शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

Maharashtra Government: संजय राऊत मुख्यमंत्री व्हावेत, ही शरद पवारांची इच्छा?, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 11:54 IST

Maharashtra News : गेल्या अनेक दिवसांपासून मीडिया आणि राजकारण्याच्या केंद्रस्थानी असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत मुख्यमंत्री होऊ शकतात, अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे. 

मुंबईः राज्यात लवकरच महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येणार असून, शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसावं, अशी मागणी शिवसैनिकांनी केली होती. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांच्या गळ्यातही मुख्यमंत्रिपदाची माळ पडण्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आणखी एक नाव अगत्यानं घेतलं जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मीडिया आणि राजकारण्याच्या केंद्रस्थानी असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत मुख्यमंत्री होऊ शकतात, अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना छेडलं असता, त्यांनी मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच व्हावं, यावर तिन्ही पक्षांचं एकमत आहे. तसेच शिवसैनिकांचीही तीच इच्छा असल्याचं सांगत त्यांनी विषयाला बगल दिली. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात ‘सिल्व्हर ओक’मध्ये सत्ता स्थापन करण्यासंदर्भात चर्चा झाली असता, मुख्यमंत्री संजय राऊतांना करावं, अशी इच्छा पवारांनी उद्धव ठाकरेंकडे बोलून दाखवल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत अचानक संजय राऊत यांचं नाव आघाडीवर आलं आहे. संजय राऊत यांनी भाजपाला अंगावर घेत शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडली होती. भाजपाच्या दबावाला न झुकता संजय राऊतांनी त्यांच्यावर वेळोवेळी निशाणा साधला. त्यामुळेच संजय राऊत यांना बक्षिसाच्या स्वरूपात मुख्यमंत्रिपद मिळण्याची एक अटकळ बांधली जात आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना सत्ता स्थापन करेल, अशी आग्रही भूमिका नेहमीच संजय राऊत मांडत आले आहेत.शिवसेनेकडे 170 आमदारांचं पाठबळ असल्याचंही त्यांनी वेळोवेळी सांगितलं आहे. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत शिवसैनिकालाच बसवणार असल्याचंही त्यांनी अनेकदा स्पष्ट केलेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होणार असून, तेच सरकारचा योग्य चेहरा ठरू शकतात. 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री सेनेचा असल्यास आम्ही पाठिंबा देणार आहोत, तसेच राज्यातला सत्ता संघर्ष संपलेला असून, दोन दिवसांत राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा करू, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले आहेत.दरम्यान, आज होणाऱ्या शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे किमान समान कार्यक्रमासंदर्भात आमदारांना कल्पना देणार आहेत. महाविकासआघाडी शनिवार 23 नोव्हेंबरला सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजभवनात भेटीची वेळ घेण्यात येईल. येत्या सोमवारी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार