शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

नाशिकच्या वेशीवरच 'लाल वादळ' थांबविण्यास सरकार यशस्वी, लाँग मार्च स्थगित

By अझहर शेख | Updated: February 21, 2019 23:13 IST

मोर्चेक-यांनी सुमारे वीस किलोमीटरचे अंतर कापून पहिल्या मुक्कामाचा पडाव गाठला. आंबेबहुला या गावात महामार्गालगत मोर्चेक-यांनी मुक्काम ठोकला.

ठळक मुद्देवादळी बैठकीत अखेर तोडगा काढण्यास दोन्ही मंत्र्यांना यश आले. मागण्या पुर्णत्वास नेण्याची जबाबदारी महाजन यांची

नाशिक : शेतकरी, आदिवासींच्या विविध मागण्यांचा जाब विचारण्यासाठी लाल बावटा घेऊन पुन्हा एकदा हजारो शेतकरी, आदिवासी किसान सभेच्या हाकेला ओ देत रस्त्यावर उतरले होते. नाशिक-मुंबई असा लॉँग मार्च किसान सभेकडून स्थगीत करण्यात आला आहे. लेखी हमीपत्र सरकारकडून पालकमंत्री गिरीष महाजन व जयकुमार रावल यांनी किसान सभेच्या नेत्यांकडे सुपुर्द केले.

दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा, महाराष्टÑाचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा, शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी विनाअट जाहीर करा या प्रमुख मागण्या घेऊन पुन्हा एकदा वर्षभरानंतर नाशकातून मुंबईच्या दिशेने ह्यलाल वादळह्ण उठण्याच्या तयारीत आहे. यासाठी बुधवारी (दि.२०) दिवसभरात राज्यातील विविध जिल्ह्यांमधून हजारोंच्या संख्येने शेतकरी, आदिवासी नाशिक मुक्कामी होते. गुरूवारी (दि.२०) सकाळी नाशिकवरून मुंबईच्या दिशेने 'लॉँग मार्च' काढला गेला. मोर्चेक-यांनी सुमारे वीस किलोमीटरचे अंतर कापून पहिल्या मुक्कामाचा पडाव गाठला. आंबेबहुला या गावात महामार्गालगत मोर्चेक-यांनी मुक्काम ठोकला. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, जयकुमार रावल हे सरकारकडून किसान सभेच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी वाडीव-हे शिवारात दुपारी दाखल झाले होते. मंत्र्यांकडून शिष्टाई सुरू होती. सायंकाळी पाच वाजेपासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत किसान सभेचे नेते व मोर्चाचे पदाधिका-यांसमवेत दोन्ही मंंत्र्यांसह जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, पोलीस अधिक्षक संजय दराडे यांच्या उपस्थितीत चर्चा केली. पाच तास चाललेल्या या वादळी बैठकीत अखेर तोडगा काढण्यास दोन्ही मंत्र्यांना यश आले. महाजन यांच्यासोबत बुधवारी रात्री नाशिकच्या विश्रामगृहावर उशिरापर्यंत झालेली बैठक निष्फळ ठरली होती. त्यानंतर मोर्चेकरी सकाळी नऊ वाजता मुंबईच्या दिशेने चालले होते; मात्र महामार्गावरील गतीमान बैठकीत तोडगा काढणे पाच तासांच्या चर्चेअंती शक्य झालेसरकारच्या लेखी आश्वासनानंतर आमदार जीवा पांडू गावीत यांनी मोर्चा स्थगित केल्याची घोषणा केली. बैठकीदरम्यान सकारात्मक चर्चा झाली असून वनहक्क जमिनीचे दावे येत्या तीन महिन्यांत निकाली काढण्याचे आदेश दिल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.वर्षभरापुर्वी नाशिकवरून मुंबईत हजारो ते लाखोंच्या संख्येने शेतकरी, आदिवासी कष्टक-यांनी पायी धडक देत फडणवीस सरकारकडे विविध मागण्यांचे गा-हाणे मांडले होते; मात्र वर्ष उलटूनदेखील त्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने पुन्हा एकदा शेतकरी, आदिवासी बांधव अखिल भारतीय किसान सभेने दिलेल्या 'लॉँग मार्च'च्या हाकेला प्रतिसाद देत रस्त्यावर उतरले आहेत. या लॉँग मोर्चाचे नेतृत्व किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, आमदार जीवा पांडू गावीत, डॉ. अजित नवले, किसन गुजर आदि नेते करीत होते.नाशिक जिल्हा वगळता अन्य जिल्ह्यांत वनहक्क जमिनीचे दावे निकाली काढण्याचा वेग कमी आहे, हे मान्य करावे लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आदेश दिले असून संपुर्ण राज्यात वन हक्क जमिनीचे दावे निकाली काढले जातील. तांत्रिक बाबींमध्ये अडकू नये, सरकार या बाबी दूर करून राज्याचे पाणी वाचविण्यासाठी सरकारला सर्वांनी सहकार्य करावे.-गिरीश महाजन, पालकमंत्री

आर्थिक स्वरुपाच्या मुद्दयांवर सरकार ठोस पावले उचलत नव्हते. त्यामुळे पुन्हा बळीराजा जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरला. दर दोन महिन्यानंतर गिरीष महाजन हे वेळ देऊन बैठक घेऊन पाठपुरावा करतील आणि सर्व मागण्या पुर्णत्वास नेण्याची जबाबदारी महाजन यांची असेल. लेखी हमी मिळाल्यामुळे व सकारात्मक चर्चा झाल्याची खात्री पटल्यानंतरच मोर्चा स्थगीत करण्याचा निर्णय घेतला गेला. - डॉ. अजित नवले, राज्य सरचिटणीस, किसान सभा

 

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चNashikनाशिकGirish Mahajanगिरीश महाजनJaykumar Rawalजयकुमार रावलBJPभाजपा