शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

मी जे बोलतोय ते खोटे असलं तर राजकारणातून निवृत्त होईन; अजित पवारांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 10:50 IST

आम्ही कुठल्या दबावाला भीक घालणारी माणसे नाही, आम्हीही मराठ्यांची औलाद आहे, आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे बदनामी करण्याचे काम सुरू आहे असा आरोप अजित पवारांनी केला.

कोल्हापूर – शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील मतभेदामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ गट पडलेत. सध्या या दोन्ही गटाकडून विविध दावे करण्यात येत आहेत. अजित पवार हे आमचे नेते असल्याचं प्रफुल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्याकडून म्हटलं आहे. त्याचसोबत राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हावर दावा केला आहे. शरद पवार गटाकडूनही शरद पवारच पक्षाचे अध्यक्ष असल्याचे सांगण्यात येते. हा वाद सध्या निवडणूक आयोगाकडे आहे. त्यात रविवारी अजितदादांची कोल्हापूरात जाहीर सभा झाली. त्यावेळी त्यांनी शरद पवार गटावर निशाणा साधला.

अजित पवार म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे सरकार पडत होते, त्याचवेळेस राष्ट्रवादीच्या १-२ आमदार वगळता सर्व मंत्री, आमदारांनी एक पत्र तयार केले होते. या पत्रात आपण महायुतीत सामील व्हावं असं म्हटलं होते. हे खोटे असले तर राजकारणातून निवृत्त होईल आणि हे खरे असले तर जे खोटे बोलतायेत त्यांनी राजकारणातून निवृत्त झाले पाहिजे. आहे का तयारी? काहीजण म्हणतात आमच्यावर दबाव होता, होय, आमच्यावर लोकांची कामे करण्याचा दबाव होता. आमदारांच्या मतदारसंघात रखडलेली कामे, विकासकामांना मिळालेली स्थगिती ती उठवण्याचा दबाव होता असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत आम्ही कुठल्या दबावाला भीक घालणारी माणसे नाही, आम्हीही मराठ्यांची औलाद आहे, आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे बदनामी करण्याचे काम सुरू आहे. त्यात कुठलेही तथ्य नाही. मी जे बोलतो ते खरे बोलतो आणि वस्तूस्थितीला धरून बोलतो हे महाराष्ट्राला माहिती आहे. स्वार्थासाठी आम्ही महायुतीत आलो नाही. आम्ही सत्तेत ही कामे करायला आलोय असंही अजित पवार यांनी म्हटलं.

दरम्यान, शहर वाढताना अनेक गावे शहरात घ्यावी लागतात. कोल्हापूरकर टोलमाफीसाठी मजबूतीने पुढे आले. राज्य सरकारला वाकवलं त्याबद्दल तुमचे अभिनंदन, तुमच्या मनात येते ते तुम्ही करून दाखवता. परंतु पुढील ५० वर्षानंतरचं कोल्हापूर डोळ्यासमोर आणा, पुढच्या पिढीचं भविष्य बघा, जवळची गावे तातडीने शहरात घेतली नाहीत तर शहरे बकाल होतात. पुण्यातील धनकवडी बघा, प्लॅनिंग न होता इमारती उभ्या राहिल्या. आपण राजकारण न आणता त्यामध्ये एकोपा दाखवा. ज्या ज्या गोष्टी त्या त्या वेळी झाल्या तरच त्याचा फायदा होतो. फार उशीर केला तर त्याला अर्थ राहत नाही त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती आहे. कोल्हापूरकरांनी या कामात मदत करावी. विकासाच्या कामाला निधी द्यायला आम्ही कमी पडणार नाही असा शब्द अजित पवारांनी कोल्हापूरच्या सभेत दिला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे