शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

दुष्काळामुळे राज्यात ऊसाचे उत्पादन घटणार :  प्राथमिक अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 1:42 PM

राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे अगामी ऊस गाळप हंगामासाठी तब्बल पावणे चारशे लाख टन ऊस गाळपासाठी कमी उपलब्ध होईल.

ठळक मुद्देसाखरेच्या उत्पादनात होणार ४२ लाख टनांनी घट गेले दोन हंगाम राज्यात विक्रमी साखर उत्पादन साखर उत्पादनात ६५ लाख टनापर्यंत होऊ शकते घट कारखान्यांनी विजेतून मिळवले १ हजार कोटी 

पुणे : राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे आगामी ऊस गाळप हंगामासाठी तब्बल पावणे चारशे लाख टन ऊस गाळपासाठी कमी उपलब्ध होईल. त्यामुळे साखर उत्पादनात ६५ लाख टनापर्यंत घट होऊ शकते. म्हणजेच नुकत्याच संपलेल्या हंगामापेक्षासाखरेच्या उत्पादनात ४२ लाख टनांची घट होईल, असा प्राथमिक अंदाज आहे.साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी आगामी ऊस हंगामाचा अंदाज आणि नुकत्याच संपलेल्या हंगामाची माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. गेले दोन हंगाम राज्यात विक्रमी साखर उत्पादन होत आहे. राज्यात २०१७-१८ या हंगामात ९५२.६० लाख टन ऊस गाळपातून विक्रमी १०७.१० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा ९५२.११ लाख टन ऊस गाळपातून १०७.२० लाख टन साखर उत्पादित करुन गेल्या वेळचा विक्रम मोडला गेला. गेल्यावर्षी शेवटच्या टप्प्यात फारसा पाऊस झाला नाही. तसेच, परतीच्या पावसाने पाठ फिरविली असून, वळवाचा पाऊस देखील झाला नाही. त्यामुळे चाºयासाठी मोठ्या प्रमाणावर ऊस जात आहे. अजूनही राज्यात मॉन्सून सक्रीय झालेला नसल्याने चाºयासाठी आणखी ऊस तोडला जाऊ शकतो. दुष्काळी स्थितीमुळे राज्यात २०१९-२० या हंगामासाठी ५७० लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल. राज्याचा सरासरी साखर उतारा साडेअकरा टक्का आहे. त्यामुळे यंदा ६४.४१ लाख टन साखर उत्पादनाचा प्राथमिक अंदाज आहे. यानंतर पडणारा पाऊस, चाऱ्यासाठी झालेली तोड याचा विचार करुन पुढील अंदाज जुलै-ऑगस्टमधे वर्तविण्यात येईल. -----------------

कारखान्यांनी विजेतून मिळवले १ हजार कोटी राज्यात ५९ सहकारी आणि ५२ खासगी कारखान्यांमधे सहविज प्रकल्प आहेत. यातून कारखान्यांनी गेल्या हंगामात २२१.१३ कोटी युनिट्स विज निर्मिती केली. त्यातील ४७.९६ कोटी युनिट विज स्वत:साठी वापरली असून, १४६.१७ कोटी युनिट्स विज निर्यात केली. त्यातून १ हजार ४१ कोटी १० लाख रुपयांचे उत्पन्न कारखान्यांना मिळाले.  --------------------कारखान्यांचे साडेचारशे कोटी महावितरणकडे थकीतराज्यातील साखर कारखान्यांनी पुरवठा केलेल्या विजेचे तब्बल साडेचारशे कोटी रुपये राज्य विद्युत वितरण कंपनीकडे (एमएसइडीसीएल) थकीत असल्याची माहिती साखर आयुक्तांनी दिली. --------------

राज्यातील उत्कृष्ट कारखाने 

कारखान्याचे नाव             पहिला                दुसरा            तिसरा    ऊस गाळप            जवाहर सहकारी-कोल्हापूर        विठ्ठलराव शिंदे-सोलापूर        अंबालिका-अहमदनगर(लाख टन)            (१७.६३ )            (१७.४४)            (१३.६४)साखर उत्पादन            जवाहर (२२.४७)            विठ्ठलराव शिंदे (१९.२६)        सह्याद्री-सातारा (१६.३१)साखर उतारा (टक्का)        गुरुदत्त-कोल्हापूर (१३.४१)        दालमिया-कोल्हापूर (१३.२१)     जयवंत-सातारा (१३)       सर्वाधिक गाळप दिवस        विघ्नहर-पुणे (१९५)        सह्याद्री-सातारा (१७५)        सोमेश्वर-पुणे (१७१)

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती