शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नाही : प्रवीण दरेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 12:55 PM

शेतकऱ्यांच्या बांधावर दिलेल्या त्या वचनाच काय झालं असा प्रश्न दरेकर यांनी यावेळी उपस्थित केला.

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सोमवारपासून पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सामोरे जात आहे. तर याचवेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचं काय झालं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरेकर यावेळी म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे प्रमुखाने पक्षप्रमुख म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सांगितलं होत की, शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीसाठी 25 हजार रुपये तर बागायतीसाठी 50 हजार मदत म्हणून देऊ. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर दिलेल्या त्या वचनाच काय झालं असा प्रश्न दरेकर यांनी यावेळी उपस्थित केला.

त्याचप्रमाणे याच सरकारने सरसकट कर्जमाफी देण्याचा शब्द दिला होता. मात्र प्रत्यक्षात सरसकट कर्जमाफी झाली नसून, यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावे. तसेच महराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढल्या असून, या संदर्भात सरकार उदासीन असल्याचा आरोप सुद्धा दरेकर यांनी केला आहे.