शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

Maharashtra Government : 'येत्या काळात नवा महाराष्ट्र घडणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 12:42 IST

Maharashtra News:आदित्य ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. शपथविधीनंतर येत्या काळात नवा महाराष्ट्र घडणार असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. 

ठळक मुद्देआदित्य ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे.शपथविधीनंतर येत्या काळात नवा महाराष्ट्र घडणार असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.'आम्ही एकत्र काम करून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ'

मुंबई - राज्यात अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर सरकार स्थापन होणार आहे. नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला असून 28 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.40 वाजता दादर येथील शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तत्पूर्वी विधिमंडळात सर्व आमदारांचा शपथविधी संपन्न झाला. हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सर्व आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. शपथविधीनंतर येत्या काळात नवा महाराष्ट्र घडणार असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. 

आदित्य ठाकरे यांनी आमदार म्हणून निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले आहेत. 'आम्ही एकत्र काम करून महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ, आज अनेक तरुण आमदारांनी शपथ घेतली आहे. आम्ही सगळे तरुण मिळून अनेक चांगले काम करू. नवा महाराष्ट्र घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे' असं आदित्य यांनी म्हटलं आहे. तसेच मंत्रिमंडळाबाबत निर्णय सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे घेतील. महाराष्ट्राची सेवा करण्याचं काम नीट पार पाडू असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

'वेगळा अनुभव होता. दुष्काळमुक्त महाराष्ट्र, प्रदूषणमुक्त महाराष्ट्र, बेरोजगारीमुक्त महाराष्ट्र झाल्यावर बाळासाहेबांचं स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होईल' असं देखील माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडीनंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाचे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली.

शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीच्या सोहळ्याला त्यांचे लहान बंधू मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राजकारण व कुटुंब वेगळं ठेवणारे ठाकरे कुटुंब उद्धव ठाकरेंच्या शपथविधाला पुन्हा एकत्र पाहायला मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी देखील राज ठाकरे शपथविधीला उपस्थित राहिल्यास आनंद होईल असं मत व्यक्त केलं आहे. 

 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019