शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नामदेवांची अभंगसंपदा

By admin | Updated: April 2, 2015 03:13 IST

सातशे वर्षांपूर्वी भागवत धर्माची पताका घेऊन संत नामदेवांनी पंजाब प्रांतात पाऊल ठेवले. संत ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर म्हणजे साधारण

सातशे वर्षांपूर्वी भागवत धर्माची पताका घेऊन संत नामदेवांनी पंजाब प्रांतात पाऊल ठेवले. संत ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर म्हणजे साधारण १२९६ नंतर पंजाबात प्रबोधनाची पताका रोवली. घुमान हे गाव त्यांनीच वसवले, असेही मानले जाते. शीखांच्या पवित्र ‘गुरुग्रंथसाहिब’मध्ये संत नामदेवांच्या अनेक रचना आहेत. त्यांचे ६२ अभंग ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहेत. नामदेवांचे अभंग मराठीत असले तरी ग्रंथसाहिबमध्ये ते पंजाबीमिश्रित मराठी, संस्कृत भाषांतरित आहेत. अन्य सहा गुरूंच्या रचनांबरोबर विविध भागांत समाविष्ट करण्यात आले आहेत. उत्कट भावभक्ती आणि उदात्त विचार असलेली अभंगगाथा नामदेवांनी हिंदीमध्येही शब्दबद्ध केल्याने ते सर्वांना प्रेरक ठरली आहे. ‘ग्रंथसाहिबा’तील गुरुमुखीमध्ये लिखित व पंजाबी भाषेत रचलेल्या 'शबद' रचनांचे वाचन करत असताना ईश्वराच्या अगाध लीलांचे वर्णन करणाऱ्या संत नामदेव रचित सुंदर रचना वाचणे हा खरोखर प्रासादिक अनुभव आहे.ईश्वराची महती अवर्णनीय आहे आणि प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही सुरनर मुनिजनांच्या तत्त्वाचा पार लागलेला नाही, याचे स्पष्टीकरण देताना नामदेव म्हणतात-केते पच गये हैं, कोटी ब्रम्हा। सूरनर मुनिजन पार न पावै।।तजू अभिमान कर निरमल करमा। नामदेव के स्वामी अंतरयामा।अगम अगाध हे तुमरी महिमा।। छीपेके घरि जनमु दैला,गुरु उपदेसू भैला। संतनके परसादि, नामा हरि भेटुला।।ही रचना उघड उघड मराठी वळणाची आहेच; मला शिंपी कुळात जन्म मिळाला, नव्हे, तो ईश्वराने दिला; पण गुरुपदेश झाला आणि मी पावन झालो. जात-जमात, पंथ, प्रदेश यांच्या पलीकडे पोहोचलो. हे सारे संतसहवासातून घडले. (भावार्थ)‘नामदेव देके गुरु शिखावे खेचरी मुद्रा गाई,प्रणवत नामा परम ततरे, सतिगुरू निकटी बताईला,खेचर भुचर तुलसी माला, गुरु प्रसादी पाइआ।।प्रभूची महती असामान्य आहे, असे सांगत सदगुरूविषयींचा पूज्यभाव नामदेवांनी या अभंगातून मांडला आहे. (लेखक ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आहेत.)