शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

Vidhan Sabha 2019: मुंबईसह कोकणात भाजपवर सेना भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 3:34 AM

राष्ट्रवादीला फटका; छोट्या पक्षांची कोंडी

- विनायक पात्रुडकरमुंबई : मुंबई- ठाणे, कोकणातील संख्याबळात सध्या शिवसेना मोठा भाऊ असली, तरी तळकोकणात नारायण राणे यांना भाजप किती बळ देते आणि गणेश नाईक यांच्या प्रवेशाचा ठाणे, रायगड, पालघरमध्ये किती प्रभाव पडतो, यावर भाजपचे मोठेपण ठरेल.मुंबईत भायखळा, मागाठाणे, मालाड, वडाळ््याच्या जागांवरून युतीत वाद असले, तरी सध्याची शिवसेनेची मवाळ भूमिका पाहता ते सुटू शकतील. काँग्रेसमधील अंतर्गत वाद, धुगधुगी कायम असलेली राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाने गमावलेला जनाधार, वंचित-एमआयएमच्या ताकदीचे विभाजन यामुळे युतीपुढे मोठे आव्हान नाही. मनसेचे इंजिन भोंगा वाजवण्याच्या तयारीत असले, तरी त्यांनी स्वत:वर मर्यादा घालून घेतल्याने ते युतीचे किती नुकसान करतील, यावरच लढतीचे चित्र ठरेल.युतीच्या मेगाभरतीत राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा (शहापूर), अवधूत तटकरे (श्रीवर्धन), भास्कर जाधव (गुहागर) शिवसेनेत; तर संदीप नाईक (ऐरोली) भाजपमध्ये दाखल झाले. उल्हासनगरात कुमार आयलानी- ओमी कलानी या भाजप नेत्यांत टोकाचे वाद आहेत. ज्योती कलानींचे राजकारण सोयीचे बनले आहे. मीरा-भार्इंदरमध्ये युतीतून विस्तव जात नाही. त्यामुळे तेथे युती होऊनही धुसफूस कायम राहील. कळवा-मुंब्रा येथे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना यावेळी तगडे आव्हान देण्याची व्यूहरचना सुरू आहे. ते पाहता सध्या ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीपुढे अस्तित्वाचे आव्हान आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात भाजपचा एकही आमदार नाही. भास्कर जाधव यांच्या सेना प्रवेशामुळे गुहागरचा दावाही विरला. भाजपमुळे राज्यसभेत गेलेले नारायण राणे यांनी आपला पक्ष भाजपत विलीन करण्याचा निर्णय घेतला, तरी कणकवलीत नितेश यांचा मार्ग निर्वेध नसेल. रायगडमध्ये फक्त एक आमदार असलेल्या भाजपची भिस्त विद्यमान पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्यावर आहे. पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या तीनपैकी एक आमदार फोडून शिवसेनेने त्यांच्या कोंडीला सुरूवात केली आहे. एन्काऊंटरफेम प्रदीप शर्मा यांच्या शिवसेना प्रवेशानंतर नालासोपाऱ्याची लढतही कडवी बनते आहे.प्रचारात मुद्दे काय?मेट्रो कारशेडच्या जमिनीचा वाद, कोस्टल रोड, कोळीवाडे- धारावी, बीडीडी चाळी, अभ्युदयनगर, भेडीबाजारचा पुनर्विकास मुंबईच्या प्रचारात केंद्रस्थानी येईल.मेट्रो, एमएमआरडीएचे रखडलेले प्रकल्प, समृद्धी-बडोदा महामार्ग, फ्रेट कॉरिडॉरचे भू संपादन, जुन्या इमारतींचा पुनर्विकास, क्लस्टरमुळे निर्माण झालेले प्रश्न ठाणे जिल्ह्यात तीव्र आहेत.कोकणातील रायगड-रत्नागिरी जिल्ह्यात तेलशुद्ध्किरण प्रकल्प येणार की जाणार, पर्यटनाचा विकास, नवनगराची उभारणी, रोजगाराच्या अपुºया संधी चर्चेत राहण्याची चिन्हे आहेत.मुंबईसह कोकट पट्ट्यातील सध्याचे बलाबलएकूण जागा- ७५भाजप-२६शिवसेना-२८काँग्रेस-०६राष्ट्रवादी-०८इतर-०७

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस