शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज ठाकरेंना लिहिलं खास पत्र, केलं अभिनंदन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 19:45 IST

खासदार गोपाळ शेट्टी यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते रविवारपासूनच बोरिवलीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शेट्टी यांनी स्वतःच लोकमतला फोन करून या पत्रासंदर्भात माहिती दिली आहे.

 मुंबई - कोकणातील बहुचर्चित नाणार प्रकल्पाला समर्थन दिल्याबद्दल उत्तर मुंबईचे भाजप (BJP) खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे खास पत्र लिहून अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी, विकासासाठी आणि हितासाठी नाणार प्रकल्पासंदर्भात आपण मांडलेली भूमिका रास्त आहे, असे शेट्टी यांनी म्हटले आहे. (MP Gopal Shetty congratulated Raj Thackeray for supporting the Nanar project in Ratnagiri )...अन् उद्धव ठाकरेंना लेटरबाजी करण्याचा प्लॅन शिजला; नाणार विरोधकांचा राज ठाकरेंवर आरोप

खासदार गोपाळ शेट्टी यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते रविवारपासूनच बोरिवलीच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. शेट्टी यांनी स्वतःच लोकमतला फोन करून या पत्रासंदर्भात माहिती दिली. यावेळी, रत्नागिरी राजापूरची रिफायनरी  चालू करून नाणार प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राबद्धलही शेट्टी यांनी राज ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे.

कोरोना काळात देशत अनेकांना बेरोजगारीला तोंड द्यावे लागत आहे. त्यात अमर्याद स्वयंरोजगाराच्या संधी देणारा हा प्रकल्प सुरू करण्यात आला, तर नवीन पिढीसाठी रोजगार निर्मितीची मोठी पार्श्वभूमी तयार होणार आहे. असेही शेट्टी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

राज ठाकरेंची 'मन की बात' मुख्यमंत्री ऐकणार? मनसेप्रमुखांनी थेट शरद पवारांना फोन केला अन्...

याच बरोबर, 3 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा नाणार प्रकल्प नाकारणे योग्य ठरणार नाही. यासंदर्भातील वाद सुरुवातीपासूनच चिघळलेला आहे. पण 2000 कोंकणवासियांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात, या प्रकल्पात स्थानिक कोंकणी माणसांच्या रोजगारला प्राधान्य देण्याची तजवीज केली आहे. उद्योग निर्मितीची मोठी संधी प्रामुख्याने कोकणातील तरुणांना दिली तर एकूण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी हे हिताचे ठरेल, असे मतही शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केले. एकेकाळी संगणक आले की बेरोजगारी वाढत जाईल, अशी भीती बाळगली जात होती. पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, हे संगणका मार्फत "डिजिटल इंडिया"मुळे जागतिक पातळीवर पोहचले, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. याच बरोबर मारुती सुझुकीला एकेकाळी विरोध झाला आणि नंतर त्या उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली, याकडेही खासदार शेट्टी यांनी राज ठाकरेंचे लक्ष वेधले.

राज ठाकरेंच्या मातोश्री आणि बहिणीने घेतली कोरोनाची लस; शर्मिला ठाकरेंचीही उपस्थिती

एखादा मोठा प्रकल्प किंवा बदल घडणार असेल तर त्याला विरोध होणे, हे साहजिकच आले. पण नाणार प्रकल्पामुळे कोंकणबरोबरच देशात बदल घडत असेल तर या प्रकल्पाचा तज्ञ व्यक्तींच्या मदतीने फेरविचार करावा लागेल. मात्र, फक्त संघर्षामुळे विकासाच्या वाटा बंद होऊन तमाम जनतेचे हित लांबवले जात आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेGopal Shettyगोपाळ शेट्टीBJPभाजपाMNSमनसे