शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील मृत्यूचे प्रमाण कमी करणे प्राथमिकता - नितिन गडकरी

By admin | Updated: September 13, 2016 17:01 IST

महामार्गावर अपघाताची ठिकाणं शोधून त्याठिकाणी क्रॅश बॅरिअर सोलार लाईटचा वापर करुन स्पीड ब्रेकर्स तयार करण्यात येतील अशी माहिती नितिन गडकरी यांनी ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’ मध्ये बोलताना दिली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - लोकांचं आयुष्य ही आमची प्राथमिकता आहे. महामार्गावर अपघाताची ठिकाणं शोधून त्याठिकाणी क्रॅश बॅरिअर सोलार लाईटचा वापर करुन स्पीड ब्रेकर्स तयार करण्यात येतील, यामुळे अपघात आणि मृत्यूचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी होईल अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’ मध्ये बोलताना दिली आहे. सोबतच अपघाताचा आकडा सांगताना महामार्गावर 5 लाख अपघात झाले असून 1.5 लाख लोकांचा मृत्यू आणि 2.5 लाख लोक जखमी झाले आहेत असंही गडकरींनी सांगितलं आहे. 
 
आपण पैसे किंवा इतर गोष्टींमध्ये कमी पडत नाही आहोत. मात्र आपली विचारसरणी बदलण्याची गरज आहे. सर्व प्रक्रिया कायेदशीर झाल्या पाहिजेत असा आदेश देण्यात आला आहे. टॉयलेट पेपरसाठीही आम्ही टेंडर काढत आहोत मात्र त्याचवेळी वेळेची मर्यादाही पाळत आहोत  प्रलंबित राहणं टाळा हा आमचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील महत्वाकांक्षी प्रकल्पांना लवकरात लवकर पुर्ण करण्यात आग्रही आहेत असं नितिन गडकरी बोलले आहेत. 
 
1 जानेवारीपासून बडोदा - मुंबई हायवेच्या कामाला सुरुवात -
1 जानेवारीपासून 40 हजार कोटींच्या बडोदा - मुंबई हायवेच्या कामाला सुरुवात होईल. मुंबई - गोवा हायवे प्राथमिकता असून 2018 च्या आधी चार लेन सुरु करण्यात येतील. चार महिन्यांमध्ये 10 हजार कोटींच्या कामांचे आदेश जारी करण्यात येतील. तसंच 10 हजार कोटी खर्च करुन पंढरपूर वारीच्या रस्त्याचा विकास करण्यात येणार असल्याची माहितीही नितिन गडकरी यांनी दिली आहे.
 
बसपोर्ट उभे करण्यासाठी राज्यांनी जमीन देण्याची गरज - 
पर्यावरणाबद्दल पुर्णपणे जागरुक असून एकही झाड कापायला न लागावं यासाठी प्रयत्न करत आहोत. ग्रीन हायवे तयार करण्यात येणार असून यामुळे प्रदूषण कमी होईल. गुजरातमध्ये एअरपोर्टप्रमाणे बसपोर्ट उभारण्यात येणार आहेत. बसपोर्ट उभे करण्यासाठी राज्यांनी आम्हाला जास्तीत जास्त जमीन देणं गरजेचं आहे कारण आम्हाला त्याची गरज आहे. महाराष्ट्रामधील रस्त्यांचं जाळं 2.5 ते 3 लाख किमीपर्यंत पसरवण्यात येईल असंही नितिन गडकरी यांनी सांगितलं आहे. 
 
बंदरांची हाताळणी करण्यामध्ये गुजरातमधील अदानीपेक्षा महाराष्ट्राची कार्यक्षमता जास्त आहे. पनवेल ते जेएनपीटीसाठी 8 लेन बनवण्याचा प्रस्ताव आहे.  जलमार्ग, रेल्वे आणि त्यानंतर रस्ते हा आमच्या प्राथमिकतेचा क्रम असल्याचं नितिन गडकरींनी यानिमित्ताने स्पष्ट केलं. 
 
दिल्लीपेक्षा माल मुंबईहून लंडनला पाठवणं जास्त सोपं - 
मालदिवमध्ये 47 समुद्र जहाज वाहतुकीचे रस्ते असताना आपल्याकडे एकही नाही. आपल्याकडे 13 हजार बेटे आहेत ज्यांचा अजिबात वापर होत नाही. जलवाहतूकीसाठी 20 हजार किमी जलमार्ग आणि 7.5 हजार किमी समुद्रकिनारा असताना आपण काहीतरी करण्यापेक्षा फक्त चर्चात करतो अशी खंत गडकरींनी बोलून दाखवली. माल मुंबईहून लंडनला पाठवणं हे मुंबईहून दिल्लीला पाठवण्यापेक्षा जास्त सोपं आहे. हे बदलण्याची गरज असल्याचं मत गडकरींनी व्यक्त केलं.
 
आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डच्या स्वस्त कार भारतात तयार करणार - 
कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी मनमाड ते इंदोर मुख्य रेल्वे मालवाहतूकमार्ग असेल. सोबतच आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डच्या स्वस्त कार भारतात तयार केल्या जातील अशी माहिती गडकरींनी यावेळी दिली.
काही पर्यावरणवादी सतत विकासाच्या कामांना विरोध करत असतात. वांद्रे - वरळी सी लिंकचं बांधकाम सुरु असताना हा अनुभव आला. फक्त 7 लोकांनी एकूण 125 याचिका दाखल केल्या होत्या असं नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितलं.  मुंबईतील समुद्रकिना-यांवर घाण वास येत असतो. कचरा समुद्रकिना-यात टाकण्यापासून आपण रोखू शकत नाही का ? कच-यासोबत प्लास्टिकचाही निचरा केला जाऊ शकतो. आपण तो करणे गरजेचे आहे असं आवाहन नितिन गडकरी यांनी यावेळी केलं.
 
मी दिल्लीत बसलेलो महाराष्ट्राचा अॅम्बेसिडर -
विकासाचा सर्वात जास्त फायदा कृषी उद्योगाला होईल. मुंबई आणि महाराष्ट्रात प्रचंड क्षमता आहे. दोघेही देशाच्या विकासाची इंजिन आहे. मी दिल्लीत बसलेलो महाराष्ट्राचा अॅम्बेसिडर आहे असं नितिन गडकरी बोलले आहेत.