शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा पालिकेवर प्रशासक नेमू

By admin | Updated: March 22, 2017 02:45 IST

नागरिकांसाठी स्मशानभूमी व दफनभूमीसारख्या सुविधा उपलब्ध करून देता येत नसतील तर मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमू, अशी तंबी मंगळवारी उच्च न्यायालयाने महापालिकेला दिली.

मुंबई : नागरिकांसाठी स्मशानभूमी व दफनभूमीसारख्या सुविधा उपलब्ध करून देता येत नसतील तर मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमू, अशी तंबी मंगळवारी उच्च न्यायालयाने महापालिकेला दिली. प्रस्तावित विकास आराखड्यात स्मशानभूमी व दफनभूमीसाठी जागा राखीव ठेवण्याची हमी देण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले. वांद्रे व खार परिसरात सुन्नी मुस्लिमांसाठी दफनभूमी बांधण्यासाठी प्रस्तावित विकास आराखड्यात भूखंड राखीव ठेवावा, यासाठी मोहम्मद अली कुरेशी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती.गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने मुंबईची लोकसंख्या किती आहे व किती स्मशानभूमी, दफनभूमी आवश्यक आहेत? तसेच एच वॉर्डमध्ये (वांद्रे) किती दफनभूमी आहेत? अशी विचारणा महापालिकेकडे केली होती. या निर्देशानुसार महापालिकेने मंगळवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. ‘मुंबईची लोकसंख्या एक कोटी २७ लाख ९० हजार आहे. स्मशानभूमी व दफनभूमीसाठी मुंबईत ३८.३६ हेक्टर जागा आवश्यक आहे. तर एच वॉर्डमध्ये एक हेक्टरपेक्षा कमी भूखंड दफनभूमीसाठी आवश्यक आहे. मात्र एच वॉर्डमध्ये आधीच मुस्लीम समाजाच्या वेगवेगळ्या पंथांसाठी पाच दफनभूमी उपलब्ध असल्याने आणखी दफनभूमीची आवश्यकता नाही. कोणताही समाज स्मशनभूमी किंवा दफनभूमीसाठी जागा राखीव ठेवण्यासाठी महापालिकेला भाग पाडू शकत नाही,’ असे महापालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. यावर याचिकाकर्त्यांचे वकील अश्रफ शेख यांनी आक्षेप घेतला. ‘एच वॉर्डमधील सर्व दफनभूमी खासगी आहेत. महापालिकेच्या धोरणाप्रमाणे महापालिकेने प्रत्येक वॉर्डमध्ये चार हेक्टर जागा स्मशानभूमी व दफनभूमीसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे,’ अशी माहिती शेख यांनी खंडपीठाला दिली. यावर खंडपीठाने महापालिका दिशाभूल करत असल्याचे म्हटले. ‘महापालिकेने नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. महापालिकेचे हे कर्तव्य आहे. जर तुम्हाला नागरिकांना ही सुविधा उपलब्ध करून देता येत नसेल तर आम्ही महापालिकेवर प्रशासक नेमू,’ अशी तंबी खंडपीठाने महापालिकेला दिली.स्मशानभूमी, दफनभूमीसाठी असलेल्या जागांवर तुम्ही (महापालिका) मॉल, इमारती बांधाल. पण त्याच इमारतींमध्ये कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेहाचे काय? ते बाजूलाच असलेल्या समुद्रात फेकून देणार का, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने पालिकेला सुनावले. यावर पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी प्रस्तावित विकास आराखड्यात एच वॉर्डमध्ये दफनभूमीसाठी ३००० चौ. मी. भूखंड राखीव ठेवू, असे सांगितले. मात्र खंडपीठाने केवळ आश्वासन देऊ नका, असे म्हणत महापालिकेला यासंदर्भात दोन आठवड्यांत हमी देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)