शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

एमएमआरडीएचे प्रकल्प आता खासगी भागीदारीतून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:28 IST

एमएमआरडीएने मुंबई महानगरातील पायाभूत प्रकल्पांच्या जाळ्याचा विस्तार करण्यासाठी आता खासगी भागीदारांचा आधार घेण्याचा विचार सुरु केला.

अमर शैला लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महानगरातील पायाभूत प्रकल्पांच्या जाळ्याचा विस्तार करण्यासाठी आता खासगी भागीदारांचा आधार घेण्याचा विचार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केला आहे. त्यानुसार रस्ते प्रकल्पांची कामे बांधा, वापरा, हस्तांतरीत करा (बीओटी) यासह अन्य कोणत्या पर्यायांनी करता येतील का, याची चाचपणी एमएमआरडीने सुरू केली आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

एमएमआरडीएकडून वाहतूक जलद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू केली आहेत. त्याचबरोबर काही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी एमएमआरडीएला मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. मात्र, बीकेसीतील भूखंड भाडेपट्ट्यावर देऊन मिळणारे उत्पन्न हाच त्यांचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मात्र, या उत्पन्नावरही गेल्या काही वर्षांत मर्यादा आल्याने सध्या एमएमआरडीएच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यातून कर्ज काढून प्रकल्पांची कामे करण्याशिवाय गत्यंतर नाही. परिणामी त्यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी कर्जाव्यतिरिक्त अन्य पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे. एमएमआरडीएने काही दिवसांपूर्वीच कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ मार्गिकेचे काम पीपीपी तत्त्वावर करण्यासाठी स्वारस्य निविदा मागविल्या होत्या. आता त्याच धर्तीवर रस्ते जाळे विस्तारणाऱ्या अन्य प्रकल्पांची कामेही पूर्ण करण्याचा विचार आहे.

एमएमआरडीएने नुकत्याच मीरा-भाईंदर ते गायमुख उन्नत आणि भुयारी मार्ग प्रकल्पाच्या तब्बल १३ हजार कोटी रुपयांच्या निविदा रद्द केल्या आहेत, तसेच या प्रकल्पासाठी कर्ज उभारणी सुरू केली होती. मात्र, हे कर्ज अधिक व्याज दराने मिळण्याची शक्यता आहे. त्यातून आता हा प्रकल्प खासगी भागीदारीतून राबविता येईल का, याचीही चाचपणी सुरू आहे. यासोबतच आगामी प्रकल्पांसाठी हेच धोरण राबविण्यात येणार आहे. त्यातून खर्चाचा भार खासगी भागीदारांवर गेल्याने एमएमआरडीएच्या तिजोरीवरील ताण काहीसा हलका होण्यास मदत मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

बुधवारी दुपारी चार रुग्णवाहिकांमधून चौघांचे पार्थिव आणण्यात आले. मुलगा, सुनेसोबत अद्याप जगही न पाहिलेल्या अवघ्या चार व सहावर्षीय नातवंडांना अखेरचा निरोप देताना जावेदच्या आई, बहिणी व भावाच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी त्यांचे नातेवाईक व समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती. या दुर्दैवी घटनेबाबत उपस्थितांमधून हळहळ व्यक्त केली जात होती. जावेद गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत आला नव्हता. मात्र, आईच्या आजारपणामुळे व ईद साजरी करण्याचा विचार करून तो आला होता, असे जावेदचे बंधू इम्तियाज यांनी सांगितले. 

टॅग्स :mmrdaएमएमआरडीएMaharashtraमहाराष्ट्र