शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

Maharashtra Government: संजय राऊत मुख्यमंत्री व्हावेत, ही शरद पवारांची इच्छा?, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 11:54 IST

Maharashtra News : गेल्या अनेक दिवसांपासून मीडिया आणि राजकारण्याच्या केंद्रस्थानी असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत मुख्यमंत्री होऊ शकतात, अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे. 

मुंबईः राज्यात लवकरच महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर येणार असून, शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसावं, अशी मागणी शिवसैनिकांनी केली होती. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांच्या गळ्यातही मुख्यमंत्रिपदाची माळ पडण्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आणखी एक नाव अगत्यानं घेतलं जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मीडिया आणि राजकारण्याच्या केंद्रस्थानी असलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत मुख्यमंत्री होऊ शकतात, अशीही एक शक्यता वर्तवली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना छेडलं असता, त्यांनी मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच व्हावं, यावर तिन्ही पक्षांचं एकमत आहे. तसेच शिवसैनिकांचीही तीच इच्छा असल्याचं सांगत त्यांनी विषयाला बगल दिली. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात ‘सिल्व्हर ओक’मध्ये सत्ता स्थापन करण्यासंदर्भात चर्चा झाली असता, मुख्यमंत्री संजय राऊतांना करावं, अशी इच्छा पवारांनी उद्धव ठाकरेंकडे बोलून दाखवल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत अचानक संजय राऊत यांचं नाव आघाडीवर आलं आहे. संजय राऊत यांनी भाजपाला अंगावर घेत शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडली होती. भाजपाच्या दबावाला न झुकता संजय राऊतांनी त्यांच्यावर वेळोवेळी निशाणा साधला. त्यामुळेच संजय राऊत यांना बक्षिसाच्या स्वरूपात मुख्यमंत्रिपद मिळण्याची एक अटकळ बांधली जात आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना सत्ता स्थापन करेल, अशी आग्रही भूमिका नेहमीच संजय राऊत मांडत आले आहेत.शिवसेनेकडे 170 आमदारांचं पाठबळ असल्याचंही त्यांनी वेळोवेळी सांगितलं आहे. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत शिवसैनिकालाच बसवणार असल्याचंही त्यांनी अनेकदा स्पष्ट केलेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होणार असून, तेच सरकारचा योग्य चेहरा ठरू शकतात. 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री सेनेचा असल्यास आम्ही पाठिंबा देणार आहोत, तसेच राज्यातला सत्ता संघर्ष संपलेला असून, दोन दिवसांत राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दावा करू, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले आहेत.दरम्यान, आज होणाऱ्या शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे किमान समान कार्यक्रमासंदर्भात आमदारांना कल्पना देणार आहेत. महाविकासआघाडी शनिवार 23 नोव्हेंबरला सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजभवनात भेटीची वेळ घेण्यात येईल. येत्या सोमवारी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार