शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

आधीच्या निर्णयांचा फेरविचार

By admin | Updated: November 21, 2014 02:48 IST

आघाडी सरकारने शेवटच्या चार महिन्यांत घेतलेल्या निर्णयांचा फेरविचार करण्यासाठी आढावा घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांना दिले आहेत.

यदु जोशी, मुंबईपृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वातील आघाडी सरकारने शेवटच्या चार महिन्यांत घेतलेल्या निर्णयांचा फेरविचार करण्यासाठी आढावा घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांना दिले आहेत. आपला पक्ष सत्तेत आल्यास आघाडी सरकारच्या शेवटच्या चार महिन्यांतील निर्णयांची चौकशी करून चुकीचे निर्णय रद्द केले जातील, अशी घोषणा फडणवीस यांनी प्रचारादरम्यान केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करीत एक महिन्याच्या आत त्या निर्णयांचा आढावा घेण्यास त्यांनी सांगितले आहे. जून ते सप्टेंबर २०१४ या काळात घेतलेल्या निर्णयांचा त्यात समावेश असेल. आघाडी सरकारने सरतेशेवटी घेतलेले काही निर्णय वादग्रस्त असल्याचा आरोप भाजपाच्यावतीने करण्यात आला होता. भूविकास बँकेचे पुनरुज्जीवन नाहीचराज्य भूविकास बँकेचे पुनरुज्जीवन न करण्याचा निर्णय राज सरकारच्या विचाराधिन आहे. ही बँक आणि तिच्या शाखा अवसायनात काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून बँकेकडून राज्य शासनाला जवळपास १७०० कोटी रुपये घ्यायचे आहेत. बँकेची ठिकठिकाणी असलेली संपत्ती (जमिनी व इमारती आदी) शासन ताब्यात घेईल. या जमिनी ई-लिलावाद्वारे विकण्याचा प्रस्ताव आहे. शेतकऱ्यांवर असलेले कर्ज फेडण्यासाठी एकरकमी कर्जफेड योजना ३१ मार्च २०१६ (ओटीएस) पर्यंत राबविली जाईल. या कर्जवसुलीतून बँकेच्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्याचा प्रस्ताव आहे.