शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

रात्रभर ‘ते’ राखेत शोधत होते संसार

By admin | Updated: June 2, 2014 05:42 IST

संत गाडगेबाबा नावाची गडचांदूर येथील मजुरांची वसाहत आगीने पार होरपळून निघाली आहे. टिचभर पोटासाठी मोलमजुरी करून आयुष्याचा गाडा कसाबसा ते चालवित होते.

गडचांदूर: संत गाडगेबाबा नावाची गडचांदूर येथील मजुरांची वसाहत आगीने पार होरपळून निघाली आहे. टिचभर पोटासाठी मोलमजुरी करून आयुष्याचा गाडा कसाबसा ते चालवित होते. मात्र ते नियतीला मान्य नसावे. शनिवारी आगीच्या एका ठिणगीने ६०० लोकांना रस्त्यावर आणले आणि पाहता पाहता क्षणात त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. आज त्यांच्याजवळ पाणी पिण्यासाठी साधा ग्लासही उरला नाही. शनिवारी रात्री अन्नपिण्याविनाच आगग्रस्तांनी अख्खी रात्रं जागून काढली. विझलेल्या राखेत उरलेले काही गवसते का, याचे ते शोध घेत होते. ३१ मेच्या दुपारी गडचांदूर येथे घडलेल्या आगीच्या घटनेने अख्खी पंचक्रोशी सुन्न झाली आहे. आगीच्या लोळात १३७ संसार उद्ध्वस्त झालेत. घटनेनंतर ग्रामपंचायतीच्यावतीने आगग्रस्तांसाठी जेवण व झोपण्याची व्यवस्था केली होती. मात्र डोळ्यादेखत घराची राखरांगोळी झाल्याने कुणाच्याही पोटात अन्न गेले नाही. झोप येण्याचा तर प्रश्नच नव्हता. व्यवस्था असूनही आगग्रस्त कुटुंबातील सदस्यांनी दुसर्‍या दिवशी सोमवारी देखील जेवण केले नाही. सारेच मोलमजुरीवर जगणारे असल्याने पीडित कुटुंबावर फार मोठा आघात झाला आहे. प्रमोद कवडू उईके यांच्या नातेवाइकाचा विवाह असल्यामुळे त्यांनी शुक्रवारीच १० हजार रुपये घरी आणून ठेवले होते. मात्र पैशाची राख झाली. नव्याने विवाह झालेल्या अनेकांचे अहेरात आलेले संसारोपयोगी साहित्य व सोने आगीत भस्मसात झाले. रमेश लिंगाजी यांच्या नातीचे ६ जूनला नामकरण होते. त्यासाठी जुळवून ठेवलेले २७ हजार रुपये व धान्य आगीत स्वाहा झाले. राजाराम शेडमाके अणि कमलाबाई शेडमाके हे वृद्ध दाम्पत्य आहे. त्यांना कुणाचा आधार नाही. चप्पच, जोडे विकून प्रसंगी गरिबांच्या लग्नात वाजंत्री वाजवून त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र या आगीत १०० जोडी चप्पल व काही जोड्यांसह वाजवायचे डफडेही आगीच्या भक्षस्थानी सापडले. त्यामुळे या दाम्पत्यासमोर आता जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे. फारुख शाह कदीर शाह यांचे लग्न जुळले होते. सोमवारी लग्नाची तारीख काढायची होती. लग्नासाठी घेऊन ठेवलेले ६० हजार रुपयांचे सोने या आगीत जळून खाक झाले. माणिकगड कंपनीमध्ये २००४ मध्ये रोप वेवरून पडून अपघात झाल्याने एका पायाने अपंग झालेला राजरतन विश्वनाथ फुल्लुके याच्या यातना तर भयावह आहेत. कुटुंबात फक्त पती- पत्नी असून हे दाम्पत्य मनी, बिर्‍या कमरपट्टा आदी साहित्य विकून आपल्या पोटाची खळगी भरत असत. मात्र या आगीत सर्व साहित्य जळाले. विश्वनाथ गणपती बरवे व बयाबाई गणपती बरवे हे वृद्ध दाम्पत्य दुसर्‍यांच्या शेतात मोलमजुरी करतात. त्यांना मात्र वयाच्या उत्तरार्धात असे दिवस पाहावे लागले. अनिल मुकिंदा आरकिलवार याचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर पायातील रॉड तुटल्याने त्याला चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्याच्या उपचारासाठी आईवडिलांनी नातेवाइकांकडून ५० हजार रुपये कर्ज काढले होते. ही रक्कम घरातच होती. आगीत हजार- पाचशेच्या सर्वच नोटा जळाल्या व वर्षभराचे घेऊन ठेवलेले धान्यही जळून खाक झाले. शासकीय सर्व्हेक्षणानंतर एक कोटी ८७ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले असून ८६ कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.(शहर प्रतिनिधी)