शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

“कितीही दिवस तपासत राहिले, तरी तपास शेवटी ठरलेला आहे”; नरहरी झिरवळांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 4:21 PM

Maharashtra Politics: निकाल नेमका केव्हा लागेल? यावर नरहरी झिरवळ यांनी खोचक शब्दांत भाष्य केले.

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्यावर अद्यापही तर्क-वितर्क केले जात आहेत. यासंदर्भात १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. ठाकरे गटाने राहुल नार्वेकर यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. मात्र, यानंतर आता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सूचक विधान केले आहे. 

राहुल नार्वेकर हे भाजप आमदार असून, ते पक्षांतर करून भाजपत आले आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकरांना पक्षांतराचे वावडे नसेल. राहुल नार्वेकरांकडून न्याय्य निकाल येणार नाही, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या चौकटीत योग्य त्या प्रक्रियांचा अवलंब करूनच आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला जाईल, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, यातच आता उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी यावर भाष्य करताना सूचक विधान केले आहे. 

कितीही दिवस तपासत राहिले, तरी तपास शेवटी ठरलेला आहे

मीडियाशी बोलताना झिरवळ म्हणाले की, तपासण्यापलीकडे त्यांच्याकडे मार्ग नाही. पण कितीही दिवस तपासत राहिले, तरी तपास शेवटी ठरलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने १० ते १२ त्रुटी सांगितल्या आहेत. त्या सगळ्याच विरोधात आहेत. फक्त एकच बाब आहे की, ते तपासायला राहुल नार्वेकरांकडे दिले आहे. तपास हा तपासच असतो. तो कधीपर्यंत चालेल याची खात्री नाही, असे नरहरी झिरवळ यांनी म्हटले आहे.  

लवकरात लवकर ही सभागृहातील भाषा

सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना विधानसभा अध्यक्षांना फक्त योग्य वेळेत किंवा लवकरात लवकर निर्णय घ्यावा, एवढेच सांगितले आहे. त्यामुळे हा निकाल नेमका कधी येणार? याविषयी कोणतीही स्पष्टता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात नाही. यावर बोलताना झिरवळ म्हणाले की, लवकरात लवकर ही एक राजकीय व्यासपीठावरची किंवा सभागृहातील भाषा आहे. लवकरात लवकर याला कधीही लवकर म्हणता येते. परवाही लवकर आणि सहा महिन्यांनीही लवकरच असते, अशी खोचक प्रतिक्रिया झिरवळ यांनी दिली.  

टॅग्स :Narhari Jhariwalनरहरी झिरवाळRahul Narvekarराहुल नार्वेकरMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष