शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

Sharad Pawar : आता विषय निघालाच आहे तर...; मावळवरून शरद पवारांचं फडणवीसांना ९० हजारी उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 3:54 PM

मावळची तुलता लखीमपूर हिंसाचाराशी करणाऱ्या Devendra Fadnavis फडणवीसांना Sharad Pawar शरद पवारांचं उत्तर

मुंबई: लखीमपूरमधील हिंसाचारावरून देशातील वातावरण तापलं आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारनं चिरडल्याचा आरोप केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलावर आहे. त्यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपला लक्ष्य केलं आहे. लखीमपूरमधील हिंसाचाराची तुलना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी Sharad Pawar जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी पवारांना काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना घडलेल्या मावळ गोळीबाराची आठवण करून दिली. यानंतर आता पवारांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

देवेंद्र फडणवीसांनी लखीमपूरवर बोलताना मावळचं प्रकरण काढलं. त्यांनी तो विषय काढला हे बरंच झालं, असं शरद पवार म्हणाले. 'मावळमध्ये तेव्हा नेमकं काय घडलं, ते अनेकांच्या त्यावेळी लक्षात आलं नाही. त्या कारवाईत शेतकरी मृत्यूमुखी पडले ही गोष्ट खरी आहे. मात्र त्याला काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते, मंत्री जबाबदार नव्हते. ती कारवाई पोलिसांची होती. आता मावळचं चित्र स्पष्ट झालं आहे. तिथली परिस्थिती हाताबाहेर जावी यासाठी स्थानिक भाजप नेत्यांनी प्रोत्साहित केलं, असा दावा पवारांनी केला. मावळमधलं सत्य समोर आल्यानंतर लोकांचा गैरसमज दूर झाला. त्यानंतर तिथली परिस्थिती बदलली. काही अपवाद वगळता मावळ विधानसभा मतदारसंघात कायम जनसंघ आणि भाजपचं वर्चस्व राहिलं. रामभाऊ म्हाळगी यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व विधानसभेत केलं. मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांबद्दल तिथे संताप निर्माण झाला. पण माथी भडकावण्याचं काम कोणी केलं हे लोकांच्या लक्षात आल्यावर चित्र बदललं. २०१९ मध्ये तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार तब्बल ९० हजार मतांनी निवडून आला, असं पवार यांनी सांगितलं. फडणवीसांचं कौतुक अन् अभिनंदनगेल्या दोन वर्षांत लोकांचं खूप प्रेम मिळालं. त्यामुळे मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच म्हटलं. फडणवीसांच्या या विधानावरून शरद पवारांनी पत्रकार परिषदेत टोलेबाजी केली. विरोधी पक्षनेत्यांना ते आजही मुख्यमंत्री आहेत असं वाटतात. त्यांचं कौतुक वाटतं. त्यांचं मी अभिनंदन करतो, असा चिमटा शरद पवारांनी काढला.

फडणवीसांना अद्यापही ते मुख्यमंत्री आहेत असं वाटतं, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. याबाबतीत मी थोडा कमी पडतो. चारवेळा मुख्यमंत्री राहूनही मला फडणवीसांसारखं वाटत नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे अशी भावना माझ्या मनात निर्माण होत नाही. फडणवीसांना ते मुख्यमंत्री आहेत असं वाटतं. मी पुन्हा येईनची त्यांची जखम किती सखोल आहे हे त्यातून दिसतं, असा टोला पवारांनी लगावला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचार