शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

शिवसेनेने पीक विमा कंपन्यांना दिलेल्या डेडलाईनच काय झालं? : निलेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 5:23 PM

गेल्या महिन्यात खाजगी पीक विमा कंपन्या विरोधात शिवसेनेने मुंबईत मोर्चा काढला होता.

मुंबई - मुंबईतील बीकेसी परिसरात शिवसेनेने पीक विमा कंपन्यांविरोधात काढलेल्या मोर्चावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, राज्यातील खासगी पीक विमा कंपन्यांना १५ दिवसांच्या आत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची मुदत दिली होती. अन्यथा १५ दिवसांनी पुन्हा मोर्चा काढून जाब विचारणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला होता. तर उद्धव ठाकरे यांना डेडलाईनची आठवण करून देत  माजी खासदार आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते  निलेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली.

गेल्या महिन्यात खाजगी पीक विमा कंपनांच्या विरोधात शिवसेनेने मुंबईत मोर्चा काढला होता. यावेळी खुद्द उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित होते. यावेळी उद्धव यांनी, राज्यातील खासगी विमा कंपन्यांना १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची मागणी केली होती. त्याच बरोबर आगामी १५ दिवसांच्या काळात कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची नावे बँकांच्या बोर्डावर झळकलीच पाहिजेत अशी सूचना उद्धव यांनी बँकांना केली होती. मात्र प्रत्यक्षात आजही अनेक शेतकरी पीक विमा आणि कर्ज माफी पासून वंचित असल्याचे समोर आले आहे.

यावरूनच  निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव यांनी पीक विमा कंपन्यांना दिलेल्या डेडलाईनच काय झाले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांना ४०० कोटी मिळवून दिले म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी पुरावे द्यावेत असे सुद्धा निलेश राणे म्हणाले. यावेळी त्यांनी एका शेतकऱ्याचे २०१८ मधील बँकेचे तपशील ट्विट करत, पुरावे द्यायचे असतील तर असे द्या, म्हणजे खरं खोटं कळेल असा खोचक टोला निलेश यांनी शिवसेनेला लगावला.

सत्तेत असून ही नेहमीच शिवसेनेने शेतकऱ्यांच्या कर्ज माफिवरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात मात्र अजूनही सरसकट कर्ज माफी झाली नसून अनेक शेतकरी कर्ज माफी पासून वंचित असल्याचे समोर आले आहे. त्यात सनेने दिलेल्या १५ दिवसाच्या डेडलाईन नंतर काही हालचाली होतील अशी, अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र शिवसेनेला त्यांनी दिलेल्या डेडलाईनचा विसर तर पडला नाही ना ? असा प्रशन उपस्थित होत आहे.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाCrop Insuranceपीक विमाCrop Loanपीक कर्ज