शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

"महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट अशक्य, जनता महाविकास आघाडीच्या कामावर समाधानी"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2021 1:36 PM

maha vikas aghadi : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारला घेरण्याची एकही संधी विरोधक सोडत दिसत नाहीत. ठाकरे सरकारवर टीका करताना राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणार असल्याचा सूर विरोधकांकडून आळवण्यात आला.

ठळक मुद्देनारायण राणे यांच्यावर टीकास्त्रमनसुख हिरेन प्रकरणी सत्य लवकरच समोर येईल - राष्ट्रवादीराज्यात अशीच कुणालाही राष्ट्रपती राजवट लागू करता येत नाही - नवाब मलिक

मुंबई : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारला घेरण्याची एकही संधी विरोधक सोडत दिसत नाहीत. ठाकरे सरकारवर टीका करताना राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणार असल्याचा सूर विरोधकांकडून आळवण्यात आला. मात्र, महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीच्या कामावर समाधानी आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लावणे अशक्य आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. (ncp leader nawab malik criticized bjp leader narayan rane)

भाजप खासदार नारायण राणे यांनी सुरुवातीला सरकार टिकणार नाही, फाटाफूट होऊन भाजपची सत्ता येईल, असा दावा केला होता. मात्र, या गोष्टीला आता १५ महिने उलटून गेल्यानंतर हा बाजा वाजवणे बंद केले. आता ते पुन्हा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार आहेत. कारण, भाजपकडे दुसरा पर्याय नाही, पण हे अशक्य आहे. कोणत्याही राज्यात अशीच कुणालाही राष्ट्रपती राजवट लागू करता येत नाही, असे नवाब मलिक यांनी यावेळी बोलताना सांगितले.

RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली कोरोना लस

सत्य लवकरच समोर येईल

डेलकर यांनी लिहलेल्या सुसाईड नोटमध्ये बऱ्याच लोकांची नावे आहेत. पोलीस तपास करत आहेत. यामध्ये भाजप नेत्यांचाही समावेश आहे. हा तपास रोखण्यासाठी दबाव आणला जाऊ नये. यंत्रणांना त्यांचे काम करू दिले पाहिजे.  मनसुख हिरेन प्रकरणातही सत्य लवकरच समोर येईल. तोपर्यंत कोण काय म्हणतंय, यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन नवाब मलिक यांनी केले आहे. 

दरम्यान, मनसुख हिरेन यांचा मृत्यू जसा संशयास्पद आहे, तशीच या संपूर्ण प्रकरणात राज्य सरकारची भूमिकाही संशयास्पद वाटते. मराठा आरक्षणाचा घोळ राज्य सरकारच्या अनास्थेमुळे झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. वीज बिलांमुळे सामान्य वीजग्राहक हैराण झाला आहे. आता या मुद्यांवर जनजागृती करण्यासाठी भाजपच्या २० हजार शक्तिकेंद्रांतर्फे २० हजार सभा, बैठका घेण्यात येतील, असे चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाPresident Ruleराष्ट्रपती राजवटNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसnawab malikनवाब मलिकNarayan Raneनारायण राणे BJPभाजपा