मराठवाड्यातील पाणीसाठा तिशीतच : पश्चिम महाराष्ट्रातील धरणे भरली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 07:00 AM2019-08-20T07:00:00+5:302019-08-20T07:00:07+5:30

पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा आणि भीमा नद्यांच्या खोऱ्यातील पर्जन्य छायेच्या भागाला जलयुक्त केले आहे

only 30 percent Water storage in the Marathwada dam | मराठवाड्यातील पाणीसाठा तिशीतच : पश्चिम महाराष्ट्रातील धरणे भरली

मराठवाड्यातील पाणीसाठा तिशीतच : पश्चिम महाराष्ट्रातील धरणे भरली

googlenewsNext
ठळक मुद्देगोदावरींमुळे औरंगाबाद विभागाला दिलासा

पुणे : पश्चिम महाराष्ट्र जलसंकटातून आता सावरत असला तरी मराठवाडा व विदर्भाच्या भागात समाधानकारक पाऊस नसल्याने हा भाग कोरड्या दुष्काळाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा आणि भीमा नद्यांच्या खोऱ्यातील पर्जन्य छायेच्या भागाला जलयुक्त केले आहे. तर, गोदावरीने औरंगाबाद विभागाची जीवन वाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात जलप्राण फुंकले आहेत. यंदा जायकवाडीत ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाल्याने मराठवाड्यातील बऱ्याचशा भागाला दिलासा मिळाला आहे. 
राज्यात झालेल्या विषम पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र ओल्या दुष्काळाला सामोरा जात आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर व साताऱ्याला पुराच्या पाण्याचा फटका बसला. भीमा नदीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल ११७.४७ अब्ज घनफुाटंचे असलेले राज्यातील सर्वात मोठे धरण भरले. त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे लागल्याने पाऊस नसतानाही सोलापूर जिल्ह्यातील काही गावे पाण्याने वेढली गेली. कृष्णा खोऱ्यात झालेल्या पावसामुळे सांगली, कोल्हापूर व साताऱ्यात थैमान घातले. उत्तर कर्नाटकातील कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणातूनही मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे लागल्याने तेथेही नदीकाठची घरे पाण्याखाली गेली. 
भीमा आणि कृष्णामाईने आपला काठ सोडल्याने पश्चिम महाराष्ट्रात जलसंकट आले. राज्यातील मराठवाडा व विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस पेरणी झालेली नाही. मराठवाड्याच्या अमरावती विभागातील मोठ्या प्रकल्पात क्षमतेच्या २९ व औरंगाबादला ४६ टक्के पाणीसाठा आहे. अमरावती विभागातील मोठे प्रकल्पांपैकी वाण धरणात २.१९ (७५.८८ टक्के), ऊर्ध्व वर्धा ९.३५ (४७ टक्के), ५.०३ (१४.८ टक्के) टीएमसी पाणीसाठा आहे. औरंगाबाद विभागातील जायकवाडी धरणात ७०.१५ टीएमसी (९१.५१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गोदावरी खोºयात झालेल्या दमदार पावसामुळे यंदा जायकवाडीधरण भरणाच्या मार्गावर आहे. येलदरी धरणाची उपयुक्त साठ्याची क्षमता २.८.५०, निम्न मनार ४.८८ व निम्न तेरणा धरणाची क्षमता ३.२२ टीएमसी आहे. मात्र धरणांत सध्या उपयुक्त पाणीसाठा शून्य आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदभार्तील बºयाच भागाला पाणीटंचाईच्या झळा बसू शकतात, असे चित्र आहे. 
--
१९ आॅगस्ट अखेरचा उपयुक्त पाणीसाठा टीएमसीमधे 
विभाग        साठा टीएमसी    आजची टक्केवारी        गेल्यावषीर्ची टक्केवारी 
अमरावती    २८.३२        २७.८९            ४३.३
औरंगाबाद    ७९.५९        ३०.५८            १९.३२    
कोकण    १०६.७६        ८६.१४            ८९.७५    
नागपूर    ६३.६८        ३९.१५            ४०.३१    
नाशिक    १२७.९५        ६०.३५            ५६    
पुणे        ४५५.४९        ८४.८            ७९.५६
एकूण        ८७४.७९        ६०.५८            ५७.९८    
---
भीमा-कृष्णा खोऱ्यातील प्रमुख धरणातील साठा टीएमसीत 
धरण               टीएमसी    टक्केवारी
कोयना             ९४.९३       ९४.८२
धोम                १०.९५        ९३.९६
वारणावती       २५.५८        ९२.९५
दूधगंगा           २२.९५         ९५.७२
ऊरमोडी           ९.४०         ९७.४२
डिंभे                १२.४२        ९९.४३
पवना              ८.४६         ९९.४४
मुळशी             १८.४६        १००
वरसगाव         १२.८२        १००
पानशेत           १०.६५        १००
निरा देवघर    ११.७३         १००
भाटघर         २३.५०         १००
वीर              ९.३४          ९९.२८
उजनी           ५३.५७         १००        

Web Title: only 30 percent Water storage in the Marathwada dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.