शहरं
Join us  
Trending Stories
1
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
2
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
3
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
4
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
5
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
6
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
7
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
8
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
9
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
10
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
11
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
12
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
13
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
14
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
15
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
16
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
17
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
18
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
19
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
20
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'एक्झिट पोलची आकडेवारी चुकीची; जनमत २४ तारखेलाच मिळणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 19:37 IST

या सरकारला घालवायचं परिवर्तन करायचं यासाठीच मतदान झालं आहे. ज्या ज्या वेळी टक्केवारी वाढतेय तेव्हा परिवर्तन निश्चित असतं

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध चॅनेल्सने दिलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळत असून महाआघाडीला मोठा फटका बसताना पाहायला मिळत आहे. अनेकांनी महायुतीला २०० च्यावर जागा मिळतील आणि आघाडीला ७० जागा मिळणेही कठीण होईल अशी आकडेवारी दिली आहे. मात्र एक्झिट पोलमध्ये तथ्य वाटत नाही, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या अशा सर्व आघाडीवर सरकार अपयशी राहिलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला जो प्रतिसाद राज्यात मिळाला आहे. निश्चितच जनमत २४ तारखेला आघाडी मिळेल. त्यामुळे ही आकडेवारी संपूर्ण चुकीची आहे अशा शब्दात काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

याबाबत बोलताना सतेज पाटील म्हणाले की, शिवस्मारक, इंदु मिलमधील बाबासाहेब आंबेडकर स्मारक अशा अनेक मुद्द्यावर राज्य सरकारला बोलण्यासारखं काहीच नाही. जनसंघर्ष, हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून राज्यभर यात्रा काढली, लोकांच्या मनात नक्कीच बदलाचं वातावरण आहे. महागाईची झळ लोकांना बसली आहे. या सरकारला घालवायचं परिवर्तन करायचं यासाठीच मतदान झालं आहे. ज्या ज्या वेळी टक्केवारी वाढतेय तेव्हा परिवर्तन निश्चित असतं. एक्झिट पोलचे आकडेवारी फोल ठरतील हे २४ तारखेला दिसेल असं त्यांनी सांगितले. 

तसेच भाजपाचे जे लोकं निवडणुकीला उभे होते ते मतदारसंघ सोडून फिरले नाही, धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट हे सगळे नेते राज्यभर फिरले. १५ वर्षात आम्ही इनकमिंग केलं नाही कारण सत्तेचा गैरवापर आम्ही कधीच केला नाही जर तो वापर केला असता तर नक्कीच तुमच्यातील बरेच नेते आमच्या पक्षात आले असते. भाजपाचे सगळे बंडखोर शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी सक्रीय होते. हे उघड आहे असा आरोप सतेज पाटील यांनी भाजपा नेत्यांवर केला आहे. 

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आयात करण्याची गरज का पडली? तुमच्या सरकारचा ५ वर्षाचा कारभार नव्हता. त्यामुळे जिंकणारे उमेदवार भाजपात घेतले पण लोकांना हे सगळं पाहिलं आहे. लोकांनी मतदानातून त्याचं उत्तर दिलं आहे. येत्या २४ तारखेला त्याचं उत्तर मिळालं. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासह भाजपाच्या एकाही नेत्यांनी राज्याच्या कारभारावर मतं मागितली नाहीत. देशाच्या प्रश्नावर राज्यातील जनतेचं पोट कसं भरणार? असंही सतेज पाटील यांनी सांगितले. 

महत्वाच्या बातम्या

विधानसभा निवडणुकीचे सर्व 'एक्झिट पोल' एका क्लिकवर

महायुती सत्ता राखणार; द्विशतक गाठणार; महाआघाडी पुन्हा सत्तेपासून दूर

 नवे सरकार हे महायुतीचेच; सट्टेबाजाराचा अंदाज

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019