शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

माऊलींची आषाढी वाट आणखी बिकट

By admin | Updated: June 8, 2017 01:01 IST

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याची पुण्यापर्यंतची पालखीची वाट बिकट झालेली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : आषाढीवारी अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याची पुण्यापर्यंतची पालखीची वाट बिकट झालेली आहे. पालखी महामार्ग रुंदीकरणाचे रखडलेले काम, बांधकामांचे अस्ताव्यस्त पडलेले साहित्य, नियोजनशून्य काम, खोदलेले चर, पडलेला राडारोडा यामुळे वारकऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार आहे. आषाढीवारी येत्या १६ जूनपासून सुरू होणार आहे. शुक्रवारी देहूतून संतश्रेष्ठ तुकाराममहाराज आणि शनिवारी श्री क्षेत्र आळंदीतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज यांची पालखी श्रीक्षेत्र पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. पावसाळा तोंडावर आला असला तरी रस्त्यांची कामे संथगतीने सुरू आहेत. पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरी देहूतून पिंपरीपर्यंत आणि आळंदीतून विश्रांतवाडीपर्यंतची पालखीची वाट बिकट आहे. रस्ता रुंदीकरणाची कामे अपूर्ण असल्याने यंदा वारकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागणार आहे. मात्र महापालिका आणि जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही. काम संथगतीने : ‘लोकमत’ने आळंदीतील देहूफाट्यापासून दिघीपर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली. विश्रांतवाडीतून दिघीपर्यंतचा रस्ता अपूर्ण आहे. रुंदीकरण रखडलेले आहे. तसेच दिघी गावठाणातही रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. एकच लेन खुली ठेवली आहे. पुढे मॅगझिन चौकापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. मॅगझिन चौकापासून साई मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. तसेच मधील रस्त्याचे काम सुरू असून बाजूने वाहने जाण्याची सोय केली आहे. काम संथगतीने : ‘लोकमत’ने आळंदीतील देहूफाट्यापासून दिघीपर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली. विश्रांतवाडीतून दिघीपर्यंतचा रस्ता अपूर्ण आहे. रुंदीकरण रखडलेले आहे. तसेच दिघी गावठाणातही रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. एकच लेन खुली ठेवली आहे. पुढे मॅगझिन चौकापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. मॅगझिन चौकापासून साई मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. तसेच मधील रस्त्याचे काम सुरू असून बाजूने वाहने जाण्याची सोय केली आहे. जीवघेण्या लोखंडी सळयाजाताना साई मंदिराच्या अलीकडे शंभर मीटरवरील रस्त्यावरच लोखंडी सळया बाहेर आलेल्या आहेत. उघड्या सळयांमुळे अपघात संभवतो. जीवघेण्या लोखंडी सळया येथे आहेत. तसेच येथे मोठ्या प्रमाणावर राडारोडा पडलेला आहे. पुढे साईमंदिरापासून वळणावर असलेल्या अडरपासचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला राडारोडा आणि खड्डे आहेत. त्यामुळे हा रस्ता धोक्याचा बनला आहे. दंडात्मक कारवाई करारस्त्यावर पडलेल्या सळया आणि राडारोडा रात्रीच्या वेळी दिसत नाही. त्यामुळे गाडी घसरून अपघात होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या अपघातांना जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाळ्यापूर्वी काम होणे अपेक्षित होते. मात्र, वाढीव खर्चाच्या आशेपायी ठेकेदाराने हे काम संथगतीने सुरू ठेवले आहे. पारदर्शक कारभाराचा टेंभा मिरविणारे भाजपाचे नेते आता कुठे गेले, असा सवाल उपस्थित करून वेळेवर काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणीही या भागातील नागरिकांनी केली आहे.