शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

राष्ट्रवादीची 'ही' खेळी काँग्रेसला पडणार भारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 3:51 PM

राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपद आपल्याकडे राखून पुढील काम सोपं केलं आहे. तर काँग्रेसची उपमुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा अपूर्णच राहिली आहे. 

मुंबई - राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. या सरकारमध्ये तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोनच नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री पदावरून पेच निर्माण झाला होता. हा पेच सुटला असून विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला मिळाले आहे.  इथेच राष्ट्रवादीची डाव साधला असून आगामी काळात हे काँग्रेससाठी अडचणीचे ठरू शकते. 

महाविकास आघाडीत विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले आहे. काँग्रेसकडून शेतकरी नेते नाना पटोले अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. काँग्रेसला विधानसभा अध्यक्षांऐवजी उपमुख्यमंत्रीपद हवं होतं. मात्र त्यांना विधानसभा अध्यक्षपदावर समाधान मानावे लागले आहे. तर राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्रीपद आपल्याकडे घेण्यात यश मिळवले आहे. 

प्रसिद्धच्या दृष्टीने उपमुख्यमंत्रीपद अत्यंत आवश्यक आहे. याचं महत्त्व राष्ट्रवादीला चांगलेच ठावूक होते. सरकारी जाहिरातीत प्रामुख्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटो पेपरवर दिसतो. त्यात विधानसभा अध्यक्षांना स्थान नसते. आता राष्ट्रवादीकडे हे पद गेल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्र्यांचा फोटो दिसणार आहे. यामुळे सर्वसामान्यांत हे सरकार केवळ शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहे का, असा संदेश जाण्याचा संभव आहे. याविषयी एक काँग्रेस नेत्याने नाराजी देखील दर्शविली होती. 

एकूनच राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपद आपल्याकडे राखून पुढील काम सोपं केलं आहे. तर काँग्रेसची उपमुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा अपूर्णच राहिली आहे.