शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अमोल कोल्हेंना मोठी जबाबदारी? जयंत पाटलांनी साहेबांसमोरच खुली ऑफर दिली!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2023 4:16 PM

"कोल्हे साहेबांची एक क्लिप पाहिली, त्यात ते सांगतायत, बापाला कधी विसरायचं नसतं. बापाच्या चेहऱ्यावरच्या सुरकूत्या त्याच्या कष्टातून निर्माण झालेल्या असतात. हे काही तरी मनात ठेवा. त्यांच्या त्याच क्लिपमध्ये उल्लेख आहे, साहेब बांधतील ते तोरण आणि म्हणतील ते धोरण."

मुंबई - शिवसेनेच्या बाबतीत जे झाले, तेच आज राष्ट्रवादीच्या बाबतीत करण्याचा मानस काही लोकांचा आहे. पण राष्ट्रवादी येथे बसलेल्या सर्वांची आहे आणि तेथे गेलेल्या सर्वांनी राष्ट्रवादीसाठी काम केले आहे. आपल्या सर्वांची ही राष्ट्रवादी नामशेश करावी, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून राष्ट्रवादी संपली पाहिजे, अशी भूमिका ठेऊन कुणी काम करत असेल, तर आज सर्वांनी विचार करायला हवा. आजूनही वेळ गेलेली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्याशरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी यावेळी अमोल कोल्हे यांनाही शरद पवार यांच्या समोरच मोठी ऑफरही दिली आहे. ते शरद पवार यांनी वाय. बी. चव्हाण सेंटर येथे बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीत बोलत होते. 

जयंत पाटील म्हणाले, "शरद पवारांचा झंजावात महाराष्ट्रात फिरायला लागला, तर काय परिस्थिती होईल याची छोटीशी चुनूक आपण सातारा आणि कराडमध्ये पाहिली आहे. वय कितीही झाले असले तरी या नेत्याचा संपूर्ण भारतात दरारा आहे, यावेळी जयंत पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्या एका क्लिपचाही उल्लेख केला.

साहेब तुम्ही माझ्या पक्षाचे प्रचार प्रमुख व्हा -कोल्हे साहेबांची एक क्लिप पाहिली, त्यात ते सांगतायत, बापाला कधी विसरायचं नसतं. बापाच्या चेहऱ्यावरच्या सुरकूत्या त्याच्या कष्टातून निर्माण झालेल्या असतात. हे काही तरी मनात ठेवा. त्यांच्या त्याच क्लिपमध्ये उल्लेख आहे, साहेब बांधतील ते तोरण आणि म्हणतील ते धोरण. माझा मोह आहे, पक्षात चर्चा केल्याशिवाय कारणे बरोबर नाही. पण आता पक्षातील गर्दी कमी झाली आहे. त्यामुळे मला जो काही थोडा बहुत अधिकार आहे, कोल्हे साहेब तुम्ही माझ्या पक्षाचे प्रचार प्रमुख व्हा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आपण संपूर्ण महाराष्ट्रात फिरू आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा स्वाभीमानी बाना महाराष्ट्राने कसा जपला आहे. हे सांगायचे काम तुम्ही करा. संपूर्ण महाराष्ट्र साहेबांच्या आणि राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार, असा मला विश्वास आहे, अशी ऑफरही पाटिल यांनी कोल्हे यांना दिली.

'त्या' लोकांमध्ये परत फिरण्याचे वेध लागले आहेत, हे लक्षात ठेवा -आणखी खाते वटप झालेले नाही. मला काळजी आहे, की, उद्धव ठाकरेंची साथ सोडून जे गेले त्यांची तक्रार काय होती. जर तीच तक्रार पुन्हा एकदा येऊन बसली असेल. तर त्या लोकांमध्ये परत फिरण्याचे वेध लागले आहेत. हे लक्षात ठेवा. कार्यकर्त्यांच्या मनात एवढी भीती मी महाराष्ट्राच्या इतिहासात पाहिली नव्हती. म्हणून अमोल कोल्हे यांच्या मनात आलेला विचार, 'कशासाठी आहे हे राजकारण'. काही भूमिका, काही दिशा मानसाच्या मानात नेहमीच हवी, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना शरद पवार यांच्या सोबत राहण्याची शपथही दिली.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हे