शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

चिनी कंपन्यांसोबत केलेले करार रद्द करण्यात आलेले नाहीत, तर...; ठाकरे सरकारचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 7:13 PM

राज्यातील तळेगाव टप्पा-2 पुणे येथे, हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीनही कंपन्यांनी प्रत्येकी 250 कोटी, 1 हजार कोटी आणि 3 हजार 770 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासंदर्भात सामंजस्य करार केला आहे.

ठळक मुद्देहे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत.चीनच्या तीन कंपन्यांसोबत महाराष्ट्र शासनाने १५ जून रोजी सामंजस्य करार केला आहे.या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र शासनाकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहण्यात येणार आहे.

मुंबई : महाराष्ट्र सरकारने चिनी कंपन्यांसोबत केलेले करार रद्द करण्यात आलेले नाहीत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. हे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत. याचा अर्थ ते रद्द केले, असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. चीनच्या हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीन कंपन्यांसोबत महाराष्ट्र शासनाने १५ जून रोजी सामंजस्य करार केला आहे.

एअर फोर्स तर आहेच! पण, भारताच्या पायदळाचा सामना करणंही चीनला मुश्किल, मिळेल 'इट का जवाब पत्थर से'!

राज्यातील तळेगाव टप्पा-2 पुणे येथे, हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीनही कंपन्यांनी प्रत्येकी 250 कोटी, 1 हजार कोटी आणि 3 हजार 770 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासंदर्भात सामंजस्य करार केला आहे. एकूण 5 हजार 20 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र शासनाकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहण्यात येईल, असेही देसाई यांनी म्हटले आहे.

फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला!

पूर्व लडाखमध्ये भारत आणि चिनी सैन्यांत झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांचे संबंध जबरदस्त ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर चिनी वस्तूंवर बंधी घालावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. यातच, महाराष्ट्र सरकारनेही चिनी कंपन्यांसोबत केलेले करार रद्द केल्याचे वृत्त पसरले होते. मात्र, देसाई यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

देशभरात चिनी वस्तूंविरोधात लाट -चिनी कोरानाने भारतीयांपुढे जगण्या-मरण्याचे संकट निर्माण केले आहे. आता चीन सीमेवरही कुरापती काढत आहे. यामुळे संपूर्ण देशभरातच चिनी वस्तूंविरोधात मोठी लाट निर्माण झाली आहे. देशभरांतील बाजारपेठांत ग्राहक चायनीज वस्तूंना पर्याय शोधू लागले असून मेड इन इंडियाची विचारणा होतांना दिसत आहे.

India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं

चीनला घेरण्याची पूर्ण तयारी -गलवानमधील हिंसक चकमकीनंतर भारतचीनला घेरण्याची पूर्ण तयारी करत आहे. भारताने आपले शक्तीशाली, कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सु-सज्ज आणि अचूक निशाणा असणारे, मिराज-2000 आणि सुखोई-30 सारखी लढाऊ विमानं, तसेच अपाचे आणि चिनूक सारखे हेलिकॉप्टर्स चीनच्या रोखानं एलएसीवर तैनात केली आहेत. तर दुसरीकडे चीनही त्यांच्या हद्दीत युद्धाची तयारी करताना दिसत आहे. तेही सीमेजवळ सान्याची आणि युद्ध सामग्रीची जमवाजमव करत आहेत. 

गलवानमध्ये अडकले भारतीय जवान; 'या' महत्वाच्या भागात 8 किमी आत घुसला चीन, बंकर्सही बनवले

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेSubhash Desaiसुभाष देसाईShiv SenaशिवसेनाState Governmentराज्य सरकारMaharashtraमहाराष्ट्रchinaचीन