अमर शैला लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महानगरातील पायाभूत प्रकल्पांच्या जाळ्याचा विस्तार करण्यासाठी आता खासगी भागीदारांचा आधार घेण्याचा विचार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केला आहे. त्यानुसार रस्ते प्रकल्पांची कामे बांधा, वापरा, हस्तांतरीत करा (बीओटी) यासह अन्य कोणत्या पर्यायांनी करता येतील का, याची चाचपणी एमएमआरडीने सुरू केली आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
एमएमआरडीएकडून वाहतूक जलद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू केली आहेत. त्याचबरोबर काही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी एमएमआरडीएला मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. मात्र, बीकेसीतील भूखंड भाडेपट्ट्यावर देऊन मिळणारे उत्पन्न हाच त्यांचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मात्र, या उत्पन्नावरही गेल्या काही वर्षांत मर्यादा आल्याने सध्या एमएमआरडीएच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यातून कर्ज काढून प्रकल्पांची कामे करण्याशिवाय गत्यंतर नाही. परिणामी त्यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी कर्जाव्यतिरिक्त अन्य पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे. एमएमआरडीएने काही दिवसांपूर्वीच कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ मार्गिकेचे काम पीपीपी तत्त्वावर करण्यासाठी स्वारस्य निविदा मागविल्या होत्या. आता त्याच धर्तीवर रस्ते जाळे विस्तारणाऱ्या अन्य प्रकल्पांची कामेही पूर्ण करण्याचा विचार आहे.
एमएमआरडीएने नुकत्याच मीरा-भाईंदर ते गायमुख उन्नत आणि भुयारी मार्ग प्रकल्पाच्या तब्बल १३ हजार कोटी रुपयांच्या निविदा रद्द केल्या आहेत, तसेच या प्रकल्पासाठी कर्ज उभारणी सुरू केली होती. मात्र, हे कर्ज अधिक व्याज दराने मिळण्याची शक्यता आहे. त्यातून आता हा प्रकल्प खासगी भागीदारीतून राबविता येईल का, याचीही चाचपणी सुरू आहे. यासोबतच आगामी प्रकल्पांसाठी हेच धोरण राबविण्यात येणार आहे. त्यातून खर्चाचा भार खासगी भागीदारांवर गेल्याने एमएमआरडीएच्या तिजोरीवरील ताण काहीसा हलका होण्यास मदत मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बुधवारी दुपारी चार रुग्णवाहिकांमधून चौघांचे पार्थिव आणण्यात आले. मुलगा, सुनेसोबत अद्याप जगही न पाहिलेल्या अवघ्या चार व सहावर्षीय नातवंडांना अखेरचा निरोप देताना जावेदच्या आई, बहिणी व भावाच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी त्यांचे नातेवाईक व समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती. या दुर्दैवी घटनेबाबत उपस्थितांमधून हळहळ व्यक्त केली जात होती. जावेद गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत आला नव्हता. मात्र, आईच्या आजारपणामुळे व ईद साजरी करण्याचा विचार करून तो आला होता, असे जावेदचे बंधू इम्तियाज यांनी सांगितले.