शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
3
"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
4
बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
5
गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
6
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
7
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
8
भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
9
"त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि...", गिरिजा ओकला आलेला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव
10
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
11
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
12
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
13
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
14
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
15
श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
16
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
17
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
18
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
19
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
20
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 16:43 IST

NCP SP Group Leader Rohit Patil News: आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तासगावचे आमदार असलेल्या रोहित पाटलांना मुंबईतील गरबा आठवल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात आता सुरू झाली आहे.

NCP SP Group Leader Rohit Patil News: राज्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात पावसाळा गृहीत धरला जातो. त्यानुसार सरासरी १००४ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा प्रत्यक्षात या चार महिन्यांमध्ये १०९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सरासरीच्या हे प्रमाण १०८ टक्के इतके आहे. सर्वाधिक १६४ टक्के पाऊस सप्टेंबरमध्ये झाला असून, गेल्या वर्षी याच महिन्यात ११६ टक्के पाऊस झाला होता. ऑगस्ट व सप्टेंबरमधील पावसामुळे राज्यातील सुमारे ६० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. यातच राज्यातील अतिवृष्टी, शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. 

शेतकरी कर्जमाफी, ५० हजार हेक्टरी मदत, ओला दुष्काळ जाहीर करावा, अशा मागण्या विरोधकांनी लावून धरल्या आहेत. यातच दसरा मेळावा, त्यावर होणारे खर्च आणि ते खर्च शेतकऱ्यांना मदत म्हणून देणे, यावरूनही आरोप-प्रत्यारोप झालेले पाहायला मिळाले. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि तासगावचे आमदार रोहित पाटील यांनी मुंबईतगरबा, दांडियावर झालेल्या खर्चावर बोट ठेवत ते पैसे शेतकऱ्यांना दिले असते, असे म्हटले आहे. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पाटलांना मुंबईतीलगरबा आठवल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात आता सुरू झाली आहे.

रोहित पाटलांचे लक्ष मुंबईच्या गरब्यावर

अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल आहे. तर दुसरीकडे मुंबई, ठाण्यात गरबा-दांडियानिमित्त रोषणाईसाठी कोट्यवधी रुपये उधळले जात आहेत. शुभेच्छा बॅनरांनी चौक चौक रंगले आहेत. या अहमीकेत कोणताच प्रमुख राजकीय पक्ष मागे नाही. तासगावचे आमदार रोहित पाटील यांनी यावर बोट ठेवले. गरबा इव्हेंट्समध्ये सेलिब्रिटींना बोलावून त्यांच्यावर लाखोंची उधळण करण्यापेक्षा ते शेतकऱ्यांसाठी खर्च करता आले असते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांचा हा मुद्दा महत्त्वाचा ठरेल.

दरम्यान, राज्यातील अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्तांना आठ दिवसांत सर्वसमावेशक मदत जाहीर केली जाईल आणि मदतीची रक्कम दिवाळीच्या आत बँक खात्यात जमा करण्याचा प्रयत्न असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यात सुमारे ६० लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Patil Criticizes Garba Spending, Urges Aid for Farmers

Web Summary : Rohit Patil questions lavish spending on Mumbai's Garba events while farmers suffer from heavy rain damage. He suggests diverting funds to support affected farmers instead of celebrity endorsements, highlighting potential local election implications. The government promises aid within eight days.
टॅग्स :Rohit Patilरोहित पाटिलNCPराष्ट्रवादी काँग्रेसNavratriनवरात्रीMumbaiमुंबईGarabaGarabagarbaगरबाPoliticsराजकारणRainपाऊसfloodपूरFarmerशेतकरी