शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'एक्झिट पोलची आकडेवारी चुकीची; जनमत २४ तारखेलाच मिळणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 19:37 IST

या सरकारला घालवायचं परिवर्तन करायचं यासाठीच मतदान झालं आहे. ज्या ज्या वेळी टक्केवारी वाढतेय तेव्हा परिवर्तन निश्चित असतं

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध चॅनेल्सने दिलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळत असून महाआघाडीला मोठा फटका बसताना पाहायला मिळत आहे. अनेकांनी महायुतीला २०० च्यावर जागा मिळतील आणि आघाडीला ७० जागा मिळणेही कठीण होईल अशी आकडेवारी दिली आहे. मात्र एक्झिट पोलमध्ये तथ्य वाटत नाही, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या अशा सर्व आघाडीवर सरकार अपयशी राहिलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला जो प्रतिसाद राज्यात मिळाला आहे. निश्चितच जनमत २४ तारखेला आघाडी मिळेल. त्यामुळे ही आकडेवारी संपूर्ण चुकीची आहे अशा शब्दात काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

याबाबत बोलताना सतेज पाटील म्हणाले की, शिवस्मारक, इंदु मिलमधील बाबासाहेब आंबेडकर स्मारक अशा अनेक मुद्द्यावर राज्य सरकारला बोलण्यासारखं काहीच नाही. जनसंघर्ष, हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून राज्यभर यात्रा काढली, लोकांच्या मनात नक्कीच बदलाचं वातावरण आहे. महागाईची झळ लोकांना बसली आहे. या सरकारला घालवायचं परिवर्तन करायचं यासाठीच मतदान झालं आहे. ज्या ज्या वेळी टक्केवारी वाढतेय तेव्हा परिवर्तन निश्चित असतं. एक्झिट पोलचे आकडेवारी फोल ठरतील हे २४ तारखेला दिसेल असं त्यांनी सांगितले. 

तसेच भाजपाचे जे लोकं निवडणुकीला उभे होते ते मतदारसंघ सोडून फिरले नाही, धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट हे सगळे नेते राज्यभर फिरले. १५ वर्षात आम्ही इनकमिंग केलं नाही कारण सत्तेचा गैरवापर आम्ही कधीच केला नाही जर तो वापर केला असता तर नक्कीच तुमच्यातील बरेच नेते आमच्या पक्षात आले असते. भाजपाचे सगळे बंडखोर शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी सक्रीय होते. हे उघड आहे असा आरोप सतेज पाटील यांनी भाजपा नेत्यांवर केला आहे. 

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आयात करण्याची गरज का पडली? तुमच्या सरकारचा ५ वर्षाचा कारभार नव्हता. त्यामुळे जिंकणारे उमेदवार भाजपात घेतले पण लोकांना हे सगळं पाहिलं आहे. लोकांनी मतदानातून त्याचं उत्तर दिलं आहे. येत्या २४ तारखेला त्याचं उत्तर मिळालं. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासह भाजपाच्या एकाही नेत्यांनी राज्याच्या कारभारावर मतं मागितली नाहीत. देशाच्या प्रश्नावर राज्यातील जनतेचं पोट कसं भरणार? असंही सतेज पाटील यांनी सांगितले. 

महत्वाच्या बातम्या

विधानसभा निवडणुकीचे सर्व 'एक्झिट पोल' एका क्लिकवर

महायुती सत्ता राखणार; द्विशतक गाठणार; महाआघाडी पुन्हा सत्तेपासून दूर

 नवे सरकार हे महायुतीचेच; सट्टेबाजाराचा अंदाज

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019