शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

वाद पेटला! नाना पटोलेंच्या प्रतिक्रियेनंतर आंबेडकर संतापले; भाजपबाबत केला गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 21:45 IST

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे.

Congress Nana Patole ( Marathi News ) : वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही स्वबळाचा नारा देत अनेक मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच सात मतदारसंघांमध्ये मात्र वंचितकडून काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा दिला जाणार आहे. असं असताना वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नसून आज पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांनी पटोले यांच्याविरोधात हल्लाबोल केला आहे.

वंचितने नागपूरमध्ये काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा देण्याबाबत घेतलेल्या निर्णयावर बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं की, नागपूरमध्ये भाजप उमेदवार नितीन गडकरी यांना पराभूत करण्यासाठी वंचितने हा निर्णय घेतला आहे. त्यावर पलटवार करताना प्रकाश आंबेडकर यांनी नाना पटोले यांचे भाजपशी छुपे संबंध असल्यानेच त्यांना नितीन गडकरी यांच्या पराभवाचं दु:ख होणार आहे, असा हल्लाबोल आंबेडकर यांनी केला आहे.

दरम्यान, नाना पटोले यांना पक्षनेतृत्वाने भंडारा-गोंदिया मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितली होती. मात्र त्यांनी निवडणूक लढवण्यास कशामुळे नकार दिला, हे आज समोर आलं आहे, असा टोलाही प्रकाश आंबेडकरांनी लगावला आहे.

आंबेडकरांविरोधातील उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी पटोले उपस्थित राहणार?

वंचित आघाडीने नागपूर आणि कोल्हापुरातील काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला असून काँग्रेसने सुचवलेल्या आणखी पाच मतदारसंघांमध्येही वंचितकडून काँग्रेसला पाठिंबा दिला जाणार आहे. मात्र असं असलं तरी महाविकास आघाडीचा घटकपक्ष होण्यास नकार दिलेल्या वंचित आघाडीला अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून पाठिंबा दिला जाणार नसल्याचे समजते. अकोला लोकसभा मतदारसंघातून स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी आपली उमेदवारी जाहीर केली असून काँग्रेसकडून त्यांच्याविरोधात डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. डॉ. अभय पाटील हे काँग्रेस पक्षाकडून ४ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं बोललं जात आहे. पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेदेखील उपस्थित राहू शकतात.  

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीcongressकाँग्रेस