शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नऊ तासात पूर्ण होईल नागपूर-सुरतचा प्रवास

By admin | Updated: July 6, 2014 00:44 IST

सर्वसाधारणपणे रेल्वेचा प्रवास रस्ते मार्गापेक्षा लवकर पूर्ण होतो. परंतु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ने ही बाब खोटी ठरवून प्रवाशांना अर्ध्या वेळेतच त्यांना जेथे जायचे आहे तेथे पोहोचविण्याचा

राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती : जमीन अधिग्रहणाबाबत लवकरच चर्चावसीम कुरेशी - नागपूरसर्वसाधारणपणे रेल्वेचा प्रवास रस्ते मार्गापेक्षा लवकर पूर्ण होतो. परंतु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ने ही बाब खोटी ठरवून प्रवाशांना अर्ध्या वेळेतच त्यांना जेथे जायचे आहे तेथे पोहोचविण्याचा मार्ग खुला केला आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे १९४९ किलोमीटरचे अंतर फक्त २० तासात पूर्ण होऊ शकणार आहे. रेल्वेगाडीत हेच अंतर कापण्यासाठी ३७ तास लागतात. अशास्थितीत नागपूर-सुरत या मार्गाचे ८७५ किलोमीटरचे अंतर फक्त ९ तासात पूर्ण होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अमरावती ते जळगाव (२७५ किलोमीटर) आणि जळगाव ते धुळेपासून पुढे महाराष्ट्र, गुजरातच्या सीमेपर्यंत(२०८ किलोमीटर)ची निविदा फेब्रुवारी २०१४ मध्ये झाली आहे. कंत्राट देण्याच्या करारानंतर सहा महिने होऊनही कंत्राटदाराला जमीन मिळू शकली नाही. यावर कंत्राटदाराने आपले कंत्राट सोडण्याची सूचनाही केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित कंत्राट घेणाऱ्या कंपनीने नुकसान भरपाईची मागणी केली आहे. परंतु संबंधित कंत्राटदाराची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ अंतर्गत महाराष्ट्राच्या संबंधित दोन्ही भागात ८० टक्के जमीन अधिग्रहण करण्याचे काम शिल्लक आहे. भूदल मंत्रालयातर्फे या प्रकरणी राज्य शासनाशी लवकरच चर्चा करण्यात येणार आहे. अमरावतीपासून धुळेपर्यंत ४८३ किलोमीटरच्या भागात २ लेनला ४ लेन बनविण्यासाठी डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याची सूचना ठेवण्यात आली आहे. सुरुवातीला येथे डांबरीकरण करून रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव होता. परंतु मंत्रालय कमी देखभाल आणि मजबुतीच्या दृष्टीने येथे सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्याच्या बाजूने आहे.तज्ज्ञांच्या मते डांबराच्या रस्त्याची पाच वर्षांनंतर डागडुजी करावी लागते. परंतु सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याला ३० वर्षे देखभालीची गरज नसते.राष्ट्रीय महामार्ग ६ विकसित झाल्यानंतर मुंबई-इंदोर-आगरा (राष्ट्रीय महामार्ग ३) ला गती मिळू शकणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ आणि ३ धुळ्याजवळ ‘क्रॉस’ होतात. विकास कामामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चा वापर करून इंदोर, आगरा अथवा मुंबई जाणाऱ्यांना अधिक सुविधा मिळणार आहे.