शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

मानसिक आरोग्य धोरणाला मुहूर्त मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 06:08 IST

मसुदा शासनाला सादर : सामान्यांना सुलभरीत्या उपचार उपलब्ध करून देण्यासाठी तरतुदी

स्नेहा मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जागतिक पातळीवरील वाढता ताण पाहता, गेल्या वर्षी केंद्र शासनाने मानसिक आरोग्य कायदा संमत केला. त्यानुसार, प्रत्येक राज्यानेही मानसिक आरोग्य धोरण आखण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे, देशातील काही राज्यांमध्ये मानसिक आरोग्य धोरण तयार होऊन त्याची अंमलबजावणीही करण्यात आली. मात्र, महाराष्ट्रात अजूनही मानसिक आरोग्य धोरणाला मुहूर्तच मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव जागतिक आरोग्य दिनी समोर आले आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाकडे अजूनही परिपक्व मानसिकता नसल्याचे दिसून येत आहे.

राज्याने मानसिक आरोग्यासाठी अर्थसंकल्पामध्ये १०० ते १२० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधीमधील मोठा हिस्सा कर्मचाऱ्यांचे पगार व व्यवस्थापनामध्ये खर्च होतो. केंद्र शासनाने मानसिक आरोग्य अधिनियम मंजूर केल्यानंतर, राज्याने मानसिक आरोग्य प्राधिकरण तयार केले. या प्राधिकरणात शासकीय आणि अशासकीय अशा नऊ सदस्यांची नियुक्ती करून त्यांना मानसिक आरोग्य धोरण तयार करण्याची जबाबदारी दिली. त्यानुसार, या प्राधिकरणाने मानसिक आरोग्य धोरणाचा मसुदा राज्य शासनाला सादर केल्याची माहिती आरोग्य विभागाच्या मानसिक आरोग्य शाखेच्या सहसंचालिका डॉ. साधना तायडे यांनी दिली.

या संदर्भात राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव म्हणाले की, राज्याच्या मानसिक आरोग्य धोरणात सामान्यांना अधिक सुलभरीत्या उपचार मिळावे, यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. राज्याच्या मानसिक आरोग्य प्राधिकरणाने हा मसुदा दोन महिन्यांपूर्वी शासनाला सादर केला आहे. मात्र, आता आचारसंहितेमुळे याबाबत कोणताही निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे आता लोकसभेच्या निवडणुकांनंतर याबाबत निर्णय अपेक्षित आहे.मानसिक आरोग्याविषयी अजूनही अज्ञानमानसिक स्वास्थ्य लाभावे, यासाठी आपण झटत असतो. मानसिक आरोग्याच्या भावनिक पैलूंचा जास्त विचार होताना दिसतो. एखादी कृती, घटना किंवा नातेसंबंधामुळे आपण समाधानी असलो की आपल्याला वाटते, आपले मानसिक आरोग्य सुदृढ आहे. मात्र, मानसिक आरोग्य ही स्थिर बाब नाही. परिस्थितीनुसार यात नियमित बदल होत राहतात. त्यामुळे मानसिक आरोग्य म्हणजे काय, त्यात कोणत्या प्रक्रियांचा समावेश असतो? मानसिक सुदृढता व स्वास्थ्य का महत्त्वाचे असते? याबाबत सर्वसामान्यांत जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे.- डॉ. योगेश शाह, मानसोपचारतज्ज्ञदेशात १० कोटींहून अधिक मानसिक रुग्णच्जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, भारतातील १३५ कोटी लोकसंख्येपैकी ७.५ टक्के लोक हे मानसिक विकारांनी ग्रस्त आहेत.च्यातील काहींच्या विकाराचे स्वरूप अतिशय गंभीर आहे.च्जगातील १९५ देशांपैकी भारतासह असे फक्त १३ देश आहेत, जिथे मानसिक विकारांनी ग्रस्त असलेल्यांची संख्या प्रत्येकी १० कोटींच्या वर आहे.च्भारतामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने अशा प्रकारचे रुग्ण असूनही, त्यांच्यावर उपचार करण्याकरिता फक्त ३,८०० मानसोपचार तज्ज्ञ, ८९८ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, ८५० सायक्रिअ‍ॅटिक सोशल वर्कर, १,५०० सायक्रिअ‍ॅटिक नर्सेस, ४३ मनोरुग्ण रुग्णालये इतकीच संसाधने उपलब्ध आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य