सांगितले जात आहे.

सोयाबीनच्या शेंगांना फुटले कोंब
विरूळ (आकाजी) - कापणीच्या वेळेवर पाऊस येत असल्याने सोयाबीनचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. काहींनी सोयाबीन कापून गंजी लावल्या तर काहींची कापणी व्हायची आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे सातत्य असल्याने कापलेल्या तथा झाडावरील सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटल्याचे दिसून येत आहे. विरूळ तथा परिसरातील अनेक गावांत हा प्रकार पाहावयास मिळतो. यात शेतकºयांचे नुकसान होत असून पावसामुळे हाती आलेले पीक वाया जाणार असल्याचेच दिसून येत आहे.