शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

Ajit Pawar Resign: उपमुख्यमंत्रिपद सोडणारे अजित पवार राजकारणातूनही संन्यास घेणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 15:07 IST

शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

ठळक मुद्देउद्या बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने दिले.त्यानंतर काही तासांतच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.पवार कुटुंबातील सर्वच सदस्यांनी अजित पवार यांना भावनिक साद घातली होती.

मुंबईः महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल काही तासांवर येऊन ठेपलेला असतानाच राज्यात नवं राजकीय नाट्य घडताना पाहायला मिळतंय. उद्या बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर, सगळ्यांनीच आकडेमोड सुरू केली होती. 'आम्ही १६२' या आकड्यावर महाविकासआघाडीचे नेते ठाम होते, तर इकडे भाजपाची मंडळी १७० ची हमी देत होती. अशातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं राजकारणाने वेगळं वळण घेतलंय. अजितदादांनी केवळ उपमुख्यमंत्रिपदच सोडलं नसून, सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णयही त्यांनी पक्का केल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं. 

विधानसभा निवडणुकीआधी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा देऊन खळबळ उडवून देणाऱ्या अजित पवार यांनी गेल्या शनिवारी राज्यात मोठाच राजकीय भूकंप घडवला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी, आपले काका शरद पवार यांच्याशी बंड पुकारत त्यांनी भाजपाशी हातमिळवणी केली होती. त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावरच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले होते. अत्यंत घाईघाईत हा शपथविधी उरकण्यात आला होता. त्यानंतर पुढचे दोन दिवस राजकारणात अक्षरशः भागम् भाग सुरू होती. एकीकडे, अजित पवार यांचं मन वळवण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू होते, पवार कुटुंब फुटू नये यादृष्टीने हालचाली सुरू होत्या, तर दुसरीकडे राज्यातील शपथविधीविरोधात, भाजपाविरोधात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज कोर्टाने निकाल सुनावला होता आणि उद्याच संध्याकाळी पाच वाजेपर्यंत विश्वास सिद्ध करण्यास सांगितलं होतं. मात्र, या सुनावणीनंतर काही तासांतच, अजित पवार यांनी वैयक्तिक कारणास्तव उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि सगळंच चित्र बदललं.   

पवार कुटुंबातील सर्वच सदस्यांनी अजित पवार यांना भावनिक साद घातली होती. विविध नेते त्यांना भेटत होते. परंतु, त्यांना हात हलवतच परतावं लागत होतं. मात्र, शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि सदानंद सुळे यांनी सूत्रं हाती घेतली आणि ते अजितदादांचं मन वळवण्यात यशस्वी झाले. त्यानंतरच, अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला. मात्र त्याचवेळी, यापुढे राजकारणात न राहण्याचा निर्णयही त्यांनी घेतल्याचं समजतं.

अजित पवार हे राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्रं घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले होते. परंतु, त्यांनी शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी सूत्रं हाती घेतली आणि सर्व आमदारांना आपल्या बाजूने वळवण्यातही यशस्वी झाले. त्यामुळे अजित पवारांचा अपेक्षाभंग झाला. जवळपास ३० आमदार येतील असं अजित पवारांना वाटत होतं. पण तसं झालं नाही. त्यामुळे ते अस्वस्थ झाले. दुसरीकडे, पवार कुटुंबाकडून दबाव वाढला होता. अखेर, त्यापुढे पवार झुकले आणि त्यांचं बंड थंड झालं. या सगळ्या प्रकारामुळे अजितदादांच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे. पवार कुटुंब त्यांना स्वीकारेल, पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल आधीइतका आदर असेल का, हा प्रश्नच आहे. तो ओळखूनच अजित पवार राजकारण सोडतील, असं बोललं जातं. तब्बल ३६ वर्षं अजित पवार राजकारणात आहेत. जे मनात आहे, ते बोलणारे - करणारे आणि परिणामांचा फारसा विचार न करताच निर्णय घेणारे नेते ही त्यांची ओळख. पण ही खासियतच त्यांच्या अंगलट आली असं म्हणावं लागेल.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा