शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

मानसिक आरोग्य धोरणाला मुहूर्त मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 06:08 IST

मसुदा शासनाला सादर : सामान्यांना सुलभरीत्या उपचार उपलब्ध करून देण्यासाठी तरतुदी

स्नेहा मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जागतिक पातळीवरील वाढता ताण पाहता, गेल्या वर्षी केंद्र शासनाने मानसिक आरोग्य कायदा संमत केला. त्यानुसार, प्रत्येक राज्यानेही मानसिक आरोग्य धोरण आखण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे, देशातील काही राज्यांमध्ये मानसिक आरोग्य धोरण तयार होऊन त्याची अंमलबजावणीही करण्यात आली. मात्र, महाराष्ट्रात अजूनही मानसिक आरोग्य धोरणाला मुहूर्तच मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव जागतिक आरोग्य दिनी समोर आले आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाकडे अजूनही परिपक्व मानसिकता नसल्याचे दिसून येत आहे.

राज्याने मानसिक आरोग्यासाठी अर्थसंकल्पामध्ये १०० ते १२० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधीमधील मोठा हिस्सा कर्मचाऱ्यांचे पगार व व्यवस्थापनामध्ये खर्च होतो. केंद्र शासनाने मानसिक आरोग्य अधिनियम मंजूर केल्यानंतर, राज्याने मानसिक आरोग्य प्राधिकरण तयार केले. या प्राधिकरणात शासकीय आणि अशासकीय अशा नऊ सदस्यांची नियुक्ती करून त्यांना मानसिक आरोग्य धोरण तयार करण्याची जबाबदारी दिली. त्यानुसार, या प्राधिकरणाने मानसिक आरोग्य धोरणाचा मसुदा राज्य शासनाला सादर केल्याची माहिती आरोग्य विभागाच्या मानसिक आरोग्य शाखेच्या सहसंचालिका डॉ. साधना तायडे यांनी दिली.

या संदर्भात राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव म्हणाले की, राज्याच्या मानसिक आरोग्य धोरणात सामान्यांना अधिक सुलभरीत्या उपचार मिळावे, यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. राज्याच्या मानसिक आरोग्य प्राधिकरणाने हा मसुदा दोन महिन्यांपूर्वी शासनाला सादर केला आहे. मात्र, आता आचारसंहितेमुळे याबाबत कोणताही निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे आता लोकसभेच्या निवडणुकांनंतर याबाबत निर्णय अपेक्षित आहे.मानसिक आरोग्याविषयी अजूनही अज्ञानमानसिक स्वास्थ्य लाभावे, यासाठी आपण झटत असतो. मानसिक आरोग्याच्या भावनिक पैलूंचा जास्त विचार होताना दिसतो. एखादी कृती, घटना किंवा नातेसंबंधामुळे आपण समाधानी असलो की आपल्याला वाटते, आपले मानसिक आरोग्य सुदृढ आहे. मात्र, मानसिक आरोग्य ही स्थिर बाब नाही. परिस्थितीनुसार यात नियमित बदल होत राहतात. त्यामुळे मानसिक आरोग्य म्हणजे काय, त्यात कोणत्या प्रक्रियांचा समावेश असतो? मानसिक सुदृढता व स्वास्थ्य का महत्त्वाचे असते? याबाबत सर्वसामान्यांत जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे.- डॉ. योगेश शाह, मानसोपचारतज्ज्ञदेशात १० कोटींहून अधिक मानसिक रुग्णच्जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, भारतातील १३५ कोटी लोकसंख्येपैकी ७.५ टक्के लोक हे मानसिक विकारांनी ग्रस्त आहेत.च्यातील काहींच्या विकाराचे स्वरूप अतिशय गंभीर आहे.च्जगातील १९५ देशांपैकी भारतासह असे फक्त १३ देश आहेत, जिथे मानसिक विकारांनी ग्रस्त असलेल्यांची संख्या प्रत्येकी १० कोटींच्या वर आहे.च्भारतामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने अशा प्रकारचे रुग्ण असूनही, त्यांच्यावर उपचार करण्याकरिता फक्त ३,८०० मानसोपचार तज्ज्ञ, ८९८ क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, ८५० सायक्रिअ‍ॅटिक सोशल वर्कर, १,५०० सायक्रिअ‍ॅटिक नर्सेस, ४३ मनोरुग्ण रुग्णालये इतकीच संसाधने उपलब्ध आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य