शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

एमएमआरडीएचे प्रकल्प आता खासगी भागीदारीतून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:28 IST

एमएमआरडीएने मुंबई महानगरातील पायाभूत प्रकल्पांच्या जाळ्याचा विस्तार करण्यासाठी आता खासगी भागीदारांचा आधार घेण्याचा विचार सुरु केला.

अमर शैला लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महानगरातील पायाभूत प्रकल्पांच्या जाळ्याचा विस्तार करण्यासाठी आता खासगी भागीदारांचा आधार घेण्याचा विचार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केला आहे. त्यानुसार रस्ते प्रकल्पांची कामे बांधा, वापरा, हस्तांतरीत करा (बीओटी) यासह अन्य कोणत्या पर्यायांनी करता येतील का, याची चाचपणी एमएमआरडीने सुरू केली आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

एमएमआरडीएकडून वाहतूक जलद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू केली आहेत. त्याचबरोबर काही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी एमएमआरडीएला मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. मात्र, बीकेसीतील भूखंड भाडेपट्ट्यावर देऊन मिळणारे उत्पन्न हाच त्यांचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मात्र, या उत्पन्नावरही गेल्या काही वर्षांत मर्यादा आल्याने सध्या एमएमआरडीएच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यातून कर्ज काढून प्रकल्पांची कामे करण्याशिवाय गत्यंतर नाही. परिणामी त्यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी कर्जाव्यतिरिक्त अन्य पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे. एमएमआरडीएने काही दिवसांपूर्वीच कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ मार्गिकेचे काम पीपीपी तत्त्वावर करण्यासाठी स्वारस्य निविदा मागविल्या होत्या. आता त्याच धर्तीवर रस्ते जाळे विस्तारणाऱ्या अन्य प्रकल्पांची कामेही पूर्ण करण्याचा विचार आहे.

एमएमआरडीएने नुकत्याच मीरा-भाईंदर ते गायमुख उन्नत आणि भुयारी मार्ग प्रकल्पाच्या तब्बल १३ हजार कोटी रुपयांच्या निविदा रद्द केल्या आहेत, तसेच या प्रकल्पासाठी कर्ज उभारणी सुरू केली होती. मात्र, हे कर्ज अधिक व्याज दराने मिळण्याची शक्यता आहे. त्यातून आता हा प्रकल्प खासगी भागीदारीतून राबविता येईल का, याचीही चाचपणी सुरू आहे. यासोबतच आगामी प्रकल्पांसाठी हेच धोरण राबविण्यात येणार आहे. त्यातून खर्चाचा भार खासगी भागीदारांवर गेल्याने एमएमआरडीएच्या तिजोरीवरील ताण काहीसा हलका होण्यास मदत मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

बुधवारी दुपारी चार रुग्णवाहिकांमधून चौघांचे पार्थिव आणण्यात आले. मुलगा, सुनेसोबत अद्याप जगही न पाहिलेल्या अवघ्या चार व सहावर्षीय नातवंडांना अखेरचा निरोप देताना जावेदच्या आई, बहिणी व भावाच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी त्यांचे नातेवाईक व समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती. या दुर्दैवी घटनेबाबत उपस्थितांमधून हळहळ व्यक्त केली जात होती. जावेद गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत आला नव्हता. मात्र, आईच्या आजारपणामुळे व ईद साजरी करण्याचा विचार करून तो आला होता, असे जावेदचे बंधू इम्तियाज यांनी सांगितले. 

टॅग्स :mmrdaएमएमआरडीएMaharashtraमहाराष्ट्र