शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

केंद्राच्या नोकरीत 'मराठी' टक्का कमी; परीक्षा देणारे लाखात, निवडीचे प्रमाण मात्र अल्प

By पोपट केशव पवार | Updated: February 1, 2025 16:55 IST

जनजागृतीचा अभाव : इंग्रजी भीतीही ठरतेय कारणीभूत

पोपट पवारकोल्हापूर : केंद्र सरकारचीनोकरी म्हणजे गलेलठ्ठ पगार, भरपूर सुविधा अन् समाजात एक वेगळी प्रतिष्ठा. त्यामुळे केंद्र सरकारचीनोकरी मिळवण्यासाठी अनेक जण आयुष्यभर धडपडत असतात. मात्र, केंद्र सरकारच्या सर्वच विभागांमध्ये महाराष्ट्रातील मुलांची संख्या इतर राज्यांच्या तुलनेत फारच कमी आहे. मार्गदर्शनाचा अभाव, इंग्रजीची भीती आणि राज्याबाहेर न जाण्याच्या मानसिकतेमुळे मराठी मुले केंद्र सरकारच्या सुखाच्या नोकरीला मुकत असल्याचे चित्र आहे.केंद्र सरकारच्या रेल्वे, बँकिंग, एलआयसी यासह स्टाफ सिलेक्शनच्या जागा प्रत्येक वर्षी निघतात. एसबीआय व रेल्वेमध्ये तर प्रत्येक वर्षी हजारो जागा भरल्या जातात. मात्र, या परीक्षा देण्याकडेच महाराष्ट्रातील मुले कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे. परीक्षा दिली तर निवड होण्याचे प्रमाणही अगदी नगण्य आहे.मार्गदर्शनाचा अभावस्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांचा अभ्यासक्रम हा शाळेत शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाशी सुसंगत आहे. मात्र, यातील मायनस पद्धती समजून न घेतल्याने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा घोळ होतो. विशेषत: बँकिगच्या जागा कधी सुटतात येथपासून ते अभ्यासक्रमांपर्यंत विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे या परीक्षांच्या भानगडीत विद्यार्थी पडत नाहीत. स्टाफ सिलेक्शन परीक्षांबाबत स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेणारे क्लासचालकही तितकीशी जनजागृती करत नसल्याचा आक्षेप या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आहे.परीक्षा देणारे लाखात, निवडीचे प्रमाण मात्र अल्पकाही दिवसांपूर्वी एसबीआयने क्लर्क पदासाठी देशभरातील १४ हजार जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. ५० लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यामध्ये महाराष्ट्रातील अडीच लाख विद्यार्थ्यांचा समावेश होता. मात्र, यामध्ये निवडीचे प्रमाण हे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहे. हीच परिस्थिती रेल्वेच्या परीक्षांबाबत आहे. आपल्याकडे शंभर गुणांचा पेपर सोडवण्यासाठी तीन तासांचा वेळ दिला जातो. स्टाफ सिलेक्शनच्या पेपरला शंभर गुणांसाठी अवघा एक तासाचा वेळ असतो. त्यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्याची गती महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना राखता येत नसल्यामुळे या परीक्षांमध्ये विद्यार्थी यशस्वी होत नसल्याचा निष्कर्ष या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून काढला जात आहे.

स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांचा अभ्यासक्रम महाराष्ट्रातील मुलांनी समजून घेणे गरजेचे आहे. परीक्षा देताना गती राखण्याबरोबरच या परीक्षांमधील नियमानुसार आपले गुण वजा होणार नाहीत याचीही काळजी घ्यावी लागते. आपले विद्यार्थी नेमके येथेच चुकतात. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा टक्का कमी दिसतो. - अविराज गवळी, एसबीआय शाखा प्रबंधक, गोकुळ शिरगाव.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCentral Governmentकेंद्र सरकारjobनोकरीmarathiमराठी