शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra CM : आता कळले अजित पवार रात्री कोणत्या वकिलाकडे बसले होते; संजय राऊत यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 11:38 IST

अजित पवार यांनी आज भाजपा सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

मुंबई : अजित पवार काल रात्री 9 वाजेपर्यंत आमच्यासोबत होते. पण ते संपूर्ण बैठकीत आमच्या नजरेला नजर भिडवून बोलत नव्हते. त्यांची बॉडी लँग्वेज आमच्या लक्षात आली. शरद पवारांच्याही लक्षात आले. ते बैठकीतून बाहेर पडले, फोन स्वीच ऑफ लागत होता. ते वकिलाकडे बसल्याचे सांगण्यात आले होते. आता सकाळी कळाले ते कोणत्या वकीलाकडे बसले होते, अशी टीका शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

अजित पवार यांनी आज भाजपा सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये शरद पवारांचा काहीही हात नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो. जेव्हा शरद पवारांना ईडीची नोटीस आली तेव्हाच मला कळले होते. अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदनाम केले आहे. महाराजांच्या नावाला काळीमा फासला आहे. राज्यातील जनता त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार आज भेटणार आहेत. त्यांच्यात सकाळपासून दोनवेळा फोनवर चर्चा झाली आहे. राजभवनात पाप करण्यात आले. रात्रीच्या अंधारात तुम्ही डाका घातलाय. चोरी केलीय़. महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. ज्यांनी ह्या वयात शरद पवारांना दगा देण्याचा प्रयत्न केला ही महाराष्ट्राला न आवडणारी गोष्ट आहे. काहीतरी चांगले घडत असताना हे सर्व सत्ता, पैशाचा गैरवापर करून करण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच त्यांनी शरद पवारांना दगा दिला आहेच, पण महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. अजित पवार हे आयुष्यभर तडफडत राहतील, असे वक्तव्यही त्यांनी केले आहे. 

शरद पवार अनभिज्ञ? शरद पवार साहेबांना सुरुवातीच्या काळात या गोष्टी माहित्या होत्या. परंतू नंतरच्या काळामध्ये; पहिल्या काळात त्यांना मी स्थिर सरकार देण्याबाबत सांगत होतो. कोणीतरी दोघांनी किंवा तिघांनी एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नव्हते. या आधीही काँग्रेस, राष्ट्रवादीने स्थिर सरकार दिले आहे. शिवसेना-भाजपाने स्थिर सरकार दिले आहे, असे अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर सांगितले.

काल रात्री काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक फिस्कटली होती. यानंतर मध्यरात्री साडेबारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघे राज्यपालांना भेटले. एक वाजता राज्यपालांनी केंद्राकडे शिफारस केली. राष्ट्रपती राजवट हटवण्याची सकाळी सातची शपथविधीची वेळ ठरली. काँग्रेस शिवसेनेला बाजूला ठेवून भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले. यात प्रफुल्ल पटेल यांनी मोठी भुमिका बजावली आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस