शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

मानसिक आधाराची कमतरता ठरतेय वाढत्या आत्महत्येस कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 13:52 IST

व्यक्तीला आलेले एकटेपण, मनाची कोंडी, घुसमटलेपणा, मित्र परिवार दुरावणे यामुळे आत्महत्या होत आहेत.

ठळक मुद्देआत्महत्या करु पाहणा-या २००० व्यक्तींना केले समुपदेशन १८ ते ४५ वयोगटाची संख्या सर्वाधिक प्रमाणापेक्षा जास्त ‘पर्सनल’’ होणे गंभीर आजाराचा वाढलेला मानसिक व शारीरिक ताण 

पुणे :  आता थोडं फार वाद व्हायचा अवकाश की त्याचा राईचा पर्वत करुन टोकाला जाण्याची मानसिकता वाढली आहे. अभ्यासाचा, परीक्षेत चांगल्या गुणांनी यशस्वी होईल की नाही याबद्दलची भीती, नोकरीत सातत्य टिकविण्याचे आव्हान, वैयक्तिक नातेसंबंधात बदलत्या जीवनशैलीनुसार पडलेले अंतर याचा गंभीर परिणाम व्यक्तीच्या मानसिकतेवर होत आहे. यातून आत्महत्या करणा-यांची संख्या वाढु लागली आहे. आत्महत्या प्रतिबंधाच्या क्षेत्रात १३ वर्षांहून अधिक काळ काम करणा-या कनेक्टींग एनजीओ संस्थेच्या माहितीनुसार, या संस्थेने चालु वर्षी नोव्हेंबर अखेर तब्बल २००० आत्महत्या करु पाहणा-या व्यक्तींना समुपदेशन केले आहे. विशेषत: दहावी बारावीचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढलेले दिसते. याबरोबरच दिवाळी, ख्रिसमस या काळात देखील ’’विंटर सुसाईड’’ होत आहेत. याचे कारण म्हणजे सुट्टीच्या काळात आत्महत्येचे विचार मनात घोळत असलेल्या व्यक्तीला आलेले एकटेपण, मनाची कोंडी, घुसमटलेपणा, मित्र परिवार दुरावणे यामुळे आत्महत्या होत आहेत. व्यक्तीला आत्महत्येपासून रोखण्याकरिता त्यांचे समुपदेशन करणा-या सुसाईड प्रिव्हेंंशन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षी १६०० व्यक्तींना समुपदेशन करण्यात आले. २०१६ मध्ये ती संख्या ३०००इतकी होती. तर यावर्षी हा आकडा २००० इतका आहे. याविषयी माहिती देताना  संस्थेचे समन्वयक विक्रमसिंह पवार यांनी सांगितले, केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर देशाच्या वेगवेगळ्या राज्यांतून समुपदेशनाकरिता फोन येतात. त्या तुलनेने महाराष्ट्रातून येणारे कॉल सर्वाधिक आहेत. यात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, उस्मानाबाद यासारख्या ग्रामीण भागांतून फोन येणा-यांची संख्या लक्षणीय आहे. ज्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत अशा व्यक्तीला केवळ सल्ला आणि मार्गदर्शन न करता तिला तिच्या स्व क्षमतांची ओळख करुन देण्यावर भर दिला जातो. कुठल्या समस्येमुळे विद्यार्थी, महिला, नोकरदार व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक यांच्या मनात नैराश्य आले आहे त्यांना त्या समस्येचे उत्तर शोधण्याकरिता मदत केली जाते. याबरोबर संबंधित व्यक्तीला एखाद्या मनोविकार तज्ञांचा संदर्भ देखील दिला जातो. विशेष म्हणजे मानसिक आरोग्याचा समतोल ढासळलेल्या व्यक्तीच्या सहमती विचारात घेतली जाते.  ...................* प्रमाणापेक्षा जास्त ‘पर्सनल’’ होणे गंभीर मुळातच छोट्या छोट्या कारणामुळे मनात दुस-याविषयी अढी धरुन बसल्याने व्देषाची भावना वाढते. मोक ळेपणाने संवाद साधणे, दिलखुलासपणे एखाद्याशी गप्पा मारणे, हसत खेळत प्रसंगाला सामोरे जाणे, अशी सकारात्मकता मनात न बाळगता सध्या कुठलेही कारण प्रमाणापेक्षा जास्त ‘‘पर्सनल’’ घेणे मानसिक स्वास्थ्याकरिता धोकादायक ठरत आहे. तसेच ज्यावेळी मानसिक आधाराची गरज असते अशाप्रसंगी तो न मिळाल्याने ‘‘टनेल व्हीजन’’सारख्या अवस्थेला सामोरे जावे लागत असल्याचे पवार यांनी सांगितले. .....................*वयोगटानुसार बदलतात आत्महत्येची कारणे १८ ते २५  -  अभ्यासाचा, परीक्षेचा ताण, परीक्षेच्यावेळी प्रचंड मेहनत घेऊनही अपयश येणे, वैयक्तिक नातेसंबंधात येणारी क टुता (विशेषत: प्रेमभंग, एकतर्फी प्रेमाची उदाहरणे, पालकांकडून दाखविला जाणारा अविश्वास, मैत्रीत संवादाचा अभाव) ३० ते ४० - व्यापार-उद्योगात येणा-या आर्थिक  अडचणी, नातेसंबंधातील भांडणे (नवरा -बायको वाद), नोक-यांमधील सात्यत्य टिकविण्यात येणारे अपयश, घरातील व्यक्तीं सोबत संवाद टिकविण्यात येणारे अपयश, दुर्धर आजाराचा वाढलेला मानसिक व शारीरिक ताण ४० च्या पुढे - घरातील व्यक्तींबरोबर संवादाचा अभाव, मनात सातत्याने तयार होणारी दुर्लक्षितपणाची भावना, मुलांकडून होणारा मानसिक व शाररीक छळ, अपयशाची मनात बसलेली भीती, दीर्घकाळचे आजारपण.. 

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूHealthआरोग्यMeditationसाधना