मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकार चालविण्याचा अधिकार राहिला नाही: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 10:10 PM2021-03-20T22:10:44+5:302021-03-20T22:15:09+5:30

Param Bir Singh Letter: रिपाइं नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनीही या परमबीर सिंह पत्रावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ramdas athawale criticised thackeray govt over param bir singh letter | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकार चालविण्याचा अधिकार राहिला नाही: रामदास आठवले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकार चालविण्याचा अधिकार राहिला नाही: रामदास आठवले

Next
ठळक मुद्देरामदास आठवले यांची परमबीर सिंग यांच्या पत्र प्रकरणावर प्रतिक्रियाया गंभीर आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे - आठवलेअनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे - आठवले

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिले असून, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. यानंतर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. या प्रकरणी विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असून, आता अन्य राजकीय नेत्यांनीही ठाकरे सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. रिपाइं नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनीही या परमबीर सिंह पत्रावर (Param Bir Singh Letter) प्रतिक्रिया व्यक्त केली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकार चालविण्याचा अधिकार राहिला नाही, असा आरोप आठवले यांनी केला आहे. (ramdas athawale criticised thackeray govt over param bir singh letter)

"महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी घटना; गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा"

रामदास आठवले यांनी ट्विटच्या माध्यमातून परमबीर सिंग प्रकरणावर आपले मत मांडले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही सरकार चालविण्याचा अधिकार राहिला नाही, अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे. 

या गंभीर आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. ते आरोप गृहमंत्र्यांनी नाकारले आहेत. मात्र असा प्रकार देशात कधीच कुठे घडला नाही. या गंभीर आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकारामुळे महाराष्ट्राच्या लौकीकावर कलंक लागला आहे, असेही रामदास आठवले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी घटना

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. 

 

परमबीर सिंगांच्या पत्रातील सर्वांत महत्त्वाचे १० मुद्दे; शरद पवारांनाही माहिती असल्याचा दावा

मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री देशमुखांचा राजीनामा घ्यावा

परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. सिंग यांनी केलेले आरोप केवळ खळबळजनक नाहीत, तर ते अतिशय धक्कादायक आहेत. डीजी दर्जाचा अधिकारी इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोप करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस दलात धक्कादायक घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होत आहेत. पण ही घटना म्हणजे या प्रकरणातला कळस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घ्यावा, असे फडणवीस म्हणाले.

परमबीर सिंगना अटक करा आणि अनिल देशमुखांचा राजीनामा घ्या; भाजप आक्रमक

दरम्यान, टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक तसेच गंभीर आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे. 

Web Title: ramdas athawale criticised thackeray govt over param bir singh letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.