शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

नऊ तासात पूर्ण होईल नागपूर-सुरतचा प्रवास

By admin | Updated: July 6, 2014 00:44 IST

सर्वसाधारणपणे रेल्वेचा प्रवास रस्ते मार्गापेक्षा लवकर पूर्ण होतो. परंतु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ने ही बाब खोटी ठरवून प्रवाशांना अर्ध्या वेळेतच त्यांना जेथे जायचे आहे तेथे पोहोचविण्याचा

राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती : जमीन अधिग्रहणाबाबत लवकरच चर्चावसीम कुरेशी - नागपूरसर्वसाधारणपणे रेल्वेचा प्रवास रस्ते मार्गापेक्षा लवकर पूर्ण होतो. परंतु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ने ही बाब खोटी ठरवून प्रवाशांना अर्ध्या वेळेतच त्यांना जेथे जायचे आहे तेथे पोहोचविण्याचा मार्ग खुला केला आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे १९४९ किलोमीटरचे अंतर फक्त २० तासात पूर्ण होऊ शकणार आहे. रेल्वेगाडीत हेच अंतर कापण्यासाठी ३७ तास लागतात. अशास्थितीत नागपूर-सुरत या मार्गाचे ८७५ किलोमीटरचे अंतर फक्त ९ तासात पूर्ण होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अमरावती ते जळगाव (२७५ किलोमीटर) आणि जळगाव ते धुळेपासून पुढे महाराष्ट्र, गुजरातच्या सीमेपर्यंत(२०८ किलोमीटर)ची निविदा फेब्रुवारी २०१४ मध्ये झाली आहे. कंत्राट देण्याच्या करारानंतर सहा महिने होऊनही कंत्राटदाराला जमीन मिळू शकली नाही. यावर कंत्राटदाराने आपले कंत्राट सोडण्याची सूचनाही केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित कंत्राट घेणाऱ्या कंपनीने नुकसान भरपाईची मागणी केली आहे. परंतु संबंधित कंत्राटदाराची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ अंतर्गत महाराष्ट्राच्या संबंधित दोन्ही भागात ८० टक्के जमीन अधिग्रहण करण्याचे काम शिल्लक आहे. भूदल मंत्रालयातर्फे या प्रकरणी राज्य शासनाशी लवकरच चर्चा करण्यात येणार आहे. अमरावतीपासून धुळेपर्यंत ४८३ किलोमीटरच्या भागात २ लेनला ४ लेन बनविण्यासाठी डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याची सूचना ठेवण्यात आली आहे. सुरुवातीला येथे डांबरीकरण करून रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव होता. परंतु मंत्रालय कमी देखभाल आणि मजबुतीच्या दृष्टीने येथे सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्याच्या बाजूने आहे.तज्ज्ञांच्या मते डांबराच्या रस्त्याची पाच वर्षांनंतर डागडुजी करावी लागते. परंतु सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याला ३० वर्षे देखभालीची गरज नसते.राष्ट्रीय महामार्ग ६ विकसित झाल्यानंतर मुंबई-इंदोर-आगरा (राष्ट्रीय महामार्ग ३) ला गती मिळू शकणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ आणि ३ धुळ्याजवळ ‘क्रॉस’ होतात. विकास कामामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चा वापर करून इंदोर, आगरा अथवा मुंबई जाणाऱ्यांना अधिक सुविधा मिळणार आहे.