शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पाण्यासाठी शेतकºयांनी तर चाºयासाठी मराठवाड्याने दिला आधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 12:32 IST

गावडी दारफळ : दुष्काळामुळे लग्ने टाकली लांबणीवर, पाण्यासाठी आबालवृद्धांची वणवण

ठळक मुद्देसोलापूर-बार्शी रोडवर वसलेल्या गावडी दारफळची लोकसंख्या सुमारे तीन हजार आहेमागील वर्षी वॉटर कप स्पर्धेत गावडी  दारफळने तिसºया क्रमांकाचे पारितोषिक मिळवले होते ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा विहीर आणि त्याशेजारील विंधन विहीर हे पाणी पुरवठ्याचे मुख्य स्रोत

राकेश कदम 

सोलापूर : मागील वर्षी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत पारितोषिक पटकावलेल्या गावडी दारफळ (ता.  उत्तर सोलापूर) ला यंदा पाणीटंचाई आणि चाºयाच्या प्रश्नाने घेरले आहे.  गावतलाव आणि ग्रामपंचायतीची विहीर कोरडी पडली आहे. या परिस्थितीत गावातील हरिदास पवार आणि भामाबाई पवार यांनी आपल्या घरासमोरील विंधन विहीर गावासाठी खुली केली आहे. त्यातून निम्म्या गावाला आधार मिळाला आहे. गावात चाºयाचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी मराठवाड्यातील काटी गावच्या छावणीत काही जनावरे दाखल करण्यात आली आहेत. 

सोलापूर-बार्शी रोडवर वसलेल्या गावडी दारफळची लोकसंख्या सुमारे तीन हजार आहे. मागील वर्षी वॉटर कप स्पर्धेत गावडी  दारफळने तिसºया क्रमांकाचे पारितोषिक मिळवले होते. ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा विहीर आणि त्याशेजारील विंधन विहीर हे पाणी पुरवठ्याचे मुख्य स्रोत आहेत़ विहिरीतील पाण्याने तळ गाठला आहे. या विहिरीत दररोज रात्री दोन टॅँकर पाणी सोडले जाते. त्यानंतर एका गल्लीला तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.

गावातील हरिदास पवार यांनी चार महिन्यांपूर्वी आपल्या घरासमोर एक विंधन विहीर घेतली.  त्याला चांगले पाणी लागले. हरिदास पवार हे पाणी केवळ स्वत:च्या घरासाठी वापरु शकले असते. पण गावातील पाणी टंचाई त्यांना अस्वस्थ करीत होती. आपल्या घरासमोरच त्यांनी दोन हजार लिटर पाण्याची टाकी बसविली. दररोज सकाळी ही टाकी भरुन घेतली जाते. लोक आदल्या दिवशी सायंकाळी टाकीसमोर घागरी, हंडे ठेवायला सुरुवात करतात. पवार यांच्या दातृत्वामुळे निम्म्या गावाला आधार मिळाल्याचे गावातील सामाजिक कार्यकर्ते श्रीधर कदम यांनी सांगितले. 

गावच्या शेजारी काही लोकांची शेती आहे. हे शेतकरी दररोज आपल्या विहिरीतील, विंधन विहिरीतील एक-दोन घागरी पाणी प्रत्येकाला देतात. गावातील लोक एकमेकांचा आधार बनल्यामुळे पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी गावाला पाणी टंचाईची झळ बसली होती. पण केवळ याचवर्षी टँकर सुरू करावा लागला आहे. गावात दरवर्षी १८ किंवा १९ फेब्रुवारीला सामुदायिक विवाह सोहळा होतो. यानंतर होणारी लग्ने लांबणीवर टाकण्याची किंवा समोरच्या नातेवाईकांवर टाकण्याची वेळ आली आहे. पाण्यासाठी आबालवृध्द वणवण करीत असतात.

काटी गावच्या छावणीत जनावरे - गावडी दारफळमध्ये पाण्याच्या टंचाईबरोबरच जनावरांच्या चाºयाचाही प्रश्न गंभीर आहे. ज्यांच्याकडे पाणी होते त्यांनी चारा पिकवून तो साठवून ठेवला आहे. पण ज्यांच्याकडे चाराच नाही अशा पशुपालकांचे हाल होत आहेत. गावडी दारफळ लगत तुळजापूर तालुक्यातील काटी गावची शिव आहे.  काटी गावात जनावरांची चारा छावणी उघडण्यात आली आहे. गावातील काही लोकांची काटी गावच्या हद्दीतही शेती आहे. त्या शेतकºयांनी काटी गावच्या छावणीत आपली जनावरे दाखल केली आहेत. 

पाण्यासाठी शेतात एकूण सात बोअर घेतले. त्यातील केवळ एका बोअरला पाणी लागले. पाणी टंचाईमुळे गावातील व्यवसायावरही परिणाम झाला आहे. पुढील वर्षी पाऊस पडला नाही तर शेतीचे अर्थशास्त्र ढासळणार आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्वच गावांत पाणी आणि चाºयाची टंचाई आहे. पण तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश नाही याचे वाईट वाटते. - किशोर मेटे, शेतकरी. 

आमची सीताफळची बाग आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या बागेला टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागला आहे. जवळपास २० ते २५ टॅँकर लागले आहेत. उन्हाळ्यात बाग जगविली नसती तर मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले असते. गावातील इतर अनेक शेतकरी टॅँकरचा आधार घेत आहेत. - श्रीधर कदम, गावडी दारफळ. 

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूकWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा