शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

मराठवाड्यातील पाणीसाठा तिशीतच : पश्चिम महाराष्ट्रातील धरणे भरली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 7:00 AM

पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा आणि भीमा नद्यांच्या खोऱ्यातील पर्जन्य छायेच्या भागाला जलयुक्त केले आहे

ठळक मुद्देगोदावरींमुळे औरंगाबाद विभागाला दिलासा

पुणे : पश्चिम महाराष्ट्र जलसंकटातून आता सावरत असला तरी मराठवाडा व विदर्भाच्या भागात समाधानकारक पाऊस नसल्याने हा भाग कोरड्या दुष्काळाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा आणि भीमा नद्यांच्या खोऱ्यातील पर्जन्य छायेच्या भागाला जलयुक्त केले आहे. तर, गोदावरीने औरंगाबाद विभागाची जीवन वाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात जलप्राण फुंकले आहेत. यंदा जायकवाडीत ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाल्याने मराठवाड्यातील बऱ्याचशा भागाला दिलासा मिळाला आहे. राज्यात झालेल्या विषम पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र ओल्या दुष्काळाला सामोरा जात आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर व साताऱ्याला पुराच्या पाण्याचा फटका बसला. भीमा नदीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल ११७.४७ अब्ज घनफुाटंचे असलेले राज्यातील सर्वात मोठे धरण भरले. त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे लागल्याने पाऊस नसतानाही सोलापूर जिल्ह्यातील काही गावे पाण्याने वेढली गेली. कृष्णा खोऱ्यात झालेल्या पावसामुळे सांगली, कोल्हापूर व साताऱ्यात थैमान घातले. उत्तर कर्नाटकातील कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणातूनही मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे लागल्याने तेथेही नदीकाठची घरे पाण्याखाली गेली. भीमा आणि कृष्णामाईने आपला काठ सोडल्याने पश्चिम महाराष्ट्रात जलसंकट आले. राज्यातील मराठवाडा व विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस पेरणी झालेली नाही. मराठवाड्याच्या अमरावती विभागातील मोठ्या प्रकल्पात क्षमतेच्या २९ व औरंगाबादला ४६ टक्के पाणीसाठा आहे. अमरावती विभागातील मोठे प्रकल्पांपैकी वाण धरणात २.१९ (७५.८८ टक्के), ऊर्ध्व वर्धा ९.३५ (४७ टक्के), ५.०३ (१४.८ टक्के) टीएमसी पाणीसाठा आहे. औरंगाबाद विभागातील जायकवाडी धरणात ७०.१५ टीएमसी (९१.५१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गोदावरी खोºयात झालेल्या दमदार पावसामुळे यंदा जायकवाडीधरण भरणाच्या मार्गावर आहे. येलदरी धरणाची उपयुक्त साठ्याची क्षमता २.८.५०, निम्न मनार ४.८८ व निम्न तेरणा धरणाची क्षमता ३.२२ टीएमसी आहे. मात्र धरणांत सध्या उपयुक्त पाणीसाठा शून्य आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदभार्तील बºयाच भागाला पाणीटंचाईच्या झळा बसू शकतात, असे चित्र आहे. --१९ आॅगस्ट अखेरचा उपयुक्त पाणीसाठा टीएमसीमधे विभाग        साठा टीएमसी    आजची टक्केवारी        गेल्यावषीर्ची टक्केवारी अमरावती    २८.३२        २७.८९            ४३.३औरंगाबाद    ७९.५९        ३०.५८            १९.३२    कोकण    १०६.७६        ८६.१४            ८९.७५    नागपूर    ६३.६८        ३९.१५            ४०.३१    नाशिक    १२७.९५        ६०.३५            ५६    पुणे        ४५५.४९        ८४.८            ७९.५६एकूण        ८७४.७९        ६०.५८            ५७.९८    ---भीमा-कृष्णा खोऱ्यातील प्रमुख धरणातील साठा टीएमसीत धरण               टीएमसी    टक्केवारीकोयना             ९४.९३       ९४.८२धोम                १०.९५        ९३.९६वारणावती       २५.५८        ९२.९५दूधगंगा           २२.९५         ९५.७२ऊरमोडी           ९.४०         ९७.४२डिंभे                १२.४२        ९९.४३पवना              ८.४६         ९९.४४मुळशी             १८.४६        १००वरसगाव         १२.८२        १००पानशेत           १०.६५        १००निरा देवघर    ११.७३         १००भाटघर         २३.५०         १००वीर              ९.३४          ९९.२८उजनी           ५३.५७         १००        

टॅग्स :PuneपुणेDamधरणRainपाऊसWaterपाणी