शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

मुंबई वेगळी करणा-यांचे पाय छाटू - राज ठाकरे

By admin | Published: February 02, 2017 4:21 AM

भाजपाची पावले हुकूमशाहीच्या दिशेने पडू लागली आहेत. आधी विदर्भ आणि नंतर मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्यासाठी योजना हाकल्या जात आहेत. केवळ भाजपाला रोखण्यासाठी

मुंबई : भाजपाची पावले हुकूमशाहीच्या दिशेने पडू लागली आहेत. आधी विदर्भ आणि नंतर मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्यासाठी योजना हाकल्या जात आहेत. केवळ भाजपाला रोखण्यासाठी शिवसेनेपुढे युतीचा प्रस्ताव ठेवला होता. मनसे किंवा स्वत:साठी नाहीतर तर मराठीसाठी हात पुढे केला होता. पण माझ्यासाठी आज हा विषय संपला, अशा शब्दात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणुकांना सामारे जाणार असल्याचे बुधवारी स्पष्ट केले. दादर येथील शिवाजी मंदीर सभागृहात मनसे पदाधिका-यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्ला चढविला. शिवसेना-मनसे युतीबाबत सुरु असलेल्या उलटसुलट चर्चेचा संदर्भ देत राज म्हणाले की, भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षाच्या हातात सत्ता गेली तर मुंबईत मराठी माणसाचे अस्तित्व राहणार नाही. त्यामुळेच शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला होता. उद्धव ठाकरेंना सात वेळा फोन केला, पण त्यांनी एकदाही फोन उचलला नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले. टाळी झिडकारली किंवा, लाथाडले अशी चर्चा आहे. पण आपण मराठी माणसासाठी कुणाचेही पाय चाटू. मात्र मुंबई मराठी माणसापासून वेगळी करण्याचा प्रयत्न केला तर पाय छाटू , असा इशाराही त्यांनी दिला. सगळे काही आम्हालाच हवे असा हट्ट भाजपाने चालविला आहे. एकप्रकारची हुकुमशाहीच देशात पाहायला मिळते आहे. भाजपकडून केवळ आश्वासने दिली जातात. थापा या शब्दाला पयार्यी शब्द भाजपा आहे. गुगलला फेकू हा शब्द टाईप केला की मोदींचे नाव येते, जगात आपली हीच प्रतिमा आहे का, असा टोला राज यांनी लगावला. सेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना स्वत:कडे बघा. २५ वर्षे त्यांच्यासोबत तुम्हीपण सत्तेत होतात. दोघांनी मिळून भ्रष्टाचार केला आहे. नाशिक ही राज्यातील एकमेव महापालिका आहे, जिथे भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. पारदर्शी कारभाराच्या भाजपा-शिवसेना फक्त गप्पा मारतात, पण पारदर्शी कारभार काय असतो, ते मी नाशिकध्ये दाखवून दिले आहे, असे राज यांनी सांगितले. आगामी निवडणुकीसाठी एकजुटीने उभे रहा. पुढचे १८ दिवस मनसैनिकांनी व्यक्ती म्हणून नाही, तर पक्ष म्हणून काम करावे. मुंबई, पुणे, ठाणे या शहरांतील मराठी माणसांनी विचार करुन मतदान करावे असे आवाहन केले. (प्रतिनिधी)महापौर बंगला हडपायचा आहेदिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे केवळ निमित्त आहे. बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगल्याची जागा हडपायची आहे. त्यासाठीच शिवसेना भाजपाला सोडू शकत नाही. केंद्र आणि राज्याच्या सत्तेतून जो पैसा येतो तो सुटत नाही. त्यामुळेच शिवसेना भाजपाला चिटकून असल्याचा आरोप राज यांनी केला.