शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
5
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
6
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
7
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
8
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
9
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
10
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
11
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
12
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
13
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
14
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
15
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
18
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
19
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
20
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एकदा स्वबळावर लढून बघाच - अजित पवार

By admin | Updated: July 4, 2014 17:23 IST

एकदा सर्वच पक्षांनी स्वबळावर लढायला हवे म्हणजे सर्वांना आपापली ताकद कळेल असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर येथे केले.

 

ऑनलाइन टीम 
अहमदनगर, दि. ४ - शिवसेना-भाजपामध्ये युती ठेवायची की नाही यावरून चर्चा सुरू झालेली असतानाच एकदा सर्वच पक्षांनी स्वबळावर लढायला हवे म्हणजे सर्वांना आपापली ताकद कळेल असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर येथे केले. 
गुरूवारी भाजपाच्या एका कार्यक्रमात शिवसेनेसोबत असलेली युती यापुढे न ठेवता भाजपाने राज्यातील  विधानसभा स्वबळावर लढायला हवी अशी मागणी भाजपाचे मधु चव्हाण यांनी केल्याने महायुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपाकडून आलेली ही मागणी शिवसेनेनेही गांभिर्याने घेतली असून २८८ जागांसाठी सज्ज राहावे असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सूचना केली आहे. युतीबाबत चर्चा सुरू असतानाच शुक्रवारी अजित पवार यांनी आगामी निवडणुकांत राष्ट्रवादीला १४४ जागा दिल्या तरच आघाडी टिकेल अन्यथा पक्ष २८८ जागा लढेल असे वक्तव्य केले आहे. राज्यात आम्हाला अर्ध्या जागा मिळायला हव्या अशी मागणी करतानाच  अजित पवार म्हणाले की, एकदा सर्वच पक्षांनी स्वबळावर लढायला हवे जेणेकरून सर्वांना आपापली ताकद कळेल. मोदी सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, मोदी सरकार शेतकरीहीत पाहत नाही. सिंचन घोटाळयावरून विनाकारण माझ्या बदनामीचा प्रयत्न करण्यात आला असेही अजित पवार म्हणाले.