शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

Gurudas Kamat Death: गुरुदास कामत यांच्या निधनामुळे खंबीर, कणखर, निष्ठावान नेतृत्व हरपले - विखे पाटील यांची श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 4:23 PM

Gurudas Kamat Death: काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या निधनामुळे खंबीर, कणखर आणि निष्ठावान नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

मुंबई - काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्या निधनामुळे खंबीर, कणखर आणि निष्ठावान नेतृत्व हरपल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.कामत यांच्या आकस्मिक निधनामुळे मोठा धक्का बसल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. गुरूदास कामत यांचा संघटनात्मक अनुभव दांडगा होता. कार्यकर्त्यांसाठी ते एक आधारस्तंभ होते. त्यांची नाळ थेट सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांशी जुळलेली असल्याने ते एक लोकप्रिय नेते होते व त्यामुळेच तब्बल पाच वेळा त्यांना लोकसभेचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. केंद्र सरकारमध्ये अनेक खात्यांचा कार्यभारही त्यांनी सांभाळला. मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून त्यांनी पक्षाला अधिक संघटनात्मक बळकटी दिली. सध्याच्या संघर्षाच्या काळात काँग्रेसला त्यांच्या अनुभवी मार्गदर्शनाची आणि उत्तम संघटन कौशल्याची अतिशय गरज होती.

परंतु, त्यांनीअचानक ‘एक्झिट’ घेतल्याने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.  कामत यांच्या निधनामुळे वैयक्तिक देखील मोठी हानी झाल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असताना ते युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्या काळापासून कामत यांनी सातत्याने आपल्याला प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्यांची पोकळी प्रकर्षाने जाणवत राहिल, या शब्दांत विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या व दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली.

टॅग्स :Gurudas Kamatगुरुदास कामतcongressकाँग्रेसRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील