शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

Maharashtra Government: सत्तास्थापनेबाबत आमचं अजून ठरलं नाही; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 8:14 PM

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल अशी घोषणा शिवसेनेचे नेते वारंवार देत असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप न सुटल्याने राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अशातच किमान समान कार्यक्रम हे सूत्र ठेऊन राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना सरकार चालविण्यासाठी एकत्र येणार आहे असं चित्र निर्माण झालं. मात्र प्रत्यक्षात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठीच्या बैठकीतच हा अंतिम निर्णय अवलंबून आहे. त्यामुळे शिवसेनेची धाकधूक वाढली आहे. 

राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल अशी घोषणा शिवसेनेचे नेते वारंवार देत असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही. अशातच पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे की, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांना एकत्र आणून सरकार बनविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. उद्या याबाबत काँग्रेसच्या नेत्यांची आणि शिवसेनेच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यात नवीन समीकरण उदयास येणार की नाही हे ठरणार आहे असं सांगितलं. त्यामुळे अद्यापही राज्यातील सत्तास्थापनेवर अंतिम निर्णय बाकीच आहे. 

शनिवारी ओला दुष्काळाबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेते एकत्ररित्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. मात्र ऐनवेळी काँग्रेस नेते मुंबईत उपलब्ध नसल्याने ही भेट रद्द करण्यात आली. बैठक रद्द होण्याचं कारण काँग्रेस नेत्यांनी वेगळं सांगितले असलं तरी याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तत्पूर्वी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी बोलून अंतिम निर्णय होईल असं सांगितले आहे. उद्या याबाबत शरद पवार आणि सोनिया गांधी यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडेही सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. 

दरम्यान, काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यावा हे सोनिया गांधी यांच्या इच्छेविरोधात आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना तयार केलं आहे. पण सोनिया गांधी या नवीन समीकरणामुळे नाराज असल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांचे म्हणणं आहे की, अद्यापही काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील नवीन समीकरणाला मान्यता दिली आहे. अंतिम निर्णय अद्यापही बाकी आहे. तसेच काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणे हेदेखील सोनिया गांधी यांना आवडलं नाही त्यामुळे राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येणार की नाही यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.   

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019